शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

मनोहरभाईंनी शिक्षणाची ज्योत प्रज्वलित केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 23:55 IST

स्व. मनोहरभाई पटेल यांनी ७० वर्षांपूर्वी गोंदिया-भंडारा जिल्ह्यात लावलेल्या शिक्षणाच्या रोपट्याचे आता वटवृक्षात रुपातंर झाले. त्यांनी दोन्ही जिल्ह्यात शिक्षणाची गंगा आणली. यासाठी त्यांना संघर्ष देखील करावा लागला.

ठळक मुद्देअखिलेश यादव : स्व. मनोहरभाई पटेल जयंती व सुवर्ण पदक वितरण कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्व. मनोहरभाई पटेल यांनी ७० वर्षांपूर्वी गोंदिया-भंडारा जिल्ह्यात लावलेल्या शिक्षणाच्या रोपट्याचे आता वटवृक्षात रुपातंर झाले. त्यांनी दोन्ही जिल्ह्यात शिक्षणाची गंगा आणली. यासाठी त्यांना संघर्ष देखील करावा लागला. मनोहरभाई पटेल यांनी शिक्षणाची प्रज्वलित केलेली ज्योत अविरत ठेवण्यासाठी त्यांचे सपुत्र प्रफुल्ल पटेल प्रयत्नरत आहेत. त्यांच्या शिक्षण संस्थामुळेच या भागातील लोकजीवन बदलले असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी शुक्रवारी (दि.९) येथे केले.स्व. मनोहरभाई पटेल यांच्या ११२ व्या जयंती निमित्त सुर्वण पदक वितरण कार्यक्रम येथील डी. बी.सायन्स कॉलेजच्या प्रांगणावर आयोजित करण्यात आला होता. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. प्रफुल पटेल होते. प्रमुख पाहुणे म्हणून आ.अबु आझमी, प्रसिध्द गायक सोनू निगम, हास्य कलावंत राजू श्रीवास्तव, नरेंद्र वर्मा, उत्कर्ष पारेख, नरेश बन्संल, आ. प्रकाश गजभिये, माजी मंत्री अनिल देशमुख, उमादेवी अग्रवाल, वर्षा पटेल, माजी मंत्री बंडूभाऊ सावरबांधे, विलास श्रृंगारपवार, नाना पंचबुध्दे, माजी.आ. दिलीप बन्सोड, हरिहरभाई पटेल, माजी. आ. राजेंद्र जैन, अनिल बावणकर, रामरतन राऊत, दिलीप बन्सोड, सेवक वाघाये, मधुकर कुुकडे, विजय शिवणकर, नरेश माहेश्वरी, दीपम पटेल उपस्थित होते. अखिलेश यादव म्हणाले, प्रफुल्ल पटेल यांनी शैक्षणिक संस्थासह मोठे प्रकल्प आणून या भागाचा कायापालट केला. सरकारने या सर्व प्रकल्प आणि योजनांचा योग्य उपयोग केल्यास शेतकºयांचे भाग्य बदलण्यास मदत होईल. प्रफुल्ल पटेल यांच्याशी आपले जुने कौटुंबिक संबंध आहेत. ते संबंध यापुढे देखील कायम राहतील. सत्तेवर असताना सर्वच जण कार्यक्रमांना बोलवितात मात्र सत्तेवर नसताना देखील प्रफुल्ल पटेल यांनी आम्हाला बोलवून आमचा सन्मान केला. यामुळे आधीचे कौटुंबिक संबंध अधिक घट्ट झाले आहेत. खा.पटेल म्हणाले, मनोहरभाई पटेल यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्यात शिक्षणाची बीजे पेरली. या भागातील शेतकरी व जनता समृध्द व्हावी, यासाठी त्यांनी अनेक सिंचन प्रकल्प आणले. दोन्ही जिल्ह्यातील शैक्षणिक मागसलेपण दूर व्हावे, यासाठी त्यांनी एकाच दिवशी २२ हायस्कूल सुरू केले. ते खºया अर्थाने विकासाचे महामेरू होते. त्यांचे कार्य अविरतपणे सुरू राहावे यासाठी आपण प्रयत्न आहोत. लोक व समाजासाठी काम करणारा नेहमीच मोठा होत असतो. यापुढे या भागाच्या विकासासाठी आपण कटिबध्द राहू अशी ग्वाही पटेल यांनी दिली. अबु आझमी म्हणाले, शिक्षणा शिवाय दुसरे कोणतेही मोठे कार्य नाही. ही बाब ७० वर्षांपूर्वी मनोहरभाई पटेल यांनी ओळखून या भागात शैक्षणिक संस्था स्थापन केल्या.