शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
6
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
7
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
11
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
12
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
13
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
14
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
15
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
16
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
17
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
18
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
19
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
20
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’

सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:31 IST

कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा ऐच्छिक करण्यात यावा. त्यांच्यावर पीक विमा काढण्याची सक्ती करण्यात येवू नये, कर्जमाफीची रक्कम त्वरीत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी.

ठळक मुद्देपीक विमा ऐच्छिक करा : तहसीलदारांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा ऐच्छिक करण्यात यावा. त्यांच्यावर पीक विमा काढण्याची सक्ती करण्यात येवू नये, कर्जमाफीची रक्कम त्वरीत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी. या मागणीला घेवून सडक अर्जुनी तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षांनी येथील तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी (दि.१३) धरणे आंदोलन केले.सडक-अर्जुनी तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षांनी चार दिवसांपूर्वी डॉ. अविनाश काशीवार यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकारी व उपनिबंधक यांची भेट घेवून पीक विमा ऐच्छिक करण्याची मागणी केली होती. यावर त्वरीत निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. याच आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून तालुक्यातील सेवा सहकारी संस्थाच्या अध्यक्षांनी एकदिवसीय धरणे आंदोलन व उपोषण केले. या आंदोलनाला अनेकांनी पाठींबा दिला. जि.प.गटनेते गंगाधर परशुरामकर यांनी देखील आंदोलनाला समर्थन देत सहभाग घेतला. जिल्ह्यात मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. बºयाच गावांची पैसेवारी देखील कमी आहे. शासनाने तीन तालुके मध्यम स्वरुपाचे दुष्काळग्रस्त जाहीर केले आहे.सडक अर्जुनी तालुक्याची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असून पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत तालुक्यातील पीक विमाधारक शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यात आली नाही. पीक कर्जाची उचल करताना शेतकºयांना पीक विमा काढणे अनिवार्य केले आहे.पीक विमा कंपन्या हंगामादरम्यान शेतकऱ्यांना पीक विम्या काढण्याची सक्ती करतात. बँकाकडून जबरदस्तीने पीक विम्याची रक्कम कर्जातून कपात केली जाते. मात्र यंदा जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असून तालुक्यातील एकाही शेतकºयाला नुकसान भरपाई देण्यात आली नाही. त्यामुळे शेतकºयांमध्ये रोष व्याप्त आहे.शासनाने पीक विम्याची सक्ती न करता ते ऐच्छिक करावे. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा काढण्याची गरज वाटेल ते काढतील. मात्र इतर शेतकऱ्यांना त्याची सक्ती करु नये. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीची रक्कम पात्र शेतकºयांच्या खात्यावर त्वरीत जमा करण्यात यावी. येत्या हंगामापासून पीक विमा ऐच्छिक करण्यात यावा, आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. आंदोलनात सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अविनाश काशिवार, मीताराम देशमुख, जागेश्वर धनभाते, मनोहर काशिवार, ईश्वर कोरे, आकोजी रहेले, तेजराम मुंगलमारे, परसराम सुकारे, के. बी. परशुरामकर, डी. के. राऊत, एन.टी.पारधी, जे.एस.कुरसुंगे, एम.वाय.गायकवाड, डी. एन. गावतुरे, डी.डी.गौतम, धनलाल करचाल, शिवाजी गहाणे, अनिल गुप्ता यांच्यासह विविध गावातील सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष सहभागी झाले होते.