शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:31 IST

कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा ऐच्छिक करण्यात यावा. त्यांच्यावर पीक विमा काढण्याची सक्ती करण्यात येवू नये, कर्जमाफीची रक्कम त्वरीत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी.

ठळक मुद्देपीक विमा ऐच्छिक करा : तहसीलदारांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा ऐच्छिक करण्यात यावा. त्यांच्यावर पीक विमा काढण्याची सक्ती करण्यात येवू नये, कर्जमाफीची रक्कम त्वरीत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी. या मागणीला घेवून सडक अर्जुनी तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षांनी येथील तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी (दि.१३) धरणे आंदोलन केले.सडक-अर्जुनी तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षांनी चार दिवसांपूर्वी डॉ. अविनाश काशीवार यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकारी व उपनिबंधक यांची भेट घेवून पीक विमा ऐच्छिक करण्याची मागणी केली होती. यावर त्वरीत निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. याच आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून तालुक्यातील सेवा सहकारी संस्थाच्या अध्यक्षांनी एकदिवसीय धरणे आंदोलन व उपोषण केले. या आंदोलनाला अनेकांनी पाठींबा दिला. जि.प.गटनेते गंगाधर परशुरामकर यांनी देखील आंदोलनाला समर्थन देत सहभाग घेतला. जिल्ह्यात मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. बºयाच गावांची पैसेवारी देखील कमी आहे. शासनाने तीन तालुके मध्यम स्वरुपाचे दुष्काळग्रस्त जाहीर केले आहे.सडक अर्जुनी तालुक्याची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असून पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत तालुक्यातील पीक विमाधारक शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यात आली नाही. पीक कर्जाची उचल करताना शेतकºयांना पीक विमा काढणे अनिवार्य केले आहे.पीक विमा कंपन्या हंगामादरम्यान शेतकऱ्यांना पीक विम्या काढण्याची सक्ती करतात. बँकाकडून जबरदस्तीने पीक विम्याची रक्कम कर्जातून कपात केली जाते. मात्र यंदा जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असून तालुक्यातील एकाही शेतकºयाला नुकसान भरपाई देण्यात आली नाही. त्यामुळे शेतकºयांमध्ये रोष व्याप्त आहे.शासनाने पीक विम्याची सक्ती न करता ते ऐच्छिक करावे. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा काढण्याची गरज वाटेल ते काढतील. मात्र इतर शेतकऱ्यांना त्याची सक्ती करु नये. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीची रक्कम पात्र शेतकºयांच्या खात्यावर त्वरीत जमा करण्यात यावी. येत्या हंगामापासून पीक विमा ऐच्छिक करण्यात यावा, आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. आंदोलनात सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अविनाश काशिवार, मीताराम देशमुख, जागेश्वर धनभाते, मनोहर काशिवार, ईश्वर कोरे, आकोजी रहेले, तेजराम मुंगलमारे, परसराम सुकारे, के. बी. परशुरामकर, डी. के. राऊत, एन.टी.पारधी, जे.एस.कुरसुंगे, एम.वाय.गायकवाड, डी. एन. गावतुरे, डी.डी.गौतम, धनलाल करचाल, शिवाजी गहाणे, अनिल गुप्ता यांच्यासह विविध गावातील सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष सहभागी झाले होते.