शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
2
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
3
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
4
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
5
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
6
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
7
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
8
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
9
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
10
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
11
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
12
अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
13
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
14
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
15
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
16
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
17
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
18
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
19
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
20
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणला १४ लाखांचा ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2017 02:05 IST

२९ मे रोजी आलेल्या वादळीवाऱ्याने जिल्ह्यात चांगलाच कहर केला असून मानवी जीवन विस्कळीत करतानाच पिकांचेही नुकसान केले आहे.

वादळीवाऱ्याने दिला झटका : पोल व वाहिन्या तुटल्या लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : २९ मे रोजी आलेल्या वादळीवाऱ्याने जिल्ह्यात चांगलाच कहर केला असून मानवी जीवन विस्कळीत करतानाच पिकांचेही नुकसान केले आहे. नुकसानीच्या या फटक्यातून महाराष्ट्र वीज वितरण कंपनीही सुटली नसून या वादळीवाऱ्यामुळे महावितरणला सुमारे १४.५३ लाखांचा फटका बसला आहे. यंदा उन्हाने चांगलेच चटके दिले व त्यावर अवकाळी पावसाने थोडाफार थंडावा दिला. मे महिन्यात २९ तारखेला वादळीवाऱ्याने चांगलाच कहर केला. या पाऊस व वादळीवाऱ्यामुळे कोठे झाडे पडली, तर कोठे घरांची पडझड झाली. तर पावसाने पिकांची नासाडी करून सोडली. अवकाळी पाऊस व वादळीवाऱ्याने वीज वितरण कंपनीलाही आपल्या पाशात घेतले आहे. २९ मे रोजीच्या वादळीवाऱ्यामुळे वीज कंपनीचे सुमारे १४.५३ लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. वादळीवाऱ्यामुळे कोठे वीज पोल पडले तर कोठे वाहिन्या तुटल्या. विद्युतरोहित्रांतही बिघाड आला व अवघा जिल्हा अस्तव्यस्त झाला होता. या नुकसानीमुळे वीज वितरण कंपनीची चांगलीच पंचाईत झाली असून दुरूस्तीसाठी कसरत करावी लागली. विशेष म्हणजे हा तर उन्हाळ््यातील अवकाळी पाऊस व वादळीवाऱ्याचा कहर व त्यापासून झालेले नुकसान आहे. तर मान्सून सुरू झाल्यास वादळीवारा व पावसाने नेहमीच अशाप्रकारचे बिघाड येतात. त्यामुळे आता मान्सूनमध्ये ही महावितरणला यासाठी तयार रहावेच लागणार आहेच. त्यातही यंदा महावितरणला फक्त १४ लाखांचेच नुकसान सहन करावे लागले. तर मागील वर्षी वादळीवाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा कोटींच्या घरात गेल्याचीही माहिती आहे. १३.२ किमी वाहिनी तुटली पोल तुटले असतानाच जिल्ह्यात १३.२ किमी. वीज वाहिन्या तुटल्या आहेत. यात ६.५६ किमी. उच्चदाब व ६.४६ किमी. लघुदाब वाहिन्या आहेत. विभागनिहाय बघितल्यास, गोंदिया विभागात ५ किमी. उच्चदाब व १.३ किमी. लघुदाब तर देवरी विभागात १.५६ किमी. उच्चदाब व ५.१६ किमी. लघुदाब वाहिन्या तुटल्या आहेत. यातून एकूण सुमारे २.१२ लाखांचे नुकसान झाले आहे. ३ विद्युत रोहित्रांमध्ये बिघाड वादळीवाऱ्याच्या कहरामुळे पोल व वाहिन्या तुटल्या असतानाच विद्युतरोहित्रही यापासून सुटले नाहीत. यामध्ये देवरी विभागात ३ रोहित्रांत बिघाड आला होता. अशाप्रकारे रोहित्रांमधील बिघाडामुळे कंपनीला २.८५ लाखांचे नुकसान झाले आहे. यावर वीज वितरण कंपनीकडून पोल व रोहीत्र बदलण्यात आले आहेत. ८३ खांब पडले वादळीवाऱ्यामुळे जिल्ह्यातील ८३ पोल पडले आहेत. यात १६ उच्चदाब व ६७ लघुदाब पोल आहेत. विभागनिहाय बघितल्यास, गोंदिया विभागात ७ उच्चदाब व १३ लघुदाब तर देवरी विभागात ९ उच्चदाब व ५४ लघुदाब पोल पडले आहेत. अशाप्रकारे पोल तुटल्याने महाविरणला सुमारे ९.५६ लाखांचे नुकसान झाले आहे.