शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

Maharashtra Election 2019 ; प्रचारतोफा थंडावणार आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 06:00 IST

विधानसभा निवडणुकीचा जोर दिवसेंदिवस चांगलाच वाढत चालला आहे. उमेदवार मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानांचा वापर करीत आहेत. यात सोशल मीडियाचा वापर होत असतानाच जुन्या तंत्रांचाही तेवढाच बोलबाला आहे. हेच कारण आहे की, आजही पूर्वीप्रमाणेच ऑटो, रिक्शा व वाहनांवरील पोंग्यांचा ऐकी येतोच.

ठळक मुद्देप्रचाराचे भोंगे होणार शांत : घरोघरी भेटीगाठीवर जोर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सरण्याची वेळ आली असून शनिवारी (दि.१९) सायंकाळी ६ वाजता प्रचारतोफा थंडावणार आहेत. यामुळे सर्वत्र ऐकू येत असलेले गाणे व पोंग्यांचा आवाज आता शांत होणार आहे. प्रचार बंद पडणार असतानाच मात्र घरोघरी भेटीगाठीचा जोर वाढणार असून उमेदवार व त्यांचे कुटूंबीय यासाठी नियोजनाला लागले आहेत.विधानसभा निवडणुकीचा जोर दिवसेंदिवस चांगलाच वाढत चालला आहे. उमेदवार मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानांचा वापर करीत आहेत. यात सोशल मीडियाचा वापर होत असतानाच जुन्या तंत्रांचाही तेवढाच बोलबाला आहे. हेच कारण आहे की, आजही पूर्वीप्रमाणेच ऑटो, रिक्शा व वाहनांवरील पोंग्यांचा ऐकी येतोच. चित्रपटांतील गाण्यांचा वापर करून त्यावर तयार करण्यात आलेले गाणे शहरात प्रत्येकच भागात ऐकू येत आहेत. तसेच उमेदवारांसाठी पक्षांतील दिग्गज नेत्यांच्या सभाही घेतल्या जात आहेत. यासोबतच उमेदवार रॅली काढून किंवा पायी फिरत मतदारांच्याजवळ जात आहेत.निवडणुकीची ही सर्व रणधुमाळी सुरू असतानाच निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार,शनिवारी (दि.१९) सायंकाळी ६ वाजता प्रचाराच्या या तोफा थंडावणार आहेत. यामुळे शनिवारी सायंकाळपासून प्रचाराचे पोंगे व गाणे शांत होतील. शिवाय उमेदवारांसाठी घेतल्या जात असलेल्या नेत्यांच्या सभाही बंद होतील. अशात मात्र उमेदवार उरलेल्या अवधीत मतदारांच्या भेटीगाठीसाठी निघणार. उमेदवार व त्यांचे कुटूंबीय आपापल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारांची भेट घेण्यासाठी निघतील.सर्व पक्षांची शक्ती प्रदर्शनाची तयारी७ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर ९ ऑक्टोबरपासून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराच्या रणधुमाळीला सुरूवात केली. गेली अकरा ते बारा दिवस पदयात्रा आणि प्रचारसभा धुराळा सुरू होता. मात्र निवडणूक आचारसंहितेनुसार मतदानाच्या ४८ तासांपूर्वी जाहीर प्रचार बंद करावा लागतो. त्यामुळे शनिवारी सायंकाळी ६ वाजेनंतर जाहीर प्रचार बंद होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून पदयात्रा काढून जोरदार शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता आहे.मतदारसंघातील समीकरणात होतोय बदलविधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. मतदानाची वेळ जस जशी जवळ येत आहे तसे तसे जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील समीकरणात बदल होत आहे. एका मतदारसंघात दुहेरी आणि इतर तीन मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे. बंडखोरांमुळे मत विभाजनाचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मत विभाजन झाल्यास यांचा प्रमुख पक्षाच्या उमेदवारांना बसू शकतो.फोन करून मतदानाचे आवाहनजास्तीत जास्त मतदारांपर्यंंत पोहचण्यासाठी उमेदवारांची धडपड सुरू आहे. मात्र कितीही नियोजन केले तरी प्रत्येकापर्यंत पोहचणे शक्य नाही. अशात मात्र उमेदवारांनी आता नवी शक्कल लढविली आहे.उमेदवारांचे कार्यकर्ते आता क्षेत्रातील नागरिकांच्या मोबाईलवर संपर्क करून त्यांना आपल्यालाच मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. याशिवाय, सर्वांच्या मोबाईलवर मॅसेज पाठविले जात आहे.आता थेट संपर्कावर भरशनिवारी सायंकाळी ६ वाजतानंतर जाहीर प्रचार बंद होणार आहे.त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा आता थेट मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर असणार आहे. या दृष्टीने उमेदावाराचे नातेवाईक आणि मित्र परिवार सुध्दा मतदारसंघात सक्रीय झाले आहेत.

टॅग्स :gondiya-acगोंदिया