शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

सप्टेंबर महिना काळाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 05:00 IST

१३ दिवसांत जिल्ह्यात तब्बल १६७२ रूग्ण वाढले असून २९ जणांचा जीव ही गेला आहे. ही धक्कादायक आकडेवारी बघता सप्टेंबर महिना काळाचाच ठरत असल्याचे दिसत आहे. देशात मार्च महिन्यात कोरोना आपले पाय पसरू लागला व जिल्ह्यात १ रूग्णापासून कोरोनाची सुरूवात झाली. ती संख्या आजघडीला ३००० रूग्ण संख्या पार करून गेली आहे.

ठळक मुद्दे१३ दिवसांत १६७२ कोरोना रूग्ण : आतापर्यंत २९ जणांचा गेला जीव

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा कहर काही केल्या कमी होत नसताना दिसत आहे. कोरोना रूग्ण संख्या झपाटयाने वाढत असतानाच धक्कादायक बाब म्हणजे सर्वाधिक रूग्ण सप्टेंबर महिन्यात वाढल्याचे दिसत आहेत. १३ दिवसांत जिल्ह्यात तब्बल १६७२ रूग्ण वाढले असून २९ जणांचा जीव ही गेला आहे. ही धक्कादायक आकडेवारी बघता सप्टेंबर महिना काळाचाच ठरत असल्याचे दिसत आहे.देशात मार्च महिन्यात कोरोना आपले पाय पसरू लागला व जिल्ह्यात १ रूग्णापासून कोरोनाची सुरूवात झाली. ती संख्या आजघडीला ३००० रूग्ण संख्या पार करून गेली आहे.यावरून जिल्ह्यात झपाटयाने कोरोना आपली पकड मजबूत करीत असल्याचे दिसत आहे.दररोज रूग्ण संख्या वाढत चालली असून सोबतच मृतांचा आकडाही वाढत आहे. यामुळे जिल्हावासी चांगलेच धास्तावलेले आहेत. झपाटया वाढत चाललेल्या या रूग्ण संख्येवर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरत असल्याचे चित्रही दररोजची रूग्ण वाढीची आकडेवारी बघता दिसून येते.जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती तसेच आतापर्यंत वाढत गेलेली रूग्ण संख्या बघता जिल्ह्यासाठी सप्टेंबर महिना काळाचा ठरल्याचे दिसत आहे. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील रूग्ण संख्या झपाटयाने वाढली असून २ अंकी रूग्ण संख्या सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच ३ अंकात नोंदविली जात आहे.सप्टेंबर महिन्यात २ तारखेला प्रथमच १३७ रूग्ण आढळून आले होते व ती जिल्ह्यातील पहिलीची ३ अंकातील रूग्ण संख्या असल्याचे दिसते.त्यानंतर ही ३ अंकातील रूग्ण संख्या आजापर्यंत कायम आहे. हेच कारण आहे की, रूग्ण संख्या सप्टेंबर महिन्यात ३१५८ वर पोहचली असून फक्त १३ दिवसांत तब्बल १६७२ रूग्ण नोंदविण्यात आले आहेत.५० टक्के रूग्ण १३ दिवसांतीलसप्टेंबर महिन्यात सुरूवातीपासूनच ३ अंकांत रूग्ण आढळून येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे रूग्ण संख्या झपाटयाने वाढली असून आतापर्यंत १३ दिवसांत चक्क १६७२ रू ग्ण नोंदविण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण ३१५८ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असून सप्टेंबर महिन्यातील १३ दिवसांत १६७२ रूग्ण यात आहेत. म्हणजेच, जिल्ह्यातील ५० टक्के रूग्ण सप्टेंबर महिन्यातील १३ दिवसांत आढळून आले आहेत.मृतांचा आकडाही सर्वाधिकजिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत ४९ रूग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र आश्चर्याची बाब अशी की, आतापर्यंतच्या या ४९ रूग्णांमधील ५० टक्के रूग्ण सप्टेंबर महिन्यात दगावले असून त्यांची आकडेवारी या १३ दिवसांत २९ एवढी आहे. म्हणजेच, सप्टेंबर महिन्यात रूग्णांची संख्या सर्वाधिक असतानाच मृतांचीही संख्याही सर्वाधिक असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या