शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाने दिली साथ मात्र वन्यप्राणी करतात घात

By admin | Updated: September 22, 2016 00:42 IST

पाणी त्याची बाणी व कसेल त्याची शेती, असे शेती हंगामासाठी प्रामुख्याने बोलल्या जाते.

विहीरगाव ग्रामवासीयांची व्यथा : रानडुकरे व हरिणांचा उपद्रव सुरूबोंडगावदेवी : पाणी त्याची बाणी व कसेल त्याची शेती, असे शेती हंगामासाठी प्रामुख्याने बोलल्या जाते. यावर्षीचा शेती हंगाम प्रारंभीच अत्यंत दगदगीचा व आर्थिक क्लेशदायक ठरणारा गेला. परंतु नंतर आलेल्या दमदार पावसाने हिरवेगार झालेले शेत वन्यप्राण्यांच्या हैदोसाने नष्ट होत आहेत.विहीरगाव, सिलेझरी शेतशिवारात पुरेसा पाण्याच्या अभवानी शेतजमिनी पडीत राहिल्या. ऐन रोवणीच्या हंगामात पावसाने दगा दिल्याने रोपांची वाढ खुंटली. गेल्या दहा-बारा दिवसांमध्ये दमदार पाऊस बरसल्याने धानाच्या पिकांना जीवदान भेटून नवसंजिवनी मिळाली. शेतशिवार हिरवा शालू पांघरल्यासारखा दिसते. धान रोपांची डोळ्यात भरण्यासारखी वाढ पाहून गावातील बळीराजांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले दिसते. ऐनवेळी निसर्गाने चांगली साथ दिली. परंतु दुसरीकडे जंगलामधील वन्यप्राणी धान पिकांचे घात करीत आहेत, अशी व्यथा विहीरगावच्या शेतकऱ्यांनी मांडली.विहीरगाव (बर्ड्या), सिलेझरी गावातील शेतकऱ्यांच्या बहुतांश जमिनी जंगलव्याप्त परिसराला लागून आहेत. जंगली जनावरांचा गावकऱ्यांना मोठा त्रास होत आहे. शेतामध्ये असलेले उभे पीक वन्यप्राणी झुंबडाने येवून संपूर्ण नेस्तनाबूत करतात, अशी विहिरगाववासीय शेतकऱ्यांची ओरड आहे. विशेषत: रानटी डुक्कर, हरिण यांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव सुरू असल्याने धानपिकाची नासाडी होत असल्याचे विहीरगावचे शेतकरी बेनीराम शिवणकर यांनी सांगितले. वन्यप्राण्यांचा नेहमीच धुमाकूळ असल्याने शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवून आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याची युवा प्रगतीशील शेतकरी विश्वनाथ वालदे यांनी आपबीती सांगितली. विहीरगाव व सिलेझरी शेतशिवाराला जंगलव्याप्त परिसर आहे. शेताजवळच्या भागात तलावसुद्धा आहे. वन्यप्राण्यांसाठी आवश्यक असलेली संरक्षित जागा असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात जंगली जनावरांचा वावर असल्याचे विहीरगावचे शेतकरी शालीकराम गायधने, गोपीचंद शिवणकर, डोये, प्रेमलाल शिवणकर यांनी सांगितले.मागील आठवड्यामध्ये निसर्गाने खुल्यामनाने कृपापात्र दाखविल्याने धान पिकाला दिलासा मिळून जीवदान मिळाले आहे. हलक्या प्रतीचे धान निसवत आहे. सध्या धानाचा हंगाम ‘सोने पे सुहाना’ सारखा आहे. परंतु वन्यप्राणी आजघडीला धानपिकाचे घात करीत असल्याचे विहीरगावच्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. नवेगावबांध वनपरिक्षेत्रात सदर परिसर येत असून वनविभागाने जंगली जनावरांना आळा घालण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)