शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 01:21 IST

बळीराजा शेतकरी जिल्हा संघाच्यावतीने जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा व शेतीचे पंचनामे तत्काळ करावे, या मागण्यांचे निवदेन देण्यात आले.

ठळक मुद्देशेतीचे पंचनामे तत्काळ करा : जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बळीराजा शेतकरी जिल्हा संघाच्यावतीने जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा व शेतीचे पंचनामे तत्काळ करावे, या मागण्यांचे निवदेन देण्यात आले.हवामान विभागाच्या सूचनेप्रमाणे शेतकºयांनी भातपिकाच्या पेरणीला ७ जूनपासून सुरूवात केली होती. परंतु पाऊस न आल्यामुळे शेतकºयांनी पुन्हा ३० जूनपासून दुबार पेरणी केली. पण गोंदिया जिल्ह्यात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे भातपिकाची रोवणी केवळ १५ टक्केच झाली.रोवणी करण्याची शेवटची तारिख १५ आॅगस्ट असते. त्यानंतर रोवणी केली तर धानपीक अत्यल्प प्रमाणात होते. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे.धानाचे पीक पूर्णत: करपले असून आता धानपिकाची रोवणी करता येणार नाही. पालकमंत्री बडोले यांनी १५ आॅगस्टपर्यंत पाऊस आला नाही तर जिल्ह्यात दुष्काळ घोषित करू, अशी घोषणा केली होती. परंतु या संदर्भात आतापर्यंत शासनाने काहीही घोषणा केली नाही.पाऊस अत्यल्प पडल्यामुळे शेती व पिण्यासाठी पाण्याची मोठी टंचाई आतापासूनच सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा अन्यथा सर्व शेतकरी रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करतील, असा इशारा बळीराजा शेतकरी संघातर्फे देण्यात आला आहे.निवेदन देताना संघाचे अध्यक्ष संजयसिंह टेंभरे, चुटियाचे सरपंच चंद्रकला तुरकर, उपसरपंच रामू शरणागत, माजी सरपंच रतनलाल बघेले, कुंडलीक तुरकर, डोमाजी टेंभरे, दुलीचंद कटरे, कुवरलाल शरणागत, मुन्नालाल तुरकर, दुर्गाप्रसाद कुरंजेकर, समलीक तुरकर, धनलाल गौतम, अशोक टेंभरे, जीवनलाल पटले, देवनाथ येलसरे, मुन्नालाल गौतम, हरिलाल गराकाटे व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेतकºयांच्या मागण्यागोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, शेतकºयांना सरसकट कर्जमुक्ती द्या, शेतीचे पंचनामे करून शेतकºयांना तत्काळ नुकसान भरपाई द्या, जनावरांच्या चाºयाची छावणी ग्रामपंचायत पातळीवर सुरू करा, शेतकºयांचे कृषी पंपाचे विद्युत बिल पूर्ण माफ करा, शेतकºयांना नवीन कर्जाची व्यवस्था करून द्या, गावांमध्ये पिण्याचे पाणी कमी झाल्यामुळे े टँकर सुरू करा, रोहयोच्या कामांना तत्काळ मंजूर करून कामे सुरू करा, शेतमजुरांचे पलायन थांबविण्यासाठी त्यांना तात्काळ कामे द्या, ज्या बंद व अपूर्ण पाणी पुरवठा योजना आहेत त्यांना तत्काळ सुरू करा.