त्यामुळे ते दूरदृष्टीचे नेते होते. सध्या देशात विचित्र घडामोडी सुरू आहेत. त्यामुळे लोकांनी विचलित न होता सर्वांनी एकसंघ राहण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी शेरो शायरी केली. नफरत की दिवारे गिरा दो, देश गद्दारो को बता दो की धर्ती अबंर हमारा है, हा शेर सादर करुन एकतेचा संदेश दिला. कार्यक्रमाचे संचालन आ. राजेंद्र जैन यांनी केले.अखिलेश यांना आठवले बालपणउत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे शुक्रवारी (दि.९) गोंदिया येथे आले होते. या दरम्यान त्यांनी गोंदिया शिक्षण संस्थेव्दारा संचालित मनोहरभाई पटेल मिल्ट्री स्कूलला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांना त्यांच्या बालपणाची आठवण झाली. मी देखील मिल्ट्री स्कूलमध्ये होतो तेव्हा शाळेला सुट्टया केव्हा लागणार हे कँलेडर पाहून रोज दिवस मोजत होतो असे सांगत त्यांनी त्यांच्या बालपणातील आठवणीना उजाळा दिला.विद्यार्थ्यांचा सुवर्ण पदकाने गौरवया वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुनम रोहणकर, ओजल उरकुडकर, मोनिका नखाते, हर्षा बालवानी, नुतन मनगटे, अश्विनी रोकडे, सिया ठाकुर, ओंकार चोपकर, रिचा बिसेन, वैष्णवी शेंडे, दिशा अग्रवाल, दिपा पंजवानी, तोशाली भोयर, नुपूर खंडेलवाल, संयुक्ता मृत्युंजय सिंग, प्रिती देशपांडे, विशाल मन्सूर अहमद या गुणवंत विद्यार्थ्यांचा सुवर्ण पदक व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रगतीशिल शेतकरी भालचंद्र ठाकूर, तुकाराम भाजीपाले, अमृत मदनकर, विनोद गायधने आणि डॉ. देवाशिष चटर्जी, धनंजय दलाल यांचाही सत्कार करण्यात आला.संदेसे आते है...ने बांधला समाप्रसिध्द गायक सोनू निगम याचे मंचावर आगमन होतातच उपस्थितांच्या आनंदाला पारा उरला नाही. यानंतर सोनू निगमने नमस्ते गोंदिया म्हणून उपस्थितांशी संवाद साधला. संदेसे आते है, हे गीत सादर करून सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. यानंतर दिवाना तेरा.. ये मर्जी मेरी, अभी मुझमे मे कही ते, हर घडी बदल रही है जिंदगी आदी गीते सादर केली. तर कल हो ना या गाण्याने समारोप केला. सोनू निगम यांने सादर केलेल्या गीतांनी समा बांधल्याचे चित्र होते.यादव यांनी दिले शेतकऱ्याला निमंत्रणमनोहरभाई पटेल जयंतीचे औचित्य साधून नटवरलाल माणकिलाल दलाल महाविद्यालयाच्या प्रागंणात कृषी प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती. गोंदियातील प्रतिष्ठित शेतकरी भालचंद्र ठाकूर, महेंद्र ठाकूर यांच्या शेतातील स्ट्राबेरी, केळी, अनार, बोरासह अनेक फळांचा आकार पाहुण अखिलेश यादव यांना आश्चर्य वाटले. सेंद्रीय शेतातील पीक, फळे बघून सर्वच पाहूणे भारावून गेले होते. ठाकूर यांना बोर व स्ट्राबेरीसह इतर फळ आम्हाला द्या असे सांगत ठाकूर यांना शेतीवर चर्चा करण्यासाठी त्यांनी उत्तरप्रदेशाला येण्याचे निमंत्रण दिले.राजू श्रीवास्तवच्या चुटकुल्यांनी श्रोते लोटपोटप्रसिध्द हास्य कलावंत राजू श्रीवास्तव यांनी यावेळी स्वच्छ भारत अभियान व नोटबंदीवर सादर केलेल्या छोट्या छोट्या चुटकल्यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित श्रोते चांगलेच लोटपोट झाले होते. त्यांनी अमिताभ बच्चन, राजकुमार, दिलीपकुमार यांची मिमिक्री सादर केली. तसेच मध्ये माँ बम्लेश्वरी माता की जय असा जयघोष करीत उपस्थितांमध्ये जोश भरला.

टॅग्स :mitएमआयटी