शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाने दिली साथ मात्र वन्यप्राणी करतात घात

By admin | Updated: September 22, 2016 00:42 IST

पाणी त्याची बाणी व कसेल त्याची शेती, असे शेती हंगामासाठी प्रामुख्याने बोलल्या जाते.

विहीरगाव ग्रामवासीयांची व्यथा : रानडुकरे व हरिणांचा उपद्रव सुरूबोंडगावदेवी : पाणी त्याची बाणी व कसेल त्याची शेती, असे शेती हंगामासाठी प्रामुख्याने बोलल्या जाते. यावर्षीचा शेती हंगाम प्रारंभीच अत्यंत दगदगीचा व आर्थिक क्लेशदायक ठरणारा गेला. परंतु नंतर आलेल्या दमदार पावसाने हिरवेगार झालेले शेत वन्यप्राण्यांच्या हैदोसाने नष्ट होत आहेत.विहीरगाव, सिलेझरी शेतशिवारात पुरेसा पाण्याच्या अभवानी शेतजमिनी पडीत राहिल्या. ऐन रोवणीच्या हंगामात पावसाने दगा दिल्याने रोपांची वाढ खुंटली. गेल्या दहा-बारा दिवसांमध्ये दमदार पाऊस बरसल्याने धानाच्या पिकांना जीवदान भेटून नवसंजिवनी मिळाली. शेतशिवार हिरवा शालू पांघरल्यासारखा दिसते. धान रोपांची डोळ्यात भरण्यासारखी वाढ पाहून गावातील बळीराजांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले दिसते. ऐनवेळी निसर्गाने चांगली साथ दिली. परंतु दुसरीकडे जंगलामधील वन्यप्राणी धान पिकांचे घात करीत आहेत, अशी व्यथा विहीरगावच्या शेतकऱ्यांनी मांडली.विहीरगाव (बर्ड्या), सिलेझरी गावातील शेतकऱ्यांच्या बहुतांश जमिनी जंगलव्याप्त परिसराला लागून आहेत. जंगली जनावरांचा गावकऱ्यांना मोठा त्रास होत आहे. शेतामध्ये असलेले उभे पीक वन्यप्राणी झुंबडाने येवून संपूर्ण नेस्तनाबूत करतात, अशी विहिरगाववासीय शेतकऱ्यांची ओरड आहे. विशेषत: रानटी डुक्कर, हरिण यांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव सुरू असल्याने धानपिकाची नासाडी होत असल्याचे विहीरगावचे शेतकरी बेनीराम शिवणकर यांनी सांगितले. वन्यप्राण्यांचा नेहमीच धुमाकूळ असल्याने शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवून आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याची युवा प्रगतीशील शेतकरी विश्वनाथ वालदे यांनी आपबीती सांगितली. विहीरगाव व सिलेझरी शेतशिवाराला जंगलव्याप्त परिसर आहे. शेताजवळच्या भागात तलावसुद्धा आहे. वन्यप्राण्यांसाठी आवश्यक असलेली संरक्षित जागा असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात जंगली जनावरांचा वावर असल्याचे विहीरगावचे शेतकरी शालीकराम गायधने, गोपीचंद शिवणकर, डोये, प्रेमलाल शिवणकर यांनी सांगितले.मागील आठवड्यामध्ये निसर्गाने खुल्यामनाने कृपापात्र दाखविल्याने धान पिकाला दिलासा मिळून जीवदान मिळाले आहे. हलक्या प्रतीचे धान निसवत आहे. सध्या धानाचा हंगाम ‘सोने पे सुहाना’ सारखा आहे. परंतु वन्यप्राणी आजघडीला धानपिकाचे घात करीत असल्याचे विहीरगावच्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. नवेगावबांध वनपरिक्षेत्रात सदर परिसर येत असून वनविभागाने जंगली जनावरांना आळा घालण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)