शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जि.प.चे समीकरण ठरविणार पुढील विधान परिषदेचे गणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 05:00 IST

पक्षाचे वरिष्ठ नेते जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पंचायत निवडणुका होऊ घातलेल्या क्षेत्रात तळ ठोकून बसले आहेत. या निवडणुकीत ज्या पक्षाचे उमेदवार सर्वाधिक निवडून येतील, त्याला विधान परिषदेची निवडणूक लढविणे तेवढेच सोपे जाणार आहे. त्यामुळे नंतर घोडेबाजार करण्यापेक्षा आताच जेवढा जोर लावता येईल तेवढा लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ठळक मुद्देसंभाव्य उमेदवार लावताहेत जोरअधिकाधिक उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न

अंकुश गुंडावार लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक २१ डिसेंबरला होऊ घातली आहे. ही निवडणूक जरी स्थानिक स्वराज्य संस्थांची असली तरी या निवडणुकीवर पुढील वर्षी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीचे भविष्य अवलंबून आहे. या निवडणुकीतील विजयाचे समीकरण विधान परिषदेच्या उमेदवाराचे गणित ठरविणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावल्याने चूरस वाढली आहे. भंडारा-गोंदिया विधान परिषदेसाठी पुढील वर्षी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदेचे सदस्य मतदान करतात. त्यामुळे या निवडणुकीत चांगलाच घोडेबाजार होते. ही निवडणूक म्हणजे जसकी जितनी थैली भारी उसका उतना वजन भारी, अशी असते. विशेष म्हणजे पुढील वर्षी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पंचायतची निवडणूक होत आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या संभाव्य उमेदवार व राजकीय पक्षांनी या निवडणुकीत जोर लावला आहे. आपल्या पक्षाचे अधिकाधिक उमेदवार कसे निवडून येतील, यासाठी मागील दोन महिन्यांपासून रननिती आखली जात आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पंचायत निवडणुका होऊ घातलेल्या क्षेत्रात तळ ठोकून बसले आहेत. या निवडणुकीत ज्या पक्षाचे उमेदवार सर्वाधिक निवडून येतील, त्याला विधान परिषदेची निवडणूक लढविणे तेवढेच सोपे जाणार आहे. त्यामुळे नंतर घोडेबाजार करण्यापेक्षा आताच जेवढा जोर लावता येईल तेवढा लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. कारण याच निवडणुकीतील विजयाच्या समीकरणावरून विधान परिषदेच्या निवडणुकीचे गणित ठरणार आहे. त्यामुळे यावेळेच्या जिल्हा परिषद निवडणुकीत चांगलीच चूरस निर्माण होण्याची शक्यता आहे. अधिकाधिक उमेदवार निवडून यावे, यासाठी सर्वच पक्षांनी तगडे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्यासाठी चाचपणी करणे सुरू केले आहे. त्यामुळेच उमेदवारी जाहीर करण्यास विलंब होत आहे. 

आयात केलेला उमेदवार नकोचा सूर- जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. काही मतदारसंघ आरक्षित झाल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला. त्यामुळे त्यांनी आता दुसऱ्या मतदारसंघातून तयारी करणे सुरू केले आहे. पण, त्याच ठिकाणी त्याच पक्षाच्या उमेदवारांनी आधीपासून फिल्डिंग लावून ठेवली होती. तर, ऐनवेळी पक्षाकडून बाहेरील आयात केलेल्याला उमेदवारी देऊ म्हणून बाहेरचा उमेदवार नकोच, अन्यथा आम्ही वेगळी चूल मांडू, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांसमोरसुद्धा पेच निर्माण झाला आहे. 

महिला उमेदवारांचा शोध घेताना लागतोय कस - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहे. तर, काही ठिकाणी सोडतीदरम्यान सर्वसाधारण महिला असे निघाले, त्यामुळे महिला सदस्यांची संख्या जिल्हा परिषदेत वाढण्याची शक्यता आहे. पण, महिला उमेदवारांचा शोध घेताना सर्वच राजकीय पक्षांचा सध्या कस लागत आहे. 

विधान परिषदेत चेहरे बदलणार - पुढील वर्षी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यातील चार-पाच जणांची नावे चर्चेत आहे. तर, मागील निवडणुकीत नेतृत्व करणारे उमेदवार या निवडणुकीत नेतृत्व करणार नसून त्यासाठी नवीन चेहऱ्यांचा शोध घेतला जात आहे. दोन प्रमुख राजकीय पक्षांकडून यासाठी दोन नावेसुद्धा निश्चित करण्यात आली आहे. हे नवीन चेहरे कोण, याचीच चर्चा सध्या जिल्ह्यात आहे.

 

टॅग्स :Electionनिवडणूक