शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

सर्वाधिक नफा देणारी गोंदिया-लांजी बस फेरी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 01:23 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून रापचे उत्पन्न वाढावे यासाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र रापचे अधिकारी, पर्यवेक्षक खासगी वाहतूकदारांशी संगनमत करून स्वत:चा लाभ करुन घेत असल्याचा आरोप आहे.

ठळक मुद्देसंगनमताचा संशय : अधिकारी व खासगी वाहतूकदारांचे साटेलोटे?

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून रापचे उत्पन्न वाढावे यासाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र रापचे अधिकारी, पर्यवेक्षक खासगी वाहतूकदारांशी संगनमत करून स्वत:चा लाभ करुन घेत असल्याचा आरोप आहे. यातूनच इतर फेºयांच्या तुलनेत अधिक नफा देणारी गोंदिया-रजेगाव-लांजी फेरी बंद करण्यात आल्याचा आरोप नरेश जैन यांनी केला आहे.गोंदिया-आमगाव-लांजी या फेरीचे परिवहन आयुक्तांकडून (मुंबई) मिळालेल्या चार परवान्यावर राप विभागीय कार्यालय भंडाराने सदर मार्गावर बसफेरी सुरू न करता परिवहन आयुक्त कार्यालय ग्वालीयरकडून (म.प्र.) स्वत:हून अर्ज देवून चारही परवाने निरस्त करवून घेतले. यात लाखो रूपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय देवरीचे सामाजिक कार्यकर्ते नरेश जैन यांनी केला आहे. सदर चारही परवाने खासगी वाहतूकदाराला मिळाले असून त्यांच्या बसफेºया सदर मार्गावर सुरू आहेत.त्यामुळेच ही बाब स्पष्ट होत आहे. महत्वाचे म्हणजे राप बसफेरी बंद करण्याबाबत कोणत्याही संबंधित कार्यालयाचे आदेश नसताना सदर फेरी बंद करण्यात आली आहे. याबाबत जैन यांनी अनेकदा परिवहन आयुक्त कार्यालय मुंबईचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महाव्यवस्थापक (वाहतूक) रा.प. मुंबई, परिवहन मंत्री, मुख्यमंत्री व विभाग नियंत्रक भंडारा यांना तक्रार देवून चौकशीची मागणी केली. मात्र त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवून कोणत्याही कार्यालयाने दखल घेतली नाही.भंडारा विभागातील सर्वाधिक भारमान देणारी गोंदिया-रजेगाव-लांजी ही फेरी अधिकृत परवाना असताना व परिवहन आयुक्त ग्वालीयर यांनी सदर फेरीचा परवाना ३० मार्च २०१२ रोजी मंजूर केला होता. त्याची मुदत ३१ मार्च २०१७ पर्यंत होती. नियमानुसार सदर परवान्यावर परवाना प्राप्त झाल्यापासून १२० दिवसांत वाहतूक सुरू करणे गरजेचे होते. मात्र रा.प. भंडारा विभागाने दुसºयाच दिवशी १ एप्रिल २०१२ पासून वाहतूक सुरू केली होती.त्यानंतर परिवहन आयुक्त मुंबई यांनी कोणतीही सहनिशा न करता ३१ मे २०१३ रोजी सदर फेरीचा परवाना रद्द केला. भंडारा विभागाने या रद्द परवान्यावर वाहतूक सुरूच ठेवली. तसेच ग्वालीयरच्या आयुक्त कार्यालयाने या परवान्याचा प्रवासी कर बरोबर प्रत्येक महिन्याला भंडारा विभागाकडून आगावू स्वीकारला.यात परिवहन आयुक्त कार्यालय ग्वालीयरची चूक नसून या परवान्याची प्रतिस्वाक्षरी मुदत ३१ मार्च २०१७ पर्यंत वैध असल्यामुळे त्यांनी नियमानुसार प्रवासी कर स्वीकारला. जर मुंबईच्या आयुक्त कार्यालयाने ३१ मे २०१३ रोजी सदर परवाना रद्द केला तर त्याची सूचना त्वरित परिवहन आयुक्त ग्वालीयर यांना देणे गरजेचे होते. परंतु कोणतीच सूचना न देता सदर परवाना मुंबई आयुक्त कार्यालयाने खासगी वाहतूकदारास दिला.१० दिवसांच्या प्रवाशी कराचे नुकसानसदर प्रकरणात गोंदियाचे तत्कालीन आगार व्यवस्थापक, तत्कालीन विभागीय वाहतूक अधिकारी राप भंडारा, तत्कालीन विभाग नियंत्रक व वाहतूक विभागातील पर्यवेक्षक यांनी खासगी वाहतूकदारांशी संगनमत करून, आर्थिक साटेलोटे करून वरिष्ठांचे कोणतेही आदेश नसताना सदर मार्गावरील फेरी २२ मार्च २०१६ रोजी बंद केली. विभाग नियंत्रक भंडारा यांनी परिवहन आयुक्त ग्वालीयर यांना ३० मार्च २०१६ रोजी अर्ज सादर करून सदर परवाना १ एप्रिल २०१६ पासून निरस्त करवून घेतला. या फेरीचा प्रवासी कर ३१ मार्च २०१६ पर्यंतचा भरणा करण्यात आला असता. मात्र त्यापूर्वीच १० दिवसअगोदर अकारण फेरी बंद करून रामच्या १० दिवसांच्या प्रवासी कराचे नुकसान करण्यात आले.जैन यांच्या तक्रारीकडे दुर्लक्षपरिवहन आयुक्त मुंबई यांच्या १८ डिसेंबर २०१५ च्या नुसार, गोंदियाचे तत्कालीन आगार व्यवस्थापक यांनी वरिष्ठांची दिशाभूल करून सदर फेरी बंद करण्याचे षडयंत्र रचले. विभाग नियंत्रक भंडारा यांनी खोट्या पत्राला ग्राह्य धरून आपली सहमती दर्शवून खोटा कट रचून सदर परवाना रद्द करवून घेतल्याचा आरोप आहे. परंतु सदर पत्र गोंदियाच्या आगार व्यवस्थापकांकडे कुठून आले, याची कोणतीच चौकशी करण्यात आली नाही. तसेच सदर पत्र परिवहन आयुक्त मुंबई यांनी परिवहन आयुक्त ग्वालीयरला उद्देशून लिहिले आहे. त्या पत्राचा अन्य कोणत्याही विभागाशी संबंध नसताना त्या पत्राची कोणतीच प्रत रापच्या मुंबई व भंडारा विभागांना देण्यात आली नाही. याची चौकशी करण्याची तक्रार नरेश जैन यांनी केली. मात्र त्यांच्या तक्रारीला विभाग नियंत्रकाने दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.