शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

थकीत पाणी शुल्काने मजीप्राची आर्थिक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 22:47 IST

गोंदिया शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) विभागाचीे आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत असल्याचे आहे. ग्राहकांकडील थकीत पाणी शुल्काच्या रक्कमेत दरवर्षी १ कोटी रुपयांची भर पडत आहे.

ठळक मुद्देथकीत रकमेत दरवर्षी १ कोटीची भर : १३ कोटी ५४ लाख रुपयांची थकबाकी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) विभागाचीे आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत असल्याचे आहे. ग्राहकांकडील थकीत पाणी शुल्काच्या रक्कमेत दरवर्षी १ कोटी रुपयांची भर पडत आहे. परिणामी मजीप्राची आर्थिक कोंडी झाली असून अशीच स्थिती राहिल्यास पाणी पुरवठा योजना संकटात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.तालुक्यातील डांर्गोली येथे वैनगंगा नदीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून गोंदिया शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा मजीप्रातर्फे केला जातो. शहरात मजीप्राचे एकूण १४ हजार ८५० ग्राहक आहेत. या ग्राहकांना दिवसांतून दोन वेळा पाणी पुरवठा केला जातो. मात्र ग्राहक नियमित पाणी शुल्काचा भरणा करीत नसल्याने थकबाकीच्या आकड्यात सातत्याने वाढ होत आहे.त्यामुळेच शहरातील ग्राहकांवर थकीत पाणी शुल्कापोटी १३ कोटी ५४ लाख ८१ हजार १८४ रुपये थकीत आहेत.डिसेंबर २०१८ पर्यंत ज्या ग्राहकांकडे पाणी शुल्क थकीत होते त्यात घरगुती ग्राहकांकडे ११ कोटी ९५ लाख ८४ हजार ६४० रुपये, औद्योगिक ग्राहकांकडे ९८ लाख ६० हजार ९६ रुपये, सार्वजनिक ग्राहकांकडे ५४ लाख ६७ हजार ५७० रुपये व नगर परिषदेकडे ५ लाख ६६ हजार ७७० रुपये थकीत होते. यापैकी जानेवारी २०१९ मध्ये ४ लाख १४ रुपये ग्राहकांनी भरले.थकीत पाणी शुल्काच्या आकड्यात दरवर्षी वाढ होत असल्याने मजीप्राची आर्थिक कोंडी होत आहे.ग्राहकांच्या संख्येत वाढमागील दोन वर्षांपूर्वी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी शंभर कोटी रुपयांची नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत करण्यात आली. ही योजना कार्यान्वित होण्यापूर्वी मजीप्राचे १३५०० ग्राहक होते. नवीन योजनेनंतर यात १ हजार ग्राहकांची भर पडली असून एकूण ग्राहकांची संख्या १४ हजार ८५० ऐवढी झाली आहे. यात घरगुती ग्राहकांची संख्या १४ हजार ६३१, व्यावसायीक ७४, इतर १०३ व नगर परिषदेचे ४२ स्टॅन्डपोस्ट आहेत.व्याजच साडेचार कोटीचेमजीप्राचे पाणी शुल्काची ९ कोटी १९ लाख ४४ हजार ६३४ रुपये ग्राहकांकडे थकीत आहे. मात्र या थकबाकीच्या आकड्यात सातत्याने वाढ होत असल्याने त्यावरील व्याज वाढत आहे. त्यामुळेच या थकीत रक्कमेवर ४ कोटी ३५ लाख ३६ हजार ४४३ रुपयांचे निव्वळ व्याज आहे. थकीत पाणी शुल्काच्या वसुलीसाठी मजीप्राने अभियान सुध्दा राबविले मात्र त्याचा फारसा प्रभाव पडला नाही.

टॅग्स :Waterपाणी