शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

महावितरणची शेतकऱ्यांवर अवकृपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 22:58 IST

मागील महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने धानपिके संकटात आल्याने शेतकºयांवर निसर्ग कोपला आहे. त्यातच आता महावितरणने ग्रामीण भागात आठ ते दहा तासांचे भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी करण्यास अडचण जात असून निसर्गा पाठोपाठ महावितरणचीही शेतकऱ्यांवर अवकृपा झाली आहे.

ठळक मुद्देदोन लाख हेक्टरमधील पिके संकटात : जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती, पिके वाचविण्यासाठी धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने धानपिके संकटात आल्याने शेतकºयांवर निसर्ग कोपला आहे. त्यातच आता महावितरणने ग्रामीण भागात आठ ते दहा तासांचे भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी करण्यास अडचण जात असून निसर्गा पाठोपाठ महावितरणचीही शेतकऱ्यांवर अवकृपा झाली आहे.जिल्ह्यात यंदा दोन लाख हेक्टरवर धानपिकाची लागवड करण्यात आली आहे. सुरूवातीला समाधानकारक समाधानकारक पाऊस झाल्याने धानपिके सुध्दा चांगले आले आहे. त्यामुळे मागील वर्षी झालेले नुकसान भरुन काढू अशीे शेतकऱ्यांना आशा होती. सध्या हलके धान निघण्याच्या मार्गावर आहेत तर जड धानाला एका पाण्याची आवश्यकता आहे. पिकांसाठी पाण्याची गरज लक्षात घेता सिंचन प्रकल्पातील पाणी सोडले जात आहे. काही शेतकरी नाल्यावर मोटारपंप लावून शेतीला पाणी करीत आहेत. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय आहे, ते शेतकरी मोटारपंपाने पाणी करतात. मात्र पावसाने पाठ फिरविली असताना आधीच शेतकºयांवर निसर्ग कोपला असताना त्यात महावितरणने सुध्दा भर घातली आहे.मागील आठ दहा दिवसांपासून महाविरणने ग्रामीण भागातील भारनियमनात वाढ केली आहे. सकाळी ६ ते ११ आणि दुपारी १.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत भारनियमन सुरू केले जात आहे. आठ ते दहा तासांच्या भारनियमनामुळे शेतकºयांना पिकांना पाणी करण्याची अडचण होत आहे. तर सिंचनाची सोय असताना सुध्दा भारनियमनामुळे पिके गमविण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. चार पाच दिवसांत जड धानाला पाणी न केल्यास जिल्ह्यातील हजारो हेक्टरमधील धानपिके करपण्याची शक्यता आहे. पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांवरील चिंतेचे ढग वाढत आहे.भारनियमन बंद करापावसाअभावी धानपिके संकटात आली असून पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. आधीच निसर्ग कोपला असल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच भारनियमनामुळे हाती आलेली पिके गमविण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेवून महावितरणने भारनियमन बंद करण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे.किडरोगांचा प्रादुर्भाव वाढलावाढते तापमान आणि ढगाळ वातावरणामुळे धानपिकांवरील किडरोगात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. किडरोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.प्रशासनाची बघ्याची भूमिकामहावितरणकडून मागील आठवडाभरापासून ग्रामीण भागात आठ ते दहा तासांचे भारनियमन केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्याची अडचण निर्माण झाली असून पिके संकटात आली आहे. शेतकºयांची गरज लक्षात घेता उपाययोजना करण्याची गरज असताना प्रशासनाने मात्र बघ्याची भूमिका घेतल्याने शेतकºयांमध्ये रोष व्याप्त आहे.