शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

मजुराचा मुलगा ठरला सुवर्णपदकाचा मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 21:44 IST

आई-वडील मोल मजुरी करुन संसाराचा गाडा चालवित असतात. त्यातच घरातील परिस्थिती अत्यंत हलाखीची झोपडीवजा घर, घरात अभ्यासपूरक वातावरणाचा अभाव अशा बिकट परिस्थितीवर मात करीत विज्ञान, कला व वाणिज्य शाखेतून एकाचवेळी पदविका अभ्यासक्रमात सर्वाधिक गुण घेऊन मागासवर्गीय विद्यार्थ्यातून प्रथम येऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुवर्ण पदक पटकाविण्याची किमया गोंदिया तालुक्यातील गंगाझरी येथील एका विद्यार्थ्याने करुन दाखविली आहे.

ठळक मुद्देपरिस्थितीवर मात : गंगाझरीच्या विद्यार्थ्याची उंच भरारी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आई-वडील मोल मजुरी करुन संसाराचा गाडा चालवित असतात. त्यातच घरातील परिस्थिती अत्यंत हलाखीची झोपडीवजा घर, घरात अभ्यासपूरक वातावरणाचा अभाव अशा बिकट परिस्थितीवर मात करीत विज्ञान, कला व वाणिज्य शाखेतून एकाचवेळी पदविका अभ्यासक्रमात सर्वाधिक गुण घेऊन मागासवर्गीय विद्यार्थ्यातून प्रथम येऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुवर्ण पदक पटकाविण्याची किमया गोंदिया तालुक्यातील गंगाझरी येथील एका विद्यार्थ्याने करुन दाखविली आहे.लष्कर किशोर पाटील असे त्या विद्यार्थ्याचे नाव असून त्याने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. गोंदिया तालुक्यातील आदिवासीबहुल व मागासलेले गाव म्हणून गंगाझरीची ओळख आहे. किशोर व उमाबाई पाटील यांचा लष्कर हा मुलगा, घरात कुठलाही शिक्षणाचा गंध नाही. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची त्यातच किशोर व उमा मजुरी करुन आपला संसार चालवितात.मुलाला अभ्यासाची आवड असल्याने आई-वडिलांनी अहोरात्र मेहनत करुन मुुलाला शिकविण्याचा निर्धार केला. त्याला शिक्षणासाठी पैसा कमी पडू नये म्हणून त्यांनी अहोरात्र कष्ट केले. आपल्या शिक्षणासाठी आई-वडील मेहनत घेत आहेत. तेव्हा आपणही मेहनतीने अभ्यास करुन आई-वडीलांचे ऋण फेडावे. अशी मनाशी गाठ बांधून लष्करनेही परिस्थितीवर मात करण्याचे ठरविले. सध्या तो धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या नियमित विद्यार्थी असून नियमित असलेल्या विज्ञान शाखेबरोबर त्याचे खाजगीरित्या कला व वाणिज्य शाखेची पदविका परीक्षा दिली होती. या तिन्ही परीक्षेत एकाचवेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून मागासवर्गीय विद्यार्थ्यातून त्याने अव्वल क्रमांक पटकाविला आहे. त्यांच्या या यशाबद्दल शनिवारी (दि.१९) विद्यापीठाच्या १०६ दिक्षांत समारंभात महामहिम राज्यपाल विद्यासागर राव, एच.सी.एल. दिल्लीचे संस्थापक शिव वादर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विद्यापीठाचे कुलगुरु सिध्दार्थ विनायक काणे, प्रभारी कुलगुरु प्रमोद येवले यांच्या उपस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुवर्ण पदक देऊन गौरविन्यात आले आहे. यापूर्वी त्याने आयआयटी, जॅम परीक्षा गणित विषयातून उत्तीर्ण केली होती हे विशेष. मात्र घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्याला आयआयटीतून माघार घ्यावी लागली. त्यामुळे सर्वप्रथम एखादी शासकीय नोकरी स्वीकारुन घरची हलाखीची परिस्थिती सावरण्याचा मानस त्याने केला आहे. यानंतर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करायची आणि आपण युपीएससीच्या परीक्षेत निश्चितच यश मिळवू असा निर्धार त्याने केला आहे. आपल्या यशाचे श्रेय त्याने आपल्या आई-वडिलांना दिले असून त्यांच्या पुण्याईनेच आपण यशाचे शिखर गाठू असा आत्मविश्वास त्याने बाळगला आहे.