शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

‘नवतपा’ जिल्ह्याला तापवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 21:45 IST

उन्हाळा आता खऱ्या अर्थाने आपल्या रंगात आला आहे. रविराज आता चांगलेच तापू लागले आहे. अंगाची लाही-लाही होत आहे. त्यात येत्या २५ तारखेपासून नवतपाला सुरूवात होत असल्याने भल्याभल्यांना नाव ऐकताच धडकी भरली आहे.

ठळक मुद्देपारा ४३ डिग्रीवर : २५ पासून होणार सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उन्हाळा आता खऱ्या अर्थाने आपल्या रंगात आला आहे. रविराज आता चांगलेच तापू लागले आहे. अंगाची लाही-लाही होत आहे. त्यात येत्या २५ तारखेपासून नवतपाला सुरूवात होत असल्याने भल्याभल्यांना नाव ऐकताच धडकी भरली आहे. आताच पारा ४३ डिग्रीवर गेला असताना नवतपात काय होणार याची कल्पना करूनच घाम फुटत आहे.उन्हाळ््याच्या अवघ्या चार महिन्यांतील सर्वाधिक तापमान नऊ दिवसांत असते. असे म्हटले जाते व त्यालाच ‘नवतपा’ म्हणता. नवतापमध्ये रोहिणी नक्षत्र लागत असून सूर्य आग ओकत असल्याने हे नऊ दिवस चांगलेच तापतात. एक प्रकारे सुर्यदेव पृथ्वीच्या अगदी जवळ आल्याचे वाटू लागते. यंदा येत्या २५ तारखेपासून ३ जूनपर्यंत नवतपा लागत आहे.त्यामुळे २५ तारखेपासूनचे नऊ दिवस कसे असणार याची कल्पना करताच अंगाची लाही लाही होत आहे. यंदाचा उन्हाळा अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणात कसा तरी निघून गेला. मात्र आता मागील काही चार-पास दिवसांपासून उन्हाळयाचे चटके चाखायला मिळत आहे. रविवारी पारा ४४ डिग्रीवर पोहचल्याचे दिसले. यंदाचे हे कमाल तापमान असून उन्हाची ही सरशी बघता घरातून बाहेर निघणे कठिण झाले आहे. उन्ह वाढतच चालल्याने गरम हवेच्या लाटा वाहत असून अंगाची लाही-लाही होत आहे.एसी व कुलर झाले फेलउन्हाळ््यापासून मुक्ती मिळावी यासाठी एसी व कुलरचा सहारा घेतला जात आहे. मात्र उष्णता एवढी आहे की त्यापुढे एसी व कुलरसुद्धा काम करीत नाही. उष्ण हवेच्या लाटांमुळे एसी व कुलरची हवा उष्ण होत आहे. मात्र काही केल्या गरमीपासून मुक्तता मिळणे कठिण झाले आहे. तर घरांवर असलेल्या पाण्याच्या टाक्यांतूनही अंगाला भाजून टाकणार एवढे गरम पाणी येत आहे. त्यामुळे दिवसभराच्या उष्णता व घाम यामुळे चिपचिप झालेल्या अंगाला धूवून काढण्यासाठी सायंकाळची आंघोळही कठिण झाली आहे.जिल्ह्याची यंत्रणा माहिती देण्यात अपयशीजिल्ह्यातील दररोजच्या तापमानाची नोंद तसेच मागील वर्षांतील तापमानाबद्दल माहिती पुरविण्यासाठी जिल्ह्यातील यंत्रणा अपयशी ठरत आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात असलेले नियंत्रण कक्ष फक्त नावापुरतेच आहे. तहसील कार्यालयाकडून पूर्वी असलेली व्यवस्थाही आता बंद पडून आहे. यावरून येथील यंत्रणा किती तत्परतेने कार्य करीत आहे हे दिसून येते.