शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

महावितरणची शेतकऱ्यांवर अवकृपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 22:58 IST

मागील महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने धानपिके संकटात आल्याने शेतकºयांवर निसर्ग कोपला आहे. त्यातच आता महावितरणने ग्रामीण भागात आठ ते दहा तासांचे भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी करण्यास अडचण जात असून निसर्गा पाठोपाठ महावितरणचीही शेतकऱ्यांवर अवकृपा झाली आहे.

ठळक मुद्देदोन लाख हेक्टरमधील पिके संकटात : जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती, पिके वाचविण्यासाठी धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने धानपिके संकटात आल्याने शेतकºयांवर निसर्ग कोपला आहे. त्यातच आता महावितरणने ग्रामीण भागात आठ ते दहा तासांचे भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी करण्यास अडचण जात असून निसर्गा पाठोपाठ महावितरणचीही शेतकऱ्यांवर अवकृपा झाली आहे.जिल्ह्यात यंदा दोन लाख हेक्टरवर धानपिकाची लागवड करण्यात आली आहे. सुरूवातीला समाधानकारक समाधानकारक पाऊस झाल्याने धानपिके सुध्दा चांगले आले आहे. त्यामुळे मागील वर्षी झालेले नुकसान भरुन काढू अशीे शेतकऱ्यांना आशा होती. सध्या हलके धान निघण्याच्या मार्गावर आहेत तर जड धानाला एका पाण्याची आवश्यकता आहे. पिकांसाठी पाण्याची गरज लक्षात घेता सिंचन प्रकल्पातील पाणी सोडले जात आहे. काही शेतकरी नाल्यावर मोटारपंप लावून शेतीला पाणी करीत आहेत. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय आहे, ते शेतकरी मोटारपंपाने पाणी करतात. मात्र पावसाने पाठ फिरविली असताना आधीच शेतकºयांवर निसर्ग कोपला असताना त्यात महावितरणने सुध्दा भर घातली आहे.मागील आठ दहा दिवसांपासून महाविरणने ग्रामीण भागातील भारनियमनात वाढ केली आहे. सकाळी ६ ते ११ आणि दुपारी १.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत भारनियमन सुरू केले जात आहे. आठ ते दहा तासांच्या भारनियमनामुळे शेतकºयांना पिकांना पाणी करण्याची अडचण होत आहे. तर सिंचनाची सोय असताना सुध्दा भारनियमनामुळे पिके गमविण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. चार पाच दिवसांत जड धानाला पाणी न केल्यास जिल्ह्यातील हजारो हेक्टरमधील धानपिके करपण्याची शक्यता आहे. पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांवरील चिंतेचे ढग वाढत आहे.भारनियमन बंद करापावसाअभावी धानपिके संकटात आली असून पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. आधीच निसर्ग कोपला असल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच भारनियमनामुळे हाती आलेली पिके गमविण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेवून महावितरणने भारनियमन बंद करण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे.किडरोगांचा प्रादुर्भाव वाढलावाढते तापमान आणि ढगाळ वातावरणामुळे धानपिकांवरील किडरोगात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. किडरोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.प्रशासनाची बघ्याची भूमिकामहावितरणकडून मागील आठवडाभरापासून ग्रामीण भागात आठ ते दहा तासांचे भारनियमन केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्याची अडचण निर्माण झाली असून पिके संकटात आली आहे. शेतकºयांची गरज लक्षात घेता उपाययोजना करण्याची गरज असताना प्रशासनाने मात्र बघ्याची भूमिका घेतल्याने शेतकºयांमध्ये रोष व्याप्त आहे.