शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

आई-वडिलांना लेक लाडकी

By admin | Updated: July 11, 2016 01:41 IST

कन्या भू्रण हत्या रोखण्यासाठी शासनाने सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पुरस्कार योजना सुरू केली आहे.

नरेश रहिले गोंदियाकन्या भू्रण हत्या रोखण्यासाठी शासनाने सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पुरस्कार योजना सुरू केली आहे. या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील २४०७ दाम्पत्य पात्र ठरले असून लेक लाडकी असल्याने त्यांनी मुलांची हाव न ठेवता कुटुंब नियोजन केले आहे. मागील १४ वर्षात २०५१ लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत २ कोटी एक लाख ५७ हजार रूपये देण्यात आले आहेत. मात्र एप्रिल २०१६ पासून आतापर्यंत ३५६ कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात आला नाही ही मात्र शोकांतिका आहे. महाराष्ट्र सरकारने कन्या भ्रूणहत्या रोेखण्यासाठी तसेच मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी १ एप्रिल १९९५ पासून सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पुरस्कार योजना सुरू केली. १ एप्रिल २००७ ला सुधारित योजनेला मंजूरी दिली. या योजनेचा लाभ फक्त दारिद्रय रेषेखालील जीवन जगणाऱ्या कुटुंबाना देण्यात येतो. या योजनेंतर्गत सन २००१ ते २०१४-१५ पर्यंत २ कोटी एक लाख ५७ हजार रूपये निधी जिल्हा परिषद आरोग्य विभागाला मिळाला. हा निधी २०५१ लाभार्थ्यांना वाटप करण्यात आला. यात सन २००१-०२ मध्ये १०, २००२-०३ मध्ये ४, २००३-०४ मध्ये ५०, २००४-०५ मध्ये ३३०, २००५-०६ मध्ये १२८, २००६-०७ मध्ये ११४, २००७-०८ मध्ये ९१, २००८-०९ मध्ये ३०, २००९-१० मध्ये ७९, २०१०-११ मध्ये ४८, २०११-१२ मध्ये ५८४, २०१२-१३ १६९, २०१३-१४ १८७, २०१४-१५ मध्ये १९१ लोकांना लाभ देण्यात आला आहे. असा मिळतो लाभयोजनेंतर्गत एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास २ हजार रोख व मुलीच्या नावाने ८ हजार रूपयाचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात जमा केले जातात. दोन मुलीनंतर कुटुंब नियोजन केल्यास व्यक्तीला दोन हजार व दोन्ही मुलींच्या नावाने प्रत्येकी चार हजार असे आठ हजार राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात दिले जातात. या योजनेसाठी लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. त्यांचे नाव दारिद्र रेषेखालील यादीत असावे. तसेच पती किंवा पत्नीची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया राज्य शासन मान्यताप्राप्त संस्था किंवा नोंदणीकृत रूग्णालयात १ एप्रिल २००७ नंतर होणे आवश्यक आहे.निधी अभावी अडले ३५६ प्रस्तावसन २०१५-१६ या वर्षात एक किंवा दोन मुलींवर कुटुंब नियोजन करून या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३५६ जोडप्यांनी प्रस्ताव टाकले. मात्र निधी नसल्याचे कारण दाखवित या कुुटुंबाना मदत मिळाली नाही. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात समस्यायोजनेच्या लाभासाठी मुलींच्या नावाने डाकघरात राष्ट्रीय बचत प्रमाण पत्र तयार केले जाते. परंतु डाकघराकडून प्रत्येक वेळी नवीन फॉर्मेट दिला जातो. या योजनेंतर्गत आरोग्य विभागाला प्राप्त होणाऱ्या अर्जाला पाहून प्रमाणपत्राची संख्या वाढविणे आवश्यक आहे. परंतु डाकघराने या प्रमाणपत्राची संख्या निश्चीत केली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही. डाकघराच्या आॅनलाईन कामकाजामुळेही त्रास होतो. आरोग्य विभागाकडून लाभार्थ्याची स्वाक्षरी केली जाते. लाभार्थ्याचा पॅनकार्ड, आधार कार्ड व फॉर्मेट नुसार स्वाक्षरीची समस्या असते.