शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Maharashtra Election 2019 ; जनतेचे प्रेम आणि विश्वास हीच आपली शिदोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 06:00 IST

निवडणूक प्रचारार्थ शुक्रवारी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गावांमध्ये आयोजित पदयात्रा आणि प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने रचना गहाणे, काशीम जमा कुरेशी, केवळराम पुस्तोडे, रघुनाथ लांजेवार, विजया कापगते, भोजू लोगडे, संजय खरवडे, नारायण हटवार, गुरुदेव चांदेवार, नमूदेव नागापुरे, सी.बी. टेंभुर्णे उपस्थित होते.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : अर्जुनी मोरगाव मतदारसंघात पदयात्रा व प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : विरोधक मागील दहा वर्षांत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचा विकास खुंटल्याचा आरोप करीत आहे. हे जर सत्य असते तर जनतेने आपल्याला दुसऱ्यांदा संधी दिली नसती. मतदारांचा विश्वासघात करणाऱ्यांना ते कधीच जवळ करीत नाही. मात्र आपण या मतदारसंघाचा प्रामाणिकपणे विकास करण्याचा प्रयत्न केला ही बाब जनतेला सुध्दा माहिती आहे. त्यामुळे मतदारसंघात गेल्यानंतर त्यांच्याकडून स्वागत आणि प्रेम मिळत आहे हीच त्याची खरी पावती