शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान संतापला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
3
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
4
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
5
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
6
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
7
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
8
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
9
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
10
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
11
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
12
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
13
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
14
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
15
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 
16
आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार ४ महिन्यांत निवडणुका घ्या; मिनी विधानसभेचा मार्ग मोकळा
17
पदवीसाठी २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी ; उद्यापासून प्रवेश
18
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
19
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
20
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन

२५ हजार शेतकऱ्यांचे अर्ज ‘मिस मॅच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 21:10 IST

शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफी जाहीर केली.

ठळक मुद्दे४१ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ : अर्धे शेतकरी अजूनही वेटींगवर

आॅनलाईन लोकमतगोंदिया : शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफी जाहीर केली. मात्र सात महिन्याचा कालावधी लोटूनही जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र ठरलेले शेतकरी अद्यापही वेटींगवर आहे. तर तब्बल २५ हजार शेतकऱ्यांचे अर्ज मिस मॅच झाल्याने शेतकऱ्यांना पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे.कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यासाठी शासनाकडून तारीख पे तारीख दिली जात आहे. कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन असल्याने याला अधिक विलंब होत आहे. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस जिल्ह्यातील एकूण ८४ हजार शेतकरी पात्र असल्याचा दावा शासनानेच केला. पण, आत्तापर्यंत यापैकी केवळ ४१ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यामुळे अद्यापही अर्धे शेतकरी वेटींगवर असल्याचे चित्र आहे.शेतकरी कर्जमाफीकरिता जिल्ह्यातील १ लाख ६० हजार शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले. यापैकी आत्तापर्यंत केवळ ४१ हजार २५१ अर्ज पात्र ठरले असून त्यांची यादी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दिली. जिल्हा बँकेने आत्तापर्यंत २८ हजार ५४ शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीच्या रक्कमेपोटी ८९ कोटी ७७ लाख रुपयांची रक्कम जमा केली आहे. तर नियमित कर्ज फेडणाऱ्या १३ हजार २५१ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १८ कोटी ६८ लाख रुपये जमा केले असून आत्तापर्यंत एकूण ४१ हजार २५१ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला आहे.शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस जिल्हा बँकेचे एकूण ७३ हजार शेतकरी सभासद पात्र ठरले होते. त्यापैकी ४१ हजार शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला. तर २५ हजार शेतकºयांचे अर्ज आणि बँकाची माहिती जुळत नसल्याने हे अर्ज तातपुरते अपात्र ठरविण्यात आल्याची माहिती आहे. कर्जमाफीची प्रक्रिया राबविण्यात जिल्हा बँकेने आघाडी घेतली असली तरी राष्ट्रीयकृत बँका यात माघारल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.अधिकाऱ्यांचा वॉचशासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस सात महिन्याचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही यातील घोळ संपत नसल्याने कर्जमाफीस पात्र ठरलेले शेतकरी अद्यापही लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. कर्जमाफीच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी शासनाने प्रत्येकी दोन जिल्ह्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. हे अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी दाखल झाले असून बँका आणि सहकार निबंधक कार्यालयाकडून कर्जमाफीच्या प्रक्रियेचा आढावा घेत आहेत.पुन्हा दोन महिने लागणारकर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले. मात्र या अर्जातील माहिती आणि बँकाची माहिती जुळत नसल्याने बँकाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.आत्तापर्यंत केवळ ४१ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून अर्धे शेतकरी अद्यापही प्रतीक्षेत आहे. त्यामुळे या प्रक्रियेस पुन्हा दोन महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.