शहरं
Join us  
Trending Stories
1
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
2
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
3
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
4
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
5
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
6
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
7
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
8
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
9
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
10
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
13
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
14
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
15
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
16
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
17
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
18
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
19
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
20
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...

खासदार सुस्त, मंत्री हारतुऱ्यात व्यस्त, जनता त्रस्त

By admin | Updated: February 18, 2015 01:41 IST

भाजप-सेना युती शासनाचे १०० दिवस पूर्ण झाले. त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र गाजावाजा होतोय. राज्य मंत्रीमंडळात अर्जुनी मोरगावसारख्या आदिवासी, ...

संतोष बुकावन ल्ल भाजप-सेना युती शासनाचे १०० दिवस पूर्ण झाले. त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र गाजावाजा होतोय. राज्य मंत्रीमंडळात अर्जुनी मोरगावसारख्या आदिवासी, दुर्गम, नक्षलग्रस्त मतदारसंघाला स्थान मिळाले, हे येथील जनतेचे सुदैव. राज्याच्या प्रगती आढाव्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री उत्तीर्ण झाले असले तरी मतदारसंघाच्या ज्वलंत समस्यांबाबत अजूनही ते फारसे गंभीर झालेले नाहीत. दुसरीकडे लोकसभा निवडणूक होऊन ९ महिने उलटले, पण लोकांनी ज्यांना मोठ्या विश्वासाने निवडून दिले त्या खासदार नाना पटोले यांचे दर्शनही दुर्लभ झाले आहे. त्यामुळे खासदार सुस्त, मंत्री हारतुऱ्यात व्यस्त आणि जनताजनार्दन त्रस्त, असे म्हणण्याची वेळ आता आली आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात गोंदिया जिल्ह्याला तत्कालीन अर्थमंत्री महादेवराव शिवनकर यांच्यानंतर तब्बल १५ वर्षानंतर स्थान मिळाले, ही निश्चितच जिल्हावासियांसाठी आनंदाची बाब आहे. अर्जुनी-मोरगाव मतदारसंघातील जनतेचा तर आनंदच गगनात मावेनासा झाला आहे. आपला मंत्री म्हटल्यानंतर अपेक्षा बाळगणे हे गैर नाही. पण आपले आमदार हे केवळ अर्जुनी-मोरगावचेच नव्हे तर राज्याचे मंत्री झालेत याचे भान जनतेने सुद्धा ठेवणे आवश्यक आहे. विकासकामे व भेटीगाठींसाठी थोडासा संयम ठेवलाच पाहिजे. एका बाजूला जनतेचे बरोबरच आहे. यावर्षी पाणीटंचाईचे संकट उद्भवणार असल्याची चाहूल जनतेला लागली आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १५ गावांसाठी असलेली नळयोजना महिनाभरापासून बंद आहे. पाच दिवसात नळयोजना सुरु होणार आशी खोटी उत्तरे अधिकारी देतात. लोकप्रतिनिधींना या उत्तराने हायसे वाटते, मात्र समस्या मार्गी लागत नाही याला काय म्हणावे? दरवर्षी पंचायत समिती कार्यालयात उन्हाळापुर्व पाणीटंचाई आढावा सभा घेतली जाते. या सभेचे अध्यक्ष आमदार असतात. यावर्षी १३ जानेवारीला सभा झाली. या सभेत मंत्रीमहोदय हजर राहू शकले नाहीत.अर्जुनी-मोरगाव बसस्थानकाचे १७ जानेवारी रोजी थाटात उद्घाटन पार पडले. अर्जुनी-मोरगाव-यवतमाळ या बससेवेला ना.बडोले यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. पण या बसचे वांधे संपलेले नाही. कधीकधी ही बस जातच नसल्याची ओरड प्रवाशांकडून केली जाते. यापूर्वी अर्जुनी येथून गोंदियासाठी बससेवा नव्हती. ती उद्घाटनानंतर सुरु करण्यात आली. एक नव्हे तर तीन फेऱ्या सुरु झाल्या. मात्र चालक-वाहक उपलब्ध राहात नसल्याने अनेकदा गोंदिया येथून बस येतच नाही. प्रवाशी बसच्या प्रतीक्षेत ताटकळत असतात. गोंदिया आगाराच्या ज्या बसेस आहेत, त्या ऐन ट्रेनच्या वेळेवर असल्याने पाहिजे तेवढ्या उपयोगी नाहीत. केवळ गोंदियाकडे जाणारी सकाळची बस अधिक सोईची आहे. अर्जुनी-मोरगाव ते कोहमारापर्यंत दिवसभर चालणारी एक बससेवा उपलब्ध झाल्यास प्रवाशांची गैरसोय टाळता येऊ शकते. सातत्याने मागणी करुनही या समस्येकडे लोकप्रतिनिधी व एसटी विभागाने अधिकारी कानाडोळा करतात.अर्जुनी-मोरगाव येथील एमआयडीसीचा प्रश्न रेंगाळत आहे. एक्सप्रेस ट्रेनचा अर्जुनी-मोरगाव येथे थांबा द्यावा. तेथे उड्डाणपुलाचा प्रश्न ऐरणीवर आहे. खासदार महोदय निवडून आल्यानंतर दिसतच नाही अशी ग्रामीण भागात ओरड आहे. या परिसरात बेरोजगारीचा भस्मासूर आहे. आपल्या साधनसमृद्धीवर आधारित उद्योगाला बराच वाव आहे. नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानावर कोट्यवधींचा खर्च होत आहे. मात्र येथे उद्यानच नाही. राष्ट्रीय उद्यानाची दुरवस्था झाली आहे. या राष्ट्रीय उद्यानाला गतवैभव कधी लाभेल याची पर्यटकांना प्रतीक्षा आहे.