शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : गावकरी विचारताहेत नेते, कार्यकर्त्यांना प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 00:46 IST

विधानसभा निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील चावडी, हॉटेल आणि बसस्थानकातील कॉर्नरवर निवडणुकीच्या चर्चा रंगत आहेत. देश विकासाच्या धोरणापासून ते ग्रामपातळीवरील विकास कामांचा उपहापोह या चर्चांमध्ये होत आहे. कोणता उमेदवार आपल्या गावाला न्याय देऊ शकेल, राष्टÑीय पातळीवर कोणाची सत्ता असायला हवी, सक्षम पंतप्रधान कोण असावा, शेतकऱ्यांचे प्रश्न कोण सोडविणार, अशा अनेक मुद्यांवर चर्चा घडत आहेत. या चर्चामधूनच मतदानाचाही निर्णय होत आहे

ठळक मुद्देसमस्या ऐरणीवर : गावच्या चावडीवर रंगत आहेत राजकीय गप्पा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागातही विविध चर्चांना उधाण आले. जो पक्ष अथवा उमेदवार गावच्या विकासाला न्याय देऊ शकतो, त्यांच्या पारड्यात मत टाकण्याचा विचार मतदार करीत आहेत. त्यामुळे केवळ स्वहिताचे राजकारण करणारे गाव पुढारी धास्तावले आहेत. गावातील व्होटबँक ढासळण्याची भीती या गावपुढाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.विधानसभा निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील चावडी, हॉटेल आणि बसस्थानकातील कॉर्नरवर निवडणुकीच्या चर्चा रंगत आहेत. देश विकासाच्या धोरणापासून ते ग्रामपातळीवरील विकास कामांचा उपहापोह या चर्चांमध्ये होत आहे. कोणता उमेदवार आपल्या गावाला न्याय देऊ शकेल, राष्टÑीय पातळीवर कोणाची सत्ता असायला हवी, सक्षम पंतप्रधान कोण असावा, शेतकऱ्यांचे प्रश्न कोण सोडविणार, अशा अनेक मुद्यांवर चर्चा घडत आहेत. या चर्चामधूनच मतदानाचाही निर्णय होत आहे. ग्रामीण भागात ठिकठिकाणी वेगवेगळ्या पक्षांचे पुढारी कार्यरत आहेत. गावातील पुढारी आपल्याच पक्षाला मतदान कसे मिळले, याचे आखाडे बांधून पक्षाकडे वजन वापरत आहेत. आपल्या मागे गाव असल्याच्या बाता मारताना दिसत आहेत. गावातील पुढारी सर्वसामान्य जनतेला वेगवेगळी आमिषे दाखवून मतदान आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. गावात मिळणाºया मताधिक्यावरच गाव पुढाºयांचे वजन ठरते. मात्र सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे मतदार हुशार झाले आहेत. चांगल्या आणि वाईटाचा विचार करु लागले आहेत. त्यामुळे गावपुढाºयांचे अस्तित्व धोक्यात येऊ पाहत आहे. परिणामी, गाव पुढाºयांनाही व्होट बँकेची चिंता लागली आहे. गावातील मतदान कमी जास्त झाले तर, नेत्यांसमोर आपले वजन कमी जास्त झाले तर नेत्यांसमोर आपले वजन कमी होईल, अशी भीती त्यांना सातत्याने लागली आहे. मतदानाचा दिवस जवळ येईपर्यंत गावखेड्यात अनेक घडामोडी होणार आहेत.नेत्यांकडून नमस्कार, चमत्कारजिल्हा परिषद, पंचायत समितीतील बहुतांश लोकप्रतिनिधी शहरी भागात वास्तव्याला आहेत. निवडणुका आल्यानंतर हे पुढारी गावात जावून लुडबूड करतात. गावातील मताधिक्य गाव पुढाºयांच्या नावावर शिक्कामोर्तब करीत असल्याने ही व्होट बँक टिकविण्यासाठी त्यांनी धडपड सुरु केली आहे. आर्थिक झळ सोसूनही पुढारी मतदारांना खुश करीत असल्याची चर्चा आहे. नमस्कार-चमत्कार करुन स्वत:कडे लक्ष वेधत आहेत.

टॅग्स :gondiya-acगोंदियाElectionनिवडणूक