शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
2
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
3
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
4
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
5
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
6
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
7
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
8
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
9
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
11
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
12
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
13
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
14
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
15
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
16
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
17
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
18
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
19
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
20
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!

आई-वडिलांना लेक लाडकी

By admin | Updated: July 11, 2016 01:41 IST

कन्या भू्रण हत्या रोखण्यासाठी शासनाने सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पुरस्कार योजना सुरू केली आहे.

नरेश रहिले गोंदियाकन्या भू्रण हत्या रोखण्यासाठी शासनाने सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पुरस्कार योजना सुरू केली आहे. या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील २४०७ दाम्पत्य पात्र ठरले असून लेक लाडकी असल्याने त्यांनी मुलांची हाव न ठेवता कुटुंब नियोजन केले आहे. मागील १४ वर्षात २०५१ लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत २ कोटी एक लाख ५७ हजार रूपये देण्यात आले आहेत. मात्र एप्रिल २०१६ पासून आतापर्यंत ३५६ कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात आला नाही ही मात्र शोकांतिका आहे. महाराष्ट्र सरकारने कन्या भ्रूणहत्या रोेखण्यासाठी तसेच मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी १ एप्रिल १९९५ पासून सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पुरस्कार योजना सुरू केली. १ एप्रिल २००७ ला सुधारित योजनेला मंजूरी दिली. या योजनेचा लाभ फक्त दारिद्रय रेषेखालील जीवन जगणाऱ्या कुटुंबाना देण्यात येतो. या योजनेंतर्गत सन २००१ ते २०१४-१५ पर्यंत २ कोटी एक लाख ५७ हजार रूपये निधी जिल्हा परिषद आरोग्य विभागाला मिळाला. हा निधी २०५१ लाभार्थ्यांना वाटप करण्यात आला. यात सन २००१-०२ मध्ये १०, २००२-०३ मध्ये ४, २००३-०४ मध्ये ५०, २००४-०५ मध्ये ३३०, २००५-०६ मध्ये १२८, २००६-०७ मध्ये ११४, २००७-०८ मध्ये ९१, २००८-०९ मध्ये ३०, २००९-१० मध्ये ७९, २०१०-११ मध्ये ४८, २०११-१२ मध्ये ५८४, २०१२-१३ १६९, २०१३-१४ १८७, २०१४-१५ मध्ये १९१ लोकांना लाभ देण्यात आला आहे. असा मिळतो लाभयोजनेंतर्गत एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास २ हजार रोख व मुलीच्या नावाने ८ हजार रूपयाचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात जमा केले जातात. दोन मुलीनंतर कुटुंब नियोजन केल्यास व्यक्तीला दोन हजार व दोन्ही मुलींच्या नावाने प्रत्येकी चार हजार असे आठ हजार राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात दिले जातात. या योजनेसाठी लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. त्यांचे नाव दारिद्र रेषेखालील यादीत असावे. तसेच पती किंवा पत्नीची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया राज्य शासन मान्यताप्राप्त संस्था किंवा नोंदणीकृत रूग्णालयात १ एप्रिल २००७ नंतर होणे आवश्यक आहे.निधी अभावी अडले ३५६ प्रस्तावसन २०१५-१६ या वर्षात एक किंवा दोन मुलींवर कुटुंब नियोजन करून या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३५६ जोडप्यांनी प्रस्ताव टाकले. मात्र निधी नसल्याचे कारण दाखवित या कुुटुंबाना मदत मिळाली नाही. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात समस्यायोजनेच्या लाभासाठी मुलींच्या नावाने डाकघरात राष्ट्रीय बचत प्रमाण पत्र तयार केले जाते. परंतु डाकघराकडून प्रत्येक वेळी नवीन फॉर्मेट दिला जातो. या योजनेंतर्गत आरोग्य विभागाला प्राप्त होणाऱ्या अर्जाला पाहून प्रमाणपत्राची संख्या वाढविणे आवश्यक आहे. परंतु डाकघराने या प्रमाणपत्राची संख्या निश्चीत केली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही. डाकघराच्या आॅनलाईन कामकाजामुळेही त्रास होतो. आरोग्य विभागाकडून लाभार्थ्याची स्वाक्षरी केली जाते. लाभार्थ्याचा पॅनकार्ड, आधार कार्ड व फॉर्मेट नुसार स्वाक्षरीची समस्या असते.