शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
2
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
3
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
4
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
5
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
6
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
7
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
8
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
9
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
10
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
11
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
12
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
13
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
14
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
15
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
16
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
17
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
18
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

मंत्रिपदाची लॉटरी कुणाला? सत्तांतरनंतर राजकीय चर्चेला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2022 16:38 IST

आ. विजय रहांगडाले, विनोद अग्रवाल, परिणय फुके यापैकी कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागते याकडे जिल्हावासीयांच्या नजरा लागल्या आहेत.

ठळक मुद्देभाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, मुंबईकडे लक्ष

गोंदिया : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राजीनामा दिल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर भाजपने सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या. शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री पदाची तर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर शिंदे मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळते याची चर्चा सुरू आहे. भाजपकडून कुणाला संधी दिली जाणार याची चर्चा आहे. आ. विजय रहांगडाले, विनोद अग्रवाल, परिणय फुके यापैकी कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागते याकडे जिल्हावासीयांच्या नजरा लागल्या आहेत.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षांतच कोसळले. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात जिल्ह्यातून कुणालाच संधी मिळाली नव्हती. पालकमंत्री सुद्धा बाहेरचा देण्यात आला होता. त्यामुळे जिल्हावासीयांमध्ये नाराजीचा सूर होता. जिल्ह्यातील आमदाराला मंत्री केल्यास जिल्ह्यातील प्रश्न अधिक प्रभावीपणे मार्गी लावता येतील, असा सूर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे भाजप मंत्रिमंडळ स्थापन करताना या गोष्टीचा विचार करण्याची शक्यता आहे. आ. विजय रहांगडाले, विनोद अग्रवाल व परिणय फुके यांच्यापैकी नेमकी कुणाला संधी मिळते हे महत्वपूर्ण ठरणार आहे.

माजी पालकमंत्री परिणय फुके हे फडणवीस यांच्या जवळचे समजले जातात. त्यामुळे या नवीन सरकारमध्ये फुके यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आ. विजय रहांगडाले यांना मंत्रिमंडळात अथवा महामंडळावर नियुक्ती दिली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबतचा निर्णय भाजपचे वरिष्ठ नेते घेणार आहेत. या सर्व घडामोडींमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

नगर परिषद निवडणुकांवर होणार परिणाम

राज्यातील सत्तातंराचे परिणाम जिल्ह्यात आगामी होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे. सत्तांतरामुळे भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून, या निवडणुकांसाठी आता ते अधिक जोमाने कामाला लागण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीच्या गोटात शांतता

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेते, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये शांतता आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या सर्व घडामोडींवर कुठलेही भाष्य न करता वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील त्यानुसार काम करणार असल्याचे सांगितले.

उद्धव ठाकरे जो आदेश देतील त्याचे पालन करू

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील नवीन सरकार स्थापन होणार असल्याने राज्यात नवीन समीकरणाला सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे समर्थक शिवसैनिक काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख मुकेश शिवहरे यांना विचारणा केली असता पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील, तो मान्य राहील, असे सांगितले.

टॅग्स :Politicsराजकारणgondiya-acगोंदिया