शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

महावितरणला १४ लाखांचा ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2017 02:05 IST

२९ मे रोजी आलेल्या वादळीवाऱ्याने जिल्ह्यात चांगलाच कहर केला असून मानवी जीवन विस्कळीत करतानाच पिकांचेही नुकसान केले आहे.

वादळीवाऱ्याने दिला झटका : पोल व वाहिन्या तुटल्या लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : २९ मे रोजी आलेल्या वादळीवाऱ्याने जिल्ह्यात चांगलाच कहर केला असून मानवी जीवन विस्कळीत करतानाच पिकांचेही नुकसान केले आहे. नुकसानीच्या या फटक्यातून महाराष्ट्र वीज वितरण कंपनीही सुटली नसून या वादळीवाऱ्यामुळे महावितरणला सुमारे १४.५३ लाखांचा फटका बसला आहे. यंदा उन्हाने चांगलेच चटके दिले व त्यावर अवकाळी पावसाने थोडाफार थंडावा दिला. मे महिन्यात २९ तारखेला वादळीवाऱ्याने चांगलाच कहर केला. या पाऊस व वादळीवाऱ्यामुळे कोठे झाडे पडली, तर कोठे घरांची पडझड झाली. तर पावसाने पिकांची नासाडी करून सोडली. अवकाळी पाऊस व वादळीवाऱ्याने वीज वितरण कंपनीलाही आपल्या पाशात घेतले आहे. २९ मे रोजीच्या वादळीवाऱ्यामुळे वीज कंपनीचे सुमारे १४.५३ लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. वादळीवाऱ्यामुळे कोठे वीज पोल पडले तर कोठे वाहिन्या तुटल्या. विद्युतरोहित्रांतही बिघाड आला व अवघा जिल्हा अस्तव्यस्त झाला होता. या नुकसानीमुळे वीज वितरण कंपनीची चांगलीच पंचाईत झाली असून दुरूस्तीसाठी कसरत करावी लागली. विशेष म्हणजे हा तर उन्हाळ््यातील अवकाळी पाऊस व वादळीवाऱ्याचा कहर व त्यापासून झालेले नुकसान आहे. तर मान्सून सुरू झाल्यास वादळीवारा व पावसाने नेहमीच अशाप्रकारचे बिघाड येतात. त्यामुळे आता मान्सूनमध्ये ही महावितरणला यासाठी तयार रहावेच लागणार आहेच. त्यातही यंदा महावितरणला फक्त १४ लाखांचेच नुकसान सहन करावे लागले. तर मागील वर्षी वादळीवाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा कोटींच्या घरात गेल्याचीही माहिती आहे. १३.२ किमी वाहिनी तुटली पोल तुटले असतानाच जिल्ह्यात १३.२ किमी. वीज वाहिन्या तुटल्या आहेत. यात ६.५६ किमी. उच्चदाब व ६.४६ किमी. लघुदाब वाहिन्या आहेत. विभागनिहाय बघितल्यास, गोंदिया विभागात ५ किमी. उच्चदाब व १.३ किमी. लघुदाब तर देवरी विभागात १.५६ किमी. उच्चदाब व ५.१६ किमी. लघुदाब वाहिन्या तुटल्या आहेत. यातून एकूण सुमारे २.१२ लाखांचे नुकसान झाले आहे. ३ विद्युत रोहित्रांमध्ये बिघाड वादळीवाऱ्याच्या कहरामुळे पोल व वाहिन्या तुटल्या असतानाच विद्युतरोहित्रही यापासून सुटले नाहीत. यामध्ये देवरी विभागात ३ रोहित्रांत बिघाड आला होता. अशाप्रकारे रोहित्रांमधील बिघाडामुळे कंपनीला २.८५ लाखांचे नुकसान झाले आहे. यावर वीज वितरण कंपनीकडून पोल व रोहीत्र बदलण्यात आले आहेत. ८३ खांब पडले वादळीवाऱ्यामुळे जिल्ह्यातील ८३ पोल पडले आहेत. यात १६ उच्चदाब व ६७ लघुदाब पोल आहेत. विभागनिहाय बघितल्यास, गोंदिया विभागात ७ उच्चदाब व १३ लघुदाब तर देवरी विभागात ९ उच्चदाब व ५४ लघुदाब पोल पडले आहेत. अशाप्रकारे पोल तुटल्याने महाविरणला सुमारे ९.५६ लाखांचे नुकसान झाले आहे.