शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

ग्रंथवाचनाने सुसंस्कृत होण्याचा संदेश

By admin | Updated: February 1, 2016 01:48 IST

मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जिल्हा ग्रंथालय संघ गोंदिया...

गोंदिया ग्रंथोत्सव : ‘गं्रथांनी काय दिले’ यावर महाचर्चागोंदिया : मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जिल्हा ग्रंथालय संघ गोंदिया व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शारदा वाचनालयात तीन दिवशीय ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (दि.३०) ‘ग्रंथांनी काय दिले’ या विषयावर महाचर्चा झाली. यात ग्रंथांनी दिला सुसंस्कृत होण्याचा संदेश, असा सूर वक्त्यांनी काढला.सदर महाचर्चेत नागपूर विभाग ग्रंथालय संघाचे कार्यवाह डॉ. गजानन कोठेवार, नागपूर गांधी स्मारक वाचनालयचे सचिव सुनील पाटील, आदर्श कनिष्ठ महाविद्यालय आमगाव येथील प्रा. तोषिका पटले, नमाद महाविद्यालयाचे प्रा. एस.बी. रामटेके, डिलेश्वरी टेंभरे, तरूण पुंडे यांनी सहभाग घेतला. डॉ. कोठेवार म्हणाले, ग्रंथ मनुष्याला जीवन जगण्याचे बळ देतात. ग्रंथांमुळे जीवनाचा पाया भक्कम होतो. तर ग्रंथ वाचनाने मनुष्य सुसंस्कृत जीवन जगण्याची कला आत्मसात करतो. मनुष्य परिपक्व होतो व त्याला संघर्ष करण्याची शक्ती प्राप्त होते. भूतकाळाचा विचार न करता आपले ध्येय गाठण्यासाठी वाटेल ते कष्ट करण्याची ताकत ग्रंथ देतात. म्हणूनच उपस्थित युवक-युवतींना डॉ. कोठेवार यांनी साने गुरूजींच्या आईने त्यांना दिलेला ‘बेटा शिक व मोठा हो,’ असा संदेश अत्यंत कळकळीने दिला. सुनील पाटील यांनी अभ्यासासाठी केलेले वाचन व ग्रंथवाचनातील वाचन यातील फरक सांगितला. परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी केलेले वाचन तात्पुरते ठरते. तर ग्रंथवाचनाने जीवनाला दिशा मिळते. ग्रंथांमुळे महापुरुष घडले व महापुरूषांनी ग्रंथातील दिलेल्या संदेशामुळे आपण घडतो, असे मत व्यक्त केले. प्रा. तोषिका पटले म्हणाल्या, जीवनात ग्रंथ सर्वत्र आहेत. फक्त विद्यार्थ्यांनी ते आत्मसात करण्यासाठी त्या मार्गावर वळले पाहिजे. लोकशाही सुदृढ करण्याचे काम ग्रंथ करतात. आपण कितीही आधुनिक झालो, तंत्रज्ञानाने अद्यावत झालो तरी ग्रंथांची महत्ता आपण नाकारु शकत नाही. संतुुलित समाज निर्माण करण्याचे कार्य ग्रंथ करतात, असे त्या म्हणाल्या. प्रा.एस.बी. रामटेके यांनी मनुष्याने मनुष्यसारखे वागावे, अशी शिकवण ग्रंथ प्रदान करतात असे सांगून ग्रंथातील एका संदेशात मनुष्याचे अवघे जीवन बदलवून टाकण्याची क्षमता असते, असे सांगितले. महाचर्चेत डिलेश्वरी टेंभरे व तरूण पुंडे यांनीही ग्रंथांची महत्ता सांगितली. ग्रंथ मनुष्याला अखेरपर्यंत साथ देतात. जीवनात संवेदना, तरलता, प्रगती, उत्कर्ष सर्व काही ग्रंथ प्रदान करतात. ग्रंथांमुळे जगण्याची कला समजते, असे सांगितले. संचालन विद्या ठाकरे यांनी केले. या वेळी महाविद्यालयीन युवक-युवती, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)