शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

व्यापाऱ्यांना बाजार समित्यांचे अभय

By admin | Updated: November 10, 2015 02:22 IST

दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांना आपला धान विकल्याशिवाय पर्याय नाही.

शेतकऱ्यांची लुबाडणूक : सहा उत्पन्न बाजार समित्यांकडून कारवाईच नाहीगोंदिया : दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांना आपला धान विकल्याशिवाय पर्याय नाही. पण हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अगतिकतेचा फायदा घेत ठिकठिकाणी व्यापाऱ्यांकडून कमी भागात शेतकऱ्यांकडील धान विकत घेतला जात आहे. या नियमबाह्य खरेदीला रोखण्यासाठी त्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यास कृषी उत्पन्न बाजार समित्या कुचराई करीत आहे.यावर्षी कमी पाऊस आणि नंतर रोगाच्या प्रादुर्भावातून वाचविलेल्या धानाची शेतकऱ्यांनी चुरणी-मळणी केली. दिवाळीपूर्वी धान विकुन दिवाळीचा सण साजरा करण्याची आशा त्यांना होती. मात्र आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू होऊ न शकल्याने त्यांच्या उत्साहावर विरजण पडले. दिवाळीपूर्वी धान खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे नाईलाजास्तव ते धान व्यापाऱ्यांना पडक्या भावात विकावे लागले. ठिकठिकाणचे व्यापारी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट करीत आहेत. मात्र त्या व्यापाऱ्यांना अभयदान देण्याचे काम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून सुरू आहे. आधारभूत किमतीच्या कमी किमतीत व्यापाऱ्यांनी धान खरेदी केली असताना त्या व्यापाऱ्यांवर अद्याप कारवाईच झालेली नाही. गोरेगाव तालुका वगळता जिल्ह्यात कोणत्याच कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी चुकीच्या पध्दतीने धान खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केलेली नाही. (तालुका प्रतिनिधी)चारच ठिकाणी बाजार समित्यांकडून धान खरेदीगोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठ दिवसांपासून धान खरेदी सुरू झाली असून ३० हजार पोती धान खरेदी केल्याचे सचिव जोशी यांनी सांगितले. आधारभूत किमतीत धान खरेदी करण्यात येत असून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची लुबाडणूक करू नये अशा सूचना सर्व व्यापाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. परंतु एकाही व्यापाऱ्यावर कारवाई केली नाही. अर्जुनी-मोरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारपासून (दि.९) धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहे. फक्त १०० पोती धान खरेदी करण्यात आल्याची माहिती सचिव अशोक काळबांधे यांनी दिली. परंतु व्यापाऱ्यांवर कारवाई झाली नाही. आमगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे २३ हजार ३५ क्विंटल धान खरेदी केल्याची माहिती सचिव सुभाष चव्हाण यांनी दिली. सामान्य धानाला १४५० तर चांल्या धानाला १७०० रूपये भाव देण्यात आला आहे. निकृष्ट दर्जाच्या धानाला १२५० ते १२७५ भाव देण्यात येत आहे. जे धान निकृष्ट दर्जाचे आहे त्यासाठी शेतकऱ्यांकडून लिहून घेण्यात येत आहे. व्यापाऱ्यांवर एकही कारवाई झाली नाही. सडक-अर्जुनी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे धान खरेदी सुरू झालीच नाही. व्यापाऱ्यांकडून पडलेल्या किमतीत मोठ्या प्रमाणात धान खरेदी केला जात आहे, असे सभापती डॉ.अविनाश काशिवार यांनी सांगितले आहे. देवरी येथे जागा उपलब्ध नसल्याच्या कारणाने धान खरेदीला कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरूवातच केली नाही, असे सभापती रमेश ताराम यांनी सांगितले. याचा फायदा व्यापारी घेत आहेत. गोरेगाव येथे धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. परंतु शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या पाच व्यापाऱ्यांवर कारवाई केल्याची माहिती सचिव आशिष बघेले यांनी दिली. तिरोडा येथेही धान खरेदीला सुरूवात झाली नाही, तर व्यापाऱ्यांवरही कारवाई झाली नसल्याची माहिती सभापती चिंतामन रहांगडाले यांनी दिली आहे.क्विंटलमागे ३०० चे नुकसान१ नोव्हेंबरपासून धान खरेदी केंद्र सुरू होतील अशी शेतकऱ्यांना आशा होती. त्यानंतर दोन-चार दिवस त्यांनी वाटही पाहिली, मात्र धान खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे नाईलाजाने शेतकऱ्यांनी दिवाळी सण करण्यासाठी मिळेल त्या किमतीत व्यापाऱ्यांना धान विकणे सुरू केले. आधारभूत किमतीच्या कितीतरी कमी किमतीने व्यापाऱ्यांकडून धान खरेदी सुरू आहे. शासनाने सामान्य धानाला १४१० तर ‘ए’ ग्रेड धानाला १४६० रूपये किंमत ठेवली. मात्र व्यापाऱ्यांकडून ११०० व १२०० क्विंटल या दराने धान खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना क्विंटलमागे ३०० रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. पैश्याची चणचण असल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने हे नुकसान सहन करावे लागत आहे.