शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

नगर पंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:26 IST

नगर पंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. राजकीय पक्षांनी प्रचारास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी उमेदवार आणि मतदार यांच्यामध्ये तणाव निर्माण होतानाचे चित्र दिसत नाही. परंतु आता चौकाचौकांत निवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

ठळक मुद्देवीज, पाणी, रस्त्यांसह हाताला काम द्या : बाकलसर्राचे ज्वलंत मुद्दे

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : नगर पंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. राजकीय पक्षांनी प्रचारास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी उमेदवार आणि मतदार यांच्यामध्ये तणाव निर्माण होतानाचे चित्र दिसत नाही. परंतु आता चौकाचौकांत निवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. नगर पंचायतवर कुणाची सत्ता येईल, सत्तेवर आल्यास कोणत्या कामावर लक्ष देण्यात येईल, कोणकोणत्या समस्या दूर होतील, कोणाला निवडून देणे योग्य ठरेल, याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.बाकलसर्रा गावातील नगर पंचायतच्या प्रभाग क्रमांक १ आणि २ येथे जवळपास ८५ घरे आहेत. या गावातील लोक ७५ टक्के आदिवासी, मागासलेले आहेत. इतर २५ टक्के लोक पोवार, लोधी, हलबी, लोहार, एस.सी. इत्यादी जातीचे आहेत. ते काही प्रमाणात शेतीवर तर मोठ्या प्रमाणात वनोपज व मोल मजूरीवर अवलंबून आहेत. कामाअभावी येथील लोक शहराकडे पलायन करुन कुटुंबासाठी उदरनिर्वाहाचे साधन शोधतात, हे या गावचे वैशिष्ट आहे.या गावाला भेट दिली असता दोन्ही वॉर्डांची सद्यस्थिती आणि समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तालुका मुख्यालयापासून ५ किमी. अंतरावर असलेला प्रभाग १ आणि २ बाकलसर्रा या गावात जाताना ३ किमी. जंगलातून मार्गक्रमण करावे लागते. गावापर्यंत जाण्यासाठी पक्का डांबरीकरण रस्ता बनला आहे. परंतु त्या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती झाली नसल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या गावात पोहोचताच गावकरी मोठ्या उत्सुकतेने भेटून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत गावातील समस्या मांडू लागतात. दुर्गम व संवेदनशील भागात मोडत असलेला बाकलसर्रा गाव विकासाच्या प्रवाहात मुळीच आला नाही. गावातील सर्वच घरे कौलारू आहेत. आदिवासी मागासलेल्या बेरोजगार युवकांचा लोंढा या गावात आहे. लोकांचे राहणीमान पारंपरिक व मागासलेले आहे. अडीच वर्षांपूर्वी नगर पंचायत स्थापन होऊन प्रशासक बसविण्यात आले. परंतु येथे विकासाचे कोणतेच काम झाले नाही. २०० मीटर रस्ता खडीकरणाचा आहे, परंतु सदर रस्ता लवकर पक्का सिमेंटचा तयार व्हावा, अशी मागणी लोकांची आहे.गावात रस्त्याच्या एका बाजूला नाली बांधकाम झाले, ते ग्रामपंचायत असताच बनले होते. परंतु नालीचा उपसा झाला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी नाल्या जमिनीत गळप झाल्या आहेत. सौर उर्जेचे दिवे बंद पडले आहेत. रात्रीला या गावातील दोन्ही वॉर्डात काळोख पसरला असतो. गावात एकूण सात बोअरवेल असून उन्हाळ्यात सर्व बोअरवेल बंद असतात. गावाबाहेरील शेतात खासगी बोअरवेलच्या भरवशावर पाणी मिळवावे लागते. गावात एका ठिकाणी बोअरवेल अनेक दिवसांपासून बंद पडलेली आहे. परंतु तिची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला नाही.पुढे एका ठिकाणी नालीचा उपसा झालेला दिसला. परंतु नालीतील घाण व माती तिथेच पडून होती. प्रशासक बसल्यापासून फक्त स्वच्छ भारत मिशनच्या कामांतर्गत या गावात सार्वजनिक शौचालयांसह ९५ टक्के कुटुंबाला शौचालयांची सोय झाली आहे. काही लोक अजूनही उघड्यावरच जाणे पसंत करताना समजले. दोन ठिकाणी कचरापेट्या लागून होत्या. परंतु गावात स्वच्छतेचे प्रमाण कमी दिसून आले. पिण्याच्या पाण्याची नळाद्वारे कायमची व्यवस्था करुन शुद्ध पाणी मिळावे, पथदिवे लावण्यात यावे, अशी मागणी लोकांनी केली आहे.