शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
4
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
5
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
6
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
7
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
8
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
9
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
10
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
11
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
12
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
13
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
14
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
15
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
16
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
17
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
18
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
19
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
20
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

शिबिरातून साधणार महासमाधान

By admin | Updated: August 17, 2016 00:02 IST

गरजू लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. सडक अर्जुनी येथे....

स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांची ग्वाही : जलयुक्त शिवाराने सिंचन क्षेत्रात १५,४१२ हेक्टरने वाढ गोंदिया :गरजू लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. सडक अर्जुनी येथे होणाऱ्या महासमाधान शिबिरातून ४० हजारपेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्याचे नियोजन असून त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. याशिवाय जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानामुळे १५ हजार ४१२ हेक्टर सिंचन क्षेत्रात वाढ झाली आहे, अशी माहिती पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. भारतीय स्वातंत्र्याच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त कारंजा पोलीस कवायत मैदानावर सोमवारी सकाळी झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, आमदार गोपालदास अग्रवाल, माजी आमदार डॉ.खुशाल बोपचे, जि.प.शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती पी.जी.कटरे, गोंदियाचे नगराध्यक्ष कशिश जायसवाल, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, नवेगाव नागझिरा वन्यजीव व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक रविकिरण गोवेकर, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राज्यातील १२५ दलित वस्त्यांचा दोन वर्षात सर्वांगीण विकास करण्यासाठी विशेष योजना कार्यान्वित करण्यात येत आहेत. जिल्ह्यात सायबर गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी सायबर लॅबचा निश्चितच उपयोग होईल. यावर्षीपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले असून कायापालट प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्य संस्था सुसज्ज होत असल्याचे ते म्हणाले. मजुरांना रोजगार उपलब्ध करु न देण्यासोबतच त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महत्वाची ठरली आहे. यावर्षात जुलैअखेर १ लाख ६ हजार ३२२ कुटुंबांना रोजगार देण्यात आला आहे. मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात गोंदिया जिल्हा राज्यात आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. तसेच परेडचे निरीक्षण केले. पोलीस पथक, शीघ्र कृती दल, होमगार्ड पथक, स्काऊट- गाईड पथक, बँड पथक, बीट मार्शल पथक, निर्भया पथक, श्वान पथक, बॉम्ब शोधक पथक यांनी पथसंचलन केले. कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक प्रदीप बडगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, उपजिल्हाधिकारी विकास ठाकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम, बागडे, जिल्हा खनिकर्म अधिकारी भिमराव फुलेकर, समाजकल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त समीर परवेज यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्र माचे संचालन मंजुश्री देशपांडे यांनी केले.(जिल्हा प्रतिनिधी) शेतकऱ्यांना दुबार पेरणीची सोय मागील वर्षी ३ हजार ६४१ शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज जोडणी दिली. या वर्षात जुलैअखैर ६५० शेतकऱ्यांना वीज कनेक्शन दिले आहे. त्यामुळे त्यांना दुबार व तिबार पिके घेता येणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये प्रोत्साहन राशी बोनस म्हणून देण्यात आली. याचा लाभ जिल्ह्यातील ४६ हजार ४८१ धान उत्पादक शेतकऱ्यांना झाला आहे. वनालगतच्या गावातील ११ हजार ५०१ कुटुंबांना गॅस कनेक्शनचा पुरवठा करण्यात आला आहे. पर्यटनस्थळांचा विकास करून जास्तीत जास्त पर्यटक येण्यासोबतच स्थानिकांना रोजगार निर्माण कसा होईल, या दृष्टीने आपले नियोजन असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामिगरी करणारे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यामध्ये सन २०१४-१५ या वर्षात महसूल विभागात विभागीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेले तुमसर येथील तत्कालीन नायब तहसिलदार तथा विद्यमान गोंदिया तहसिलदार अरविंद हिंगे, जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून संजय धार्मिक, तिरोडा तालुक्यातील बेलाटी येथील पोलीस पाटील रिनाईत, स्वच्छ भारत मिशनअंतर्गत सन २०१५-१६ मध्ये हागणदारीमुक्त घोषित करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींचे सरपंच व सचिव यांचा सत्कार करण्यात आला.