शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

‘नवतपा’ जिल्ह्याला तापवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 21:45 IST

उन्हाळा आता खऱ्या अर्थाने आपल्या रंगात आला आहे. रविराज आता चांगलेच तापू लागले आहे. अंगाची लाही-लाही होत आहे. त्यात येत्या २५ तारखेपासून नवतपाला सुरूवात होत असल्याने भल्याभल्यांना नाव ऐकताच धडकी भरली आहे.

ठळक मुद्देपारा ४३ डिग्रीवर : २५ पासून होणार सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उन्हाळा आता खऱ्या अर्थाने आपल्या रंगात आला आहे. रविराज आता चांगलेच तापू लागले आहे. अंगाची लाही-लाही होत आहे. त्यात येत्या २५ तारखेपासून नवतपाला सुरूवात होत असल्याने भल्याभल्यांना नाव ऐकताच धडकी भरली आहे. आताच पारा ४३ डिग्रीवर गेला असताना नवतपात काय होणार याची कल्पना करूनच घाम फुटत आहे.उन्हाळ््याच्या अवघ्या चार महिन्यांतील सर्वाधिक तापमान नऊ दिवसांत असते. असे म्हटले जाते व त्यालाच ‘नवतपा’ म्हणता. नवतापमध्ये रोहिणी नक्षत्र लागत असून सूर्य आग ओकत असल्याने हे नऊ दिवस चांगलेच तापतात. एक प्रकारे सुर्यदेव पृथ्वीच्या अगदी जवळ आल्याचे वाटू लागते. यंदा येत्या २५ तारखेपासून ३ जूनपर्यंत नवतपा लागत आहे.त्यामुळे २५ तारखेपासूनचे नऊ दिवस कसे असणार याची कल्पना करताच अंगाची लाही लाही होत आहे. यंदाचा उन्हाळा अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणात कसा तरी निघून गेला. मात्र आता मागील काही चार-पास दिवसांपासून उन्हाळयाचे चटके चाखायला मिळत आहे. रविवारी पारा ४४ डिग्रीवर पोहचल्याचे दिसले. यंदाचे हे कमाल तापमान असून उन्हाची ही सरशी बघता घरातून बाहेर निघणे कठिण झाले आहे. उन्ह वाढतच चालल्याने गरम हवेच्या लाटा वाहत असून अंगाची लाही-लाही होत आहे.एसी व कुलर झाले फेलउन्हाळ््यापासून मुक्ती मिळावी यासाठी एसी व कुलरचा सहारा घेतला जात आहे. मात्र उष्णता एवढी आहे की त्यापुढे एसी व कुलरसुद्धा काम करीत नाही. उष्ण हवेच्या लाटांमुळे एसी व कुलरची हवा उष्ण होत आहे. मात्र काही केल्या गरमीपासून मुक्तता मिळणे कठिण झाले आहे. तर घरांवर असलेल्या पाण्याच्या टाक्यांतूनही अंगाला भाजून टाकणार एवढे गरम पाणी येत आहे. त्यामुळे दिवसभराच्या उष्णता व घाम यामुळे चिपचिप झालेल्या अंगाला धूवून काढण्यासाठी सायंकाळची आंघोळही कठिण झाली आहे.जिल्ह्याची यंत्रणा माहिती देण्यात अपयशीजिल्ह्यातील दररोजच्या तापमानाची नोंद तसेच मागील वर्षांतील तापमानाबद्दल माहिती पुरविण्यासाठी जिल्ह्यातील यंत्रणा अपयशी ठरत आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात असलेले नियंत्रण कक्ष फक्त नावापुरतेच आहे. तहसील कार्यालयाकडून पूर्वी असलेली व्यवस्थाही आता बंद पडून आहे. यावरून येथील यंत्रणा किती तत्परतेने कार्य करीत आहे हे दिसून येते.