शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

निकालासाठी आता महिनाभर धाकधूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 05:00 IST

जिल्हा परिषदेच्या एकूण ५३ तर पंचायत समितीच्या १०६ जागा आहेत. जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी २७ जागांची मॅजिक फिगर गाठावी लागणार आहे. जो पक्ष हा आकडा गाठेल त्याच्यासाठी सत्तेचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत्र लढले, युती अथवा आघाडी झाली नाही. त्यामुळे मतांचे विभाजन झाले आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीत पूर्ण जोर लावला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  स्थानिक स्वराज्य संस्थामधील २७ टक्के ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे या जागा सर्वसाधारण करून १८ जानेवारीला निवडणूक होत आहे. तर मंगळवारी ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून जि.प.च्या ४५, पंचायत समितीच्या ८६ आणि नगरपंचायतच्या ४५ जागांसाठी मतदान घेण्यात आले. मात्र सर्व जागांची मतमोजणी एकाचवेळी म्हणजे १९ जानेवारीला हाेणार आहे. त्यामुळे जवळपास महिनाभर उमेदवारांना निकालासाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याने त्यांची धाकधूक कायम राहणार आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ५३ तर पंचायत समितीच्या १०६ जागा आहेत. जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी २७ जागांची मॅजिक फिगर गाठावी लागणार आहे. जो पक्ष हा आकडा गाठेल त्याच्यासाठी सत्तेचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत्र लढले, युती अथवा आघाडी झाली नाही. त्यामुळे मतांचे विभाजन झाले आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीत पूर्ण जोर लावला होता. तर उमेदवारी देताना काही इच्छुकांना वगळल्याने त्यांनी बंडखोरी करीत निवडणुकीत वेगळी चूल मांडली. तसेच काही अपक्ष उमेदवारांनी आव्हान उभे ठाकले. त्यामुळे याचा काही राजकीय पक्षाच्या उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेसाठी ७० तर पंचायत समितीसाठी ७३.७६ टक्के मतदान झाले. मतदानाची आकडेवारी ही समाधानकारक आहे. जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढली तेव्हा तेव्हा याचा विजयाचा समीकरणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे कोणत्या उमेदवाराचे समीकरण यामुळे बिघडणार हे १९ जानेवारीलाच कळणार आहे. मात्र तोपर्यंत भाऊ कोण चालला आणि हा निघू शकतो, या चर्चांनी उमेदवारांची धाकधूक मात्र निश्चित वाढणार आहे. 

युवा मतदारांचा कल कुणाला? - जिल्हा परिषद आणि नगरपंचायतच्या मतदानाची टक्केवारी ही ७० च्या वर आहे. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात युवा मतदारांनीसुद्धा मतदानाचा हक्क बजाविला. युवा मतदार शिक्षित आणि जागरूक असल्याने ते पक्ष पाहून नव्हे, तर उमेदवार पाहून मतदान करतात. त्यामुळे या मतदारांचा कल नेमका कुणाला मिळाला, हेदेखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

लक्ष आता ३० जांगाकडे - ओबीसी प्रवर्गाच्या ३० जागा सर्वसाधारण करुन त्यासाठी १८ जानेवारीला मतदान होणार आहे. त्यामुळे यापैकी अधिकाधिक जागा कशा निवडून आणता येतील, यावर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे लक्ष असणार आहे. त्यामुळे या जागांसाठी ‘काटे की टक्कर’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

टॅग्स :Electionनिवडणूक