शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
2
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
3
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
4
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
5
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
6
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
7
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
8
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
9
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
10
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
11
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
12
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
13
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
14
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
15
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
16
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
17
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
18
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
19
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
20
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांच्या अन्नावर अनेक जण होताहेत मालामाल

By admin | Updated: August 5, 2014 23:31 IST

गोरगरीब नागरिक अर्धपोटी राहू नये यासाठी शासनाने सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत अल्पदरात धान्य देण्याची योजना अस्तित्वात आणली. मात्र गोरगरीबांच्या या अन्नधान्याची खरेदी

गोंदिया : गोरगरीब नागरिक अर्धपोटी राहू नये यासाठी शासनाने सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत अल्पदरात धान्य देण्याची योजना अस्तित्वात आणली. मात्र गोरगरीबांच्या या अन्नधान्याची खरेदी करून स्वत: मालामाल होणारे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय झाले आहे. सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत स्वस्त धान्य दुकानांमार्फत दारिद्र्य रेषेखालील लोकांना अल्पदराने अन्नधान्य पुरविले जाते. विविध क्लृप्त्यांचा वापर करून हे अन्नधान्य पळविणारे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय आहे. या रॅकेटमध्ये धनदांडगे व्यापारी असल्याचे बोलल्या जात आहे. आदिवासी, ग्रामीण भागातील जनता अशा रॅकेटच्या प्रलोभनाला बळी पडत आहेत. या कामासाठी धनदांडग्या व्यापाऱ्यांनी पगार अथवा कमिशनवर दलालांची नेमणूक केली आहे. हे दलाल ग्रामीण भागात स्वस्त धान्य संकलनाचे काम करतात. प्रत्येक दलालाचे नित्याचे ग्राहक ठरलेले आहेत. या दलालांमार्फत प्रत्येक महिन्याच्या १ ते १५ तारखेपर्यंत खेड्यापाड्यात हा गोरखधंदा चालतो. दारिद्र्यरेषेखालील कुटूंब, अंत्योदय व अन्नपूर्णा व अन्न सुरक्षा योजनेतील सुमारे ५० टक्के लाभार्थी या आमिषाला बळी पडत असल्याचे सांगण्यात येते.या योजनेंतर्गत लाभार्थ्याला प्रत्येक महिन्याला मिळणाऱ्या रेशनची बाजारभावापेक्षा कमी किंमत लावून रेशनची ग्राहकाला उचल न करू देता काही स्वस्त धान्य दुकानदार रोखीने पैसे देतात. लाभ मिळणारा वर्ग गरीब असतो. त्यांच्याजवळ रेशन खरेदीसाठी वेळेवर पैसे उपलब्ध नसतात. धान्याची गरज असल्याने ते स्वस्त धान्य दुकानदारांशी संगणमत करतात. बाजारभावापेक्षा कमी दराने त्याला मिळणाऱ्या धान्याची किंमत लावली जाते. ग्राहकाला मिळणारे सवलतीचे दर व दुकानदाराने ठरविलेली किंमत यामधील तफावतीच्या रकमेचे धान्य त्या ग्राहकाला दिले जाते. घरातील पैशाचा वापर न करता तो ग्राहक अर्धे धान्य खरेदी करतो व अर्धे धान्य दुकानदाराच्या घशात जाते, असा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. धान्य खरेदी करणारे दलाल ग्राहकाला स्वस्त धान्य दुकानदारांकडे घेऊन जातात. दुकानदारासमक्ष त्या ग्राहकाला त्याला मिळणाऱ्या दोन ते तीन महिन्याच्या धान्याची किंमत लावून ग्राहकाला रोखीने पैसे दिले जातात. कालांतराने दलाल हा या धान्याची थेट दुकानदाराकडून उचल करतो. या पद्धतीने आर्थिक अडचणीत असलेल्या ग्राहकांना हेरून दलाल त्यांची गरज भागवितात.अनेक दलालांनी या क्लृप्त्यांचा वापर करून आदिवासी, नक्षलग्रस्त ग्रामीण भागात बस्तान मांडले आहे. खरेदी केलेल्या धान्याची साठवणूक करण्यासाठी भाड्याचे घरसुद्धा घेतले असल्याच्या चर्चा आहेत. दलाल हे साठवून ठेवलेले धान्य मालवाहू वाहनातून व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानापर्यंत पोहोचवितात. व्यापारी हे बहुधा राईसमिल मालक असतात किंवा दलालांमार्फत ते धान्य त्यांच्यापर्यंत पोहोचविले जाते. रेशनचे धान्य साफसफाई करून बाजारभावाच्या किमतीने बाजारात सुद्धा विकले जाते.हल्ली निकृष्ट दर्जाचे धान्य उच्च दर्जाचे बनविणारे यंत्र बाजारात उपलब्ध आहेत. या यंत्राद्वारे खरेदी केलेल्या धान्यावर प्रक्रिया केली जाते. नंतर अधिकच्या किमतीने खुल्या बाजारात त्याची विक्री होते किंवा व्यापारी हाच तांदूळ लेव्हीच्या स्वरुपात शासनाला देतात. एकंदरित शासनाचा माल शासनालाच अधिकच्या दराने पुरविला जातो. एकदा उपयोगात आणलेला माल पुन्हा नव्याने पहिल्यासारखा उपयोगात यावा म्हणून प्रक्रिया (रिसायकलिंग) केली जाते. याचपद्धतीने केरोसिनचा सुद्धा व्यापार चालतो. केरोसिन विक्रेतेसुद्धा सर्वसामान्य नागरिक नाहीत. त्यांची गोरगरीबांवर आधीच जरब असते. याचा लाभ घेत ते केरोसीन वेळेवर न देणे, प्रमाण कमी देणे, असले प्रकार करतात. ग्रामीण भागात केरोसिनचा घरगुती वापर कमी होतो. थोडेफार जागरुक नागरिक केरोसीन सवलतीच्या दराने विकत घेतात व या दलालांना जादा दराने विक्री करतात. यात केरोसिनचा गैरवापर होतो. डिजेलचे दर वाढल्यामुळे चक्क ट्रक व ट्रॅक्टर्समध्ये केरोसिनचा वापर होत आहे. केरोसिनच्या या काळाबाजारामुळे अनेक व्यापारी मालामाल झाले आहेत. संबंधित विभागांना हप्ता मिळत असल्याने ते सुद्धा मूग गिळून गप्प आहेत. आर्थिक चणचण असल्यामुळे अनेक ग्राहक केरोसिनची मात्रा कमी प्रमाणात विकत घेतात. ग्राहकाला महिन्याकाठी मिळणाऱ्या संपूर्ण केरोसिनची विक्री होत असते. (तालुका प्रतिनिधी)