शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

शिबिरातून साधणार महासमाधान

By admin | Updated: August 17, 2016 00:02 IST

गरजू लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. सडक अर्जुनी येथे....

स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांची ग्वाही : जलयुक्त शिवाराने सिंचन क्षेत्रात १५,४१२ हेक्टरने वाढ गोंदिया :गरजू लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. सडक अर्जुनी येथे होणाऱ्या महासमाधान शिबिरातून ४० हजारपेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्याचे नियोजन असून त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. याशिवाय जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानामुळे १५ हजार ४१२ हेक्टर सिंचन क्षेत्रात वाढ झाली आहे, अशी माहिती पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. भारतीय स्वातंत्र्याच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त कारंजा पोलीस कवायत मैदानावर सोमवारी सकाळी झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, आमदार गोपालदास अग्रवाल, माजी आमदार डॉ.खुशाल बोपचे, जि.प.शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती पी.जी.कटरे, गोंदियाचे नगराध्यक्ष कशिश जायसवाल, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, नवेगाव नागझिरा वन्यजीव व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक रविकिरण गोवेकर, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राज्यातील १२५ दलित वस्त्यांचा दोन वर्षात सर्वांगीण विकास करण्यासाठी विशेष योजना कार्यान्वित करण्यात येत आहेत. जिल्ह्यात सायबर गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी सायबर लॅबचा निश्चितच उपयोग होईल. यावर्षीपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले असून कायापालट प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्य संस्था सुसज्ज होत असल्याचे ते म्हणाले. मजुरांना रोजगार उपलब्ध करु न देण्यासोबतच त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महत्वाची ठरली आहे. यावर्षात जुलैअखेर १ लाख ६ हजार ३२२ कुटुंबांना रोजगार देण्यात आला आहे. मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात गोंदिया जिल्हा राज्यात आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. तसेच परेडचे निरीक्षण केले. पोलीस पथक, शीघ्र कृती दल, होमगार्ड पथक, स्काऊट- गाईड पथक, बँड पथक, बीट मार्शल पथक, निर्भया पथक, श्वान पथक, बॉम्ब शोधक पथक यांनी पथसंचलन केले. कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक प्रदीप बडगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, उपजिल्हाधिकारी विकास ठाकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम, बागडे, जिल्हा खनिकर्म अधिकारी भिमराव फुलेकर, समाजकल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त समीर परवेज यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्र माचे संचालन मंजुश्री देशपांडे यांनी केले.(जिल्हा प्रतिनिधी) शेतकऱ्यांना दुबार पेरणीची सोय मागील वर्षी ३ हजार ६४१ शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज जोडणी दिली. या वर्षात जुलैअखैर ६५० शेतकऱ्यांना वीज कनेक्शन दिले आहे. त्यामुळे त्यांना दुबार व तिबार पिके घेता येणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये प्रोत्साहन राशी बोनस म्हणून देण्यात आली. याचा लाभ जिल्ह्यातील ४६ हजार ४८१ धान उत्पादक शेतकऱ्यांना झाला आहे. वनालगतच्या गावातील ११ हजार ५०१ कुटुंबांना गॅस कनेक्शनचा पुरवठा करण्यात आला आहे. पर्यटनस्थळांचा विकास करून जास्तीत जास्त पर्यटक येण्यासोबतच स्थानिकांना रोजगार निर्माण कसा होईल, या दृष्टीने आपले नियोजन असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामिगरी करणारे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यामध्ये सन २०१४-१५ या वर्षात महसूल विभागात विभागीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेले तुमसर येथील तत्कालीन नायब तहसिलदार तथा विद्यमान गोंदिया तहसिलदार अरविंद हिंगे, जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून संजय धार्मिक, तिरोडा तालुक्यातील बेलाटी येथील पोलीस पाटील रिनाईत, स्वच्छ भारत मिशनअंतर्गत सन २०१५-१६ मध्ये हागणदारीमुक्त घोषित करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींचे सरपंच व सचिव यांचा सत्कार करण्यात आला.