शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

मोरगावची शाळा इमारत जीर्णावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 21:14 IST

मोरगावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत जीर्ण झाली असून या धोकादायक इमारतीच्या दोन खोल्यात वर्ग भरत आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असून चिमुरड्याच्या जीवाशी खेळ केला जात आहे.

ठळक मुद्देदोन खोल्या धोकादायक : शाळा व्यवस्थापन समितीचा आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : मोरगावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत जीर्ण झाली असून या धोकादायक इमारतीच्या दोन खोल्यात वर्ग भरत आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असून चिमुरड्याच्या जीवाशी खेळ केला जात आहे. आगामी शैक्षणिक सत्रापूर्वी शाळेची नवीन इमारत अथवा डागडूजी झाली नाही तर शाळा व्यवस्थापन समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.मोरगाव येथे वर्ग एक ते आठ पर्यंतची शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहे. येथे १८६ विद्यार्थी विद्यार्जन करीत आहेत. उपलब्ध असलेल्या वर्गखोल्यांत तीन वर्गखोल्या कमी आहेत. वर्ग सुरु असताना एकदा कवेलू पडल्याचे सांगण्यात येते. मात्र सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. शाळेत एक सांस्कृतिक सभागृह आहे. मात्र त्याची पण अवस्था अंत्यत दयनीय आहे. ही इमारत अत्यंत जुनाट असून इमारतीचे अस्तरीकरण ठिकठिकाणी तुटलेले असून कधीही धोका संभवतो.यासंबंधात शाळा व्यवस्थापन समितीने अनेकदा ठराव पारीत करुन भीषण वास्तवाची कल्पना ग्रामपंचायत व पंचायत समितीला लेखी पत्राद्वारे कळविली आहे. मात्र याकडे सातत्याने कानाडोळा केला जातो असा आरोप शाळा व्यवस्थापन समितीने केला आहे. दुर्दैवाने एखादी गंभीर घटना घडल्यास त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाला जबाबदार धरण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.आगामी शैक्षणिक सत्रापूर्वी शाळा इमारतीचा प्रश्न व जुनाट जलशुद्धीकरण यंत्राच्या पुरवठ्यासंदर्भात निर्णय न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा ३० एप्रिलच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुनेश्वर शहारे, वैशाली गोबाडे, हेमंत लाडे, आसाराम सोनवाने, तानाजी लोदी, नरेंद्र लाडे, मनिषा शहारे, विद्या शहारे उपस्थित होते.जुन्या जलशुद्धीकरण यंत्राचा पुरवठाविद्यार्थ्यांना शुद्ध पेयजल उपलब्ध करुन देण्यासाठी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतच्यावतीने जलशुध्दीकरण यंत्र पुरविण्यात आले. या यंत्राची किंमत ९८ हजार रुपये असल्याचे सांगण्यात येते. मात्र ज्यावेळी या यंत्राचा पुरवठा करण्यात आला तो जुनाट होता असा शाळा समितीचा आरोप आहे. जलशुद्धीकरण यंत्र देऊन ग्रामपंचायत मोकळी झाली. मात्र यासाठी आवश्यक वीज जोडणी करुन देण्यात आली नाही. शाळा प्रशासनाने एक हजार ८०० रुपये किंमतीचे इलेक्ट्रीक साहित्य खरेदी करुन जोडणी केली व हे जलशुद्धीकरण यंत्र सुरु करण्याचा प्रयत्न केला. मात्र यात वारंवार बिघाड होत असल्याने विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. शाळेने केलेल्या खर्चाचे बिल ग्रामपंचायतला सादर केले. मात्र त्याची पूर्तता अद्यापही शाळेला करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. जुनाट जलशुद्धीकरण यंत्राचा पुरवठा करण्यात आल्याची तक्रार शाळा व्यवस्थापन समितीसह काही सुज्ञ गावकऱ्यांनी वर्षभरापूर्वीच केली मात्र या गंभीर बाबीकडे लक्ष द्यायला कुणाकडेही सवड नाही.

टॅग्स :Schoolशाळा