शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
2
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
3
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
4
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
5
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
6
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
7
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
8
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
9
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
10
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
11
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
12
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
13
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
14
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
15
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
16
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
17
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
18
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
19
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
20
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं

राष्ट्रीय बँकानी वाटले केवळ २० टक्के पीक कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 22:26 IST

शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात राष्ट्रीयकृत बँका मोठ्या प्रमाणात पिछाडीवर असून या बँकानी आत्तापर्यंत केवळ २० टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेच्या किचकट प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांनी सुध्दा या बँकाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देजिल्हा बँकेची आघाडी : ग्रामीण बँक संथगतीने, आत्तापर्यंत ५६ टक्के उद्दिष्टपूर्ती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात राष्ट्रीयकृत बँका मोठ्या प्रमाणात पिछाडीवर असून या बँकानी आत्तापर्यंत केवळ २० टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेच्या किचकट प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांनी सुध्दा या बँकाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.शासनाने यंदा खरीप हंगामात जिल्हा मध्यवर्ती सहकारी, राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकांना ३०३ कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेला एप्रिल महिन्यांपासूनच सुरूवात झाली. मात्र चार महिन्याच्या कालावधीत या तिन्ही बँकांनी आत्तापर्यंत केवळ ५६ टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे.यात गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक ८९ कोटी ८२ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे २६ हजार १२९ शेतकºयांना वाटप केले आहे. तर सर्व राष्ट्रीयकृत बँकानी १७१८ शेतकºयांना १७ कोटी ३५ लाख रुपये आणि ग्रामीण बँकेने २०१७ शेतकºयांना १८ कोटी ८७ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे. या सर्व बँकाच्या पीक कर्ज वाटपाच्या टक्केवारीवर नजर टाकल्यास गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ९०.७१ टक्के, राष्ट्रीयकृत बँका २०.३९ टक्के, ग्रामीण बँका ६०.८९ टक्के असे तिन्ही बँकानी आत्तापर्यंत केवळ ५६ टक्के पीक कर्जाचे वाटप शेतकऱ्यांना केले आहे. त्यामुळे जिल्हा बँक वगळता राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँका मोठ्या प्रमाणात माघारल्याचे चित्र आहे.खरीप हंगामाच्या सुरुवातीला सावकार आणि नातेवाईकांकडून कर्जाची उचल करण्यापेक्षा बँकामधून पीक कर्जाची उचल करतात. शासनाचा सुध्दा या मागील हाच हेतू आहे. त्यामुळे शासन आणि नाबार्डने यंदा बँकाना ३०३ कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. तसेच दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आणि शेतकऱ्यांना पीक कर्जाची उचल करताना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहे. मात्र यानंतर सुध्दा राष्ट्रीयकृत बँकाकडून पीक कर्ज वाटप करताना किचकट प्रक्रिया अवलंबली जात असल्याने शेतकऱ्यांसाठी ती त्रासदायक ठरत आहे. त्यामुळेच पीक कर्ज वाटप करण्यात राष्ट्रीयकृत बँका प्रचंड माघारल्याचे चित्र आहे.दररोज आढावा, तरीही समस्याजिल्ह्यातील सर्वच बँकाकडून दररोज पीक कर्ज वाटपाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला जात आहे. तसेच शासनाला सुध्दा याचे अपडेट पाठविले जात आहे. मात्र यानंतरही पीक कर्ज वाटपाची उद्दिष्ट पूर्ती झालेली नाही. जिल्हा बँक वगळता राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकेला अद्यापही ५० टक्केच्यावर आकडा गाठणे शक्य झालेले नाही. त्यामुळे दररोज आढावा घेवून सुध्दा समस्या कायम असल्याचे चित्र आहे.उद्दिष्ट कमी होण्याची शक्यतामागील वर्षी जिल्ह्याला दिलेले पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण न झाल्याने यंदा नाबार्डने ८० कोटी रुपयांनी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट कमी केले. यंदा देखील तीच स्थिती असून पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पुन्हा कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याचा फटका जिल्ह्यातील शेतकºयांना बसू शकतो.राष्ट्रीयकृत बँकानी विचारमंथन करण्याची वेळजिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँक दरवर्षी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट गाठण्यात अपयशी ठरत आहे. तर यंदा आत्तापर्यंत केवळ २० टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे. या बँकातून पीक कर्जाची उचल करण्याकडे शेतकरी पाठ फिरवित असल्याने त्यांना विचार मंथन करण्याची गरज आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज