शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

नगर पंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:26 IST

नगर पंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. राजकीय पक्षांनी प्रचारास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी उमेदवार आणि मतदार यांच्यामध्ये तणाव निर्माण होतानाचे चित्र दिसत नाही. परंतु आता चौकाचौकांत निवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

ठळक मुद्देवीज, पाणी, रस्त्यांसह हाताला काम द्या : बाकलसर्राचे ज्वलंत मुद्दे

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : नगर पंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. राजकीय पक्षांनी प्रचारास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी उमेदवार आणि मतदार यांच्यामध्ये तणाव निर्माण होतानाचे चित्र दिसत नाही. परंतु आता चौकाचौकांत निवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. नगर पंचायतवर कुणाची सत्ता येईल, सत्तेवर आल्यास कोणत्या कामावर लक्ष देण्यात येईल, कोणकोणत्या समस्या दूर होतील, कोणाला निवडून देणे योग्य ठरेल, याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.बाकलसर्रा गावातील नगर पंचायतच्या प्रभाग क्रमांक १ आणि २ येथे जवळपास ८५ घरे आहेत. या गावातील लोक ७५ टक्के आदिवासी, मागासलेले आहेत. इतर २५ टक्के लोक पोवार, लोधी, हलबी, लोहार, एस.सी. इत्यादी जातीचे आहेत. ते काही प्रमाणात शेतीवर तर मोठ्या प्रमाणात वनोपज व मोल मजूरीवर अवलंबून आहेत. कामाअभावी येथील लोक शहराकडे पलायन करुन कुटुंबासाठी उदरनिर्वाहाचे साधन शोधतात, हे या गावचे वैशिष्ट आहे.या गावाला भेट दिली असता दोन्ही वॉर्डांची सद्यस्थिती आणि समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तालुका मुख्यालयापासून ५ किमी. अंतरावर असलेला प्रभाग १ आणि २ बाकलसर्रा या गावात जाताना ३ किमी. जंगलातून मार्गक्रमण करावे लागते. गावापर्यंत जाण्यासाठी पक्का डांबरीकरण रस्ता बनला आहे. परंतु त्या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती झाली नसल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या गावात पोहोचताच गावकरी मोठ्या उत्सुकतेने भेटून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत गावातील समस्या मांडू लागतात. दुर्गम व संवेदनशील भागात मोडत असलेला बाकलसर्रा गाव विकासाच्या प्रवाहात मुळीच आला नाही. गावातील सर्वच घरे कौलारू आहेत. आदिवासी मागासलेल्या बेरोजगार युवकांचा लोंढा या गावात आहे. लोकांचे राहणीमान पारंपरिक व मागासलेले आहे. अडीच वर्षांपूर्वी नगर पंचायत स्थापन होऊन प्रशासक बसविण्यात आले. परंतु येथे विकासाचे कोणतेच काम झाले नाही. २०० मीटर रस्ता खडीकरणाचा आहे, परंतु सदर रस्ता लवकर पक्का सिमेंटचा तयार व्हावा, अशी मागणी लोकांची आहे.गावात रस्त्याच्या एका बाजूला नाली बांधकाम झाले, ते ग्रामपंचायत असताच बनले होते. परंतु नालीचा उपसा झाला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी नाल्या जमिनीत गळप झाल्या आहेत. सौर उर्जेचे दिवे बंद पडले आहेत. रात्रीला या गावातील दोन्ही वॉर्डात काळोख पसरला असतो. गावात एकूण सात बोअरवेल असून उन्हाळ्यात सर्व बोअरवेल बंद असतात. गावाबाहेरील शेतात खासगी बोअरवेलच्या भरवशावर पाणी मिळवावे लागते. गावात एका ठिकाणी बोअरवेल अनेक दिवसांपासून बंद पडलेली आहे. परंतु तिची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला नाही.पुढे एका ठिकाणी नालीचा उपसा झालेला दिसला. परंतु नालीतील घाण व माती तिथेच पडून होती. प्रशासक बसल्यापासून फक्त स्वच्छ भारत मिशनच्या कामांतर्गत या गावात सार्वजनिक शौचालयांसह ९५ टक्के कुटुंबाला शौचालयांची सोय झाली आहे. काही लोक अजूनही उघड्यावरच जाणे पसंत करताना समजले. दोन ठिकाणी कचरापेट्या लागून होत्या. परंतु गावात स्वच्छतेचे प्रमाण कमी दिसून आले. पिण्याच्या पाण्याची नळाद्वारे कायमची व्यवस्था करुन शुद्ध पाणी मिळावे, पथदिवे लावण्यात यावे, अशी मागणी लोकांनी केली आहे.