शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

ग्रामसेवकांचे जि.प.समोर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 21:29 IST

राज्यातील २२ हजार ग्रामसेवकांनी प्रलबिंत मागण्यांना घेऊन ९ आॅगस्टपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. याच अंतर्गत मंगळवारी जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी जि.प.समोर धरणे आंदोलन करुन विविध मागण्यांचे निवेदन जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यातील २२ हजार ग्रामसेवकांनी प्रलबिंत मागण्यांना घेऊन ९ आॅगस्टपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. याच अंतर्गत मंगळवारी जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी जि.प.समोर धरणे आंदोलन करुन विविध मागण्यांचे निवेदन जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिले.ग्रामसेवकांनी त्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेकदा धरणे आंदोलन केले. मात्र शासनाने प्रत्येकवेळी वेळ मारुन नेली. ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी संवर्गाची पाचव्या वेतन आयोगापासूनची त्रृटी अद्यापही दूर करण्यात आलेली नाही. यामुळे ग्रामसेवकांमध्ये रोष व्याप्त आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी मंगळवारी सकाळपासून येथील जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. ग्रामसेवकांनी त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. शिष्टमंडळातर्फे विविध मागण्यांचे निवेदन जि.प. मुख्यकार्यकारी राजा दयानिधी यांना देण्यात आले. निवेदनातून ग्रामसेवक, ग्रामविकास पद रद्द करुन केवळ पंचायत समिती अधिकारी पद निर्माण करण्यात यावे, ग्रामसेवकांना प्रवासभत्ता शासन निर्णयाप्रमाणे देण्यात यावा, शैक्षणिक अहर्ता पदवीधर करावी, सन २०११ च्या लोकसंख्येवर आधारित सुधारित पदे वाढवून ती मंजूर करण्यात यावी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या वेतनातील त्रृटी दूर करणे, सन २००५ नंतर नियुक्त ग्रामसेवकांना जुनी पेशंन योजना लागू करावी,आदी मागण्यांचा समावेश होता. शिष्टमंडळात कार्तिक चव्हान, दयानंद फटींग, कमलेश बिसेन, सचिन कुथे, कविता बागडे, एल.आर.ठाकरे, सुनील पटले, सुरेश वाघमारे, ओ. के. रहांगडाले, सुषमा वाढई, सुभाष सिरसाम, रामेश्वर जमाईवार,परमेश्वर नेवारे यांचा समावेश होता.

टॅग्स :Morchaमोर्चा