शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

२५ हजार शेतकऱ्यांचे अर्ज ‘मिस मॅच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 21:10 IST

शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफी जाहीर केली.

ठळक मुद्दे४१ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ : अर्धे शेतकरी अजूनही वेटींगवर

आॅनलाईन लोकमतगोंदिया : शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफी जाहीर केली. मात्र सात महिन्याचा कालावधी लोटूनही जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र ठरलेले शेतकरी अद्यापही वेटींगवर आहे. तर तब्बल २५ हजार शेतकऱ्यांचे अर्ज मिस मॅच झाल्याने शेतकऱ्यांना पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे.कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यासाठी शासनाकडून तारीख पे तारीख दिली जात आहे. कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन असल्याने याला अधिक विलंब होत आहे. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस जिल्ह्यातील एकूण ८४ हजार शेतकरी पात्र असल्याचा दावा शासनानेच केला. पण, आत्तापर्यंत यापैकी केवळ ४१ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यामुळे अद्यापही अर्धे शेतकरी वेटींगवर असल्याचे चित्र आहे.शेतकरी कर्जमाफीकरिता जिल्ह्यातील १ लाख ६० हजार शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले. यापैकी आत्तापर्यंत केवळ ४१ हजार २५१ अर्ज पात्र ठरले असून त्यांची यादी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दिली. जिल्हा बँकेने आत्तापर्यंत २८ हजार ५४ शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीच्या रक्कमेपोटी ८९ कोटी ७७ लाख रुपयांची रक्कम जमा केली आहे. तर नियमित कर्ज फेडणाऱ्या १३ हजार २५१ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १८ कोटी ६८ लाख रुपये जमा केले असून आत्तापर्यंत एकूण ४१ हजार २५१ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला आहे.शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस जिल्हा बँकेचे एकूण ७३ हजार शेतकरी सभासद पात्र ठरले होते. त्यापैकी ४१ हजार शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला. तर २५ हजार शेतकºयांचे अर्ज आणि बँकाची माहिती जुळत नसल्याने हे अर्ज तातपुरते अपात्र ठरविण्यात आल्याची माहिती आहे. कर्जमाफीची प्रक्रिया राबविण्यात जिल्हा बँकेने आघाडी घेतली असली तरी राष्ट्रीयकृत बँका यात माघारल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.अधिकाऱ्यांचा वॉचशासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस सात महिन्याचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही यातील घोळ संपत नसल्याने कर्जमाफीस पात्र ठरलेले शेतकरी अद्यापही लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. कर्जमाफीच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी शासनाने प्रत्येकी दोन जिल्ह्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. हे अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी दाखल झाले असून बँका आणि सहकार निबंधक कार्यालयाकडून कर्जमाफीच्या प्रक्रियेचा आढावा घेत आहेत.पुन्हा दोन महिने लागणारकर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले. मात्र या अर्जातील माहिती आणि बँकाची माहिती जुळत नसल्याने बँकाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.आत्तापर्यंत केवळ ४१ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून अर्धे शेतकरी अद्यापही प्रतीक्षेत आहे. त्यामुळे या प्रक्रियेस पुन्हा दोन महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.