शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
5
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
6
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
7
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
8
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
9
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
10
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
11
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
12
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
13
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
14
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
15
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
16
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
17
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
18
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
19
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
20
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद

Maharashtra Election 2019 : गावकरी विचारताहेत नेते, कार्यकर्त्यांना प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 00:46 IST

विधानसभा निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील चावडी, हॉटेल आणि बसस्थानकातील कॉर्नरवर निवडणुकीच्या चर्चा रंगत आहेत. देश विकासाच्या धोरणापासून ते ग्रामपातळीवरील विकास कामांचा उपहापोह या चर्चांमध्ये होत आहे. कोणता उमेदवार आपल्या गावाला न्याय देऊ शकेल, राष्टÑीय पातळीवर कोणाची सत्ता असायला हवी, सक्षम पंतप्रधान कोण असावा, शेतकऱ्यांचे प्रश्न कोण सोडविणार, अशा अनेक मुद्यांवर चर्चा घडत आहेत. या चर्चामधूनच मतदानाचाही निर्णय होत आहे

ठळक मुद्देसमस्या ऐरणीवर : गावच्या चावडीवर रंगत आहेत राजकीय गप्पा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागातही विविध चर्चांना उधाण आले. जो पक्ष अथवा उमेदवार गावच्या विकासाला न्याय देऊ शकतो, त्यांच्या पारड्यात मत टाकण्याचा विचार मतदार करीत आहेत. त्यामुळे केवळ स्वहिताचे राजकारण करणारे गाव पुढारी धास्तावले आहेत. गावातील व्होटबँक ढासळण्याची भीती या गावपुढाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.विधानसभा निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील चावडी, हॉटेल आणि बसस्थानकातील कॉर्नरवर निवडणुकीच्या चर्चा रंगत आहेत. देश विकासाच्या धोरणापासून ते ग्रामपातळीवरील विकास कामांचा उपहापोह या चर्चांमध्ये होत आहे. कोणता उमेदवार आपल्या गावाला न्याय देऊ शकेल, राष्टÑीय पातळीवर कोणाची सत्ता असायला हवी, सक्षम पंतप्रधान कोण असावा, शेतकऱ्यांचे प्रश्न कोण सोडविणार, अशा अनेक मुद्यांवर चर्चा घडत आहेत. या चर्चामधूनच मतदानाचाही निर्णय होत आहे. ग्रामीण भागात ठिकठिकाणी वेगवेगळ्या पक्षांचे पुढारी कार्यरत आहेत. गावातील पुढारी आपल्याच पक्षाला मतदान कसे मिळले, याचे आखाडे बांधून पक्षाकडे वजन वापरत आहेत. आपल्या मागे गाव असल्याच्या बाता मारताना दिसत आहेत. गावातील पुढारी सर्वसामान्य जनतेला वेगवेगळी आमिषे दाखवून मतदान आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. गावात मिळणाºया मताधिक्यावरच गाव पुढाºयांचे वजन ठरते. मात्र सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे मतदार हुशार झाले आहेत. चांगल्या आणि वाईटाचा विचार करु लागले आहेत. त्यामुळे गावपुढाºयांचे अस्तित्व धोक्यात येऊ पाहत आहे. परिणामी, गाव पुढाºयांनाही व्होट बँकेची चिंता लागली आहे. गावातील मतदान कमी जास्त झाले तर, नेत्यांसमोर आपले वजन कमी जास्त झाले तर नेत्यांसमोर आपले वजन कमी होईल, अशी भीती त्यांना सातत्याने लागली आहे. मतदानाचा दिवस जवळ येईपर्यंत गावखेड्यात अनेक घडामोडी होणार आहेत.नेत्यांकडून नमस्कार, चमत्कारजिल्हा परिषद, पंचायत समितीतील बहुतांश लोकप्रतिनिधी शहरी भागात वास्तव्याला आहेत. निवडणुका आल्यानंतर हे पुढारी गावात जावून लुडबूड करतात. गावातील मताधिक्य गाव पुढाºयांच्या नावावर शिक्कामोर्तब करीत असल्याने ही व्होट बँक टिकविण्यासाठी त्यांनी धडपड सुरु केली आहे. आर्थिक झळ सोसूनही पुढारी मतदारांना खुश करीत असल्याची चर्चा आहे. नमस्कार-चमत्कार करुन स्वत:कडे लक्ष वेधत आहेत.

टॅग्स :gondiya-acगोंदियाElectionनिवडणूक