शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

मामा तलावांमुळे वाढणार ३७ कोटींनी उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 21:53 IST

भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता गोंडराजाने जिल्ह्यात त्या काळी तयार केलेल्या मामा तलावांची आज दुरवस्था झाली आहे. या तलावांची दुरूस्ती झाल्यास शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढू शकते.

ठळक मुद्दे४१७ मामा तलावांची दुरूस्ती : ८ हजार शेतकºयांना होणार लाभ

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता गोंडराजाने जिल्ह्यात त्या काळी तयार केलेल्या मामा तलावांची आज दुरवस्था झाली आहे. या तलावांची दुरूस्ती झाल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढू शकते. अशा तलावांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सन २०१६-१७ या वर्षात ४१७ मामा तलावांची दुरूस्ती करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. या तलावांच्या दुरूस्तीमुळे ८ हजार शेतकºयांना सिंचनाचा लाभ होणार आहे. ३७ कोटी रुपयांनी उत्पन्न वाढविण्यास मदत होणार आहे.जिल्ह्यातील ४१७ मामा तलावांची विशेष दुरूस्ती करण्याचा उपक्रम जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे. यातील १५५ मामा तलावांची दुरूस्ती करण्यात आली आहे. या तलावांमुळे दुरूस्तीपूर्वी शेतकऱ्यांना १७ कोटी ७७ लाखाचे उत्पन्न मिळत होते. परंतु आता मामा तलावांच्या दुरूस्तीचे काम सुरू झाल्याने परिसरातील शेतकºयांची शेती सिंचित होईल. त्यामुळे ते उत्पन्न आता ५५ कोटी २७ लाखांवर जाणार आहे. ३७ कोटी ५० लाखांचा शुध्द नफा या मामा तलवांमुळे शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. २०१६-१७ या वर्षात विशेष दुरूस्तीसाठी निवडण्यात आलेल्या मामा तलवांपैकी गोंदिया तालुक्यात ७० तलावांची निवड करण्यात आली. या तलावांची दुरूस्ती झाल्यास १४०० शेतकऱ्यांचे ७ कोटी ६३ लाखाचे उत्पन्न वाढेल. गोरेगाव तालुक्यात ५४ तलावांची निवड करण्यात आली. या तलावांची दुरूस्ती झाल्यास १०८० शेतकऱ्यांचे ४ कोटी ३५ लाखाचे उत्पन्न वाढेल. तिरोडा तालुक्यात ३५ तलावांची निवड करण्यात आली. या तलावांची दुरूस्ती झाल्यास ७०० शेतकऱ्यांचे ३ कोटी २५ लाखाचे उत्पन्न वाढेल. आमगाव तालुक्यात २९ तलावांची निवड करण्यात आली. या तलावांची दुरूस्ती झाल्यास ५८० शेतकऱ्यांचे ३ कोटी ५४ लाखाचे उत्पन्न वाढेल. देवरी तालुक्यात ६४ तलावांची निवड करण्यात आली.या तलावांची दुरूस्ती झाल्यास १२८० शेतकऱ्यांचे २ कोटी २४ लाखाचे उत्पन्न वाढेल. सडक-अर्जुनी तालुक्यात २६ तलावांची निवड करण्यात आली. या तलावांची दुरूस्ती झाल्यास ५२० शेतकऱ्यांचे २ कोटी ५ लाखाचे उत्पन्न वाढेल. सालेकसा तालुक्यात ५१ तलावांची निवड करण्यात आली. या तलावांची दुरूस्ती झाल्यास १०२० शेतकऱ्यांचे ५ कोटी ५० लाखाचे उत्पन्न वाढेल. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ८८ तलावांची निवड करण्यात आली. या तलावांची दुरूस्ती झाल्यास १७६० शेतकºयांचे ८ कोटी ९४ लाखाचे उत्पन्न वाढणार आहे.वर्षभर पीक घेण्यासाठी सिंचनया ४१७ मामा तलावांमुळे दुरूस्तीपूर्वी कमी पीक घेतले जात होते. आता या पिकाचे क्षेत्र वाढत आहे. खरीप धानाचे क्षेत्र पूर्वी ४७५८ हेक्टर होते दुरूस्तीनंतर ८५६८ हेक्टर होणार आहे. खरीप डाळी क्षेत्र पूर्वी ३०८ हेक्टर होते दुरूस्तीनंतर ५५४ हेक्टर होणार आहे. खरीप तेलबिया क्षेत्र पूर्वी ७७ हेक्टर होते दुरूस्तीनंतर १४० हेक्टर होणार आहे. उन्हाळी धानपिक घेतले जात नव्हते दुरूस्तीनंतर ६८७ हेक्टर होणार आहे. रब्बी गहू क्षेत्र पूर्वी १५४ हेक्टर होते दुरूस्तीनंतर २७७ हेक्टर होणार आहे. रबी हरभरा क्षेत्र पूर्वी ३०८ हेक्टर होते दुरूस्तीनंतर ५५४ हेक्टर होणार आहे. रब्बी डाळ क्षेत्र पूर्वी ७७० हेक्टर होते दुरूस्तीनंतर १३८५ हेक्टर होणार आहे. भाजीपालाचे उत्पादन घेतले जात नव्हते दुरूस्तीनंतर ५४९ हेक्टर मध्ये घेतले जाणार आहे.मामा तलावांचे पुनरूज्जीवन कार्यक्रमातून तलावांची दुरूस्ती केली जात आहे. आतापर्यंत १५५ तलावांची दुरूस्ती करण्यात आली आहे. लवकरच सर्वच तलावांची कामे पूर्ण होतील. या अभियानाचा ८ हजार शेतकºयांना लाभ होईल.- गोवर्धन बिसेन,शाखा अभियंताल.पा. विभाग जि.प.गोंदिया.असा होईल फायदाजिल्ह्यातील ४१७ मामा तलावांची दुरूस्ती झाल्यास पूर्वी ४७५८.२० हेक्टर असणारी सिंचन क्षमता ८५६७.६७ हेक्टर होईल. म्हणजेच ३८४५.६७ हेक्टर सिंचन क्षमतेत वाढ होईल. मत्स्य पालनाला वाव मिळेल, लागवड क्षेत्र वाढणार आहे. दुरूस्तीपूर्वी ६३७५ हेक्टरमध्ये पिक घेतले जात होते. दुरूस्तीनंतर १२७१४ हेक्टरमध्ये पीक घेतले जाईल. ६३३९ हेक्टर लागवड क्षेत्र वाढणार आहे. मत्स्यव्यवसाय रोजगार उपल्बध होऊन दरडोई उत्पन्न वाढेल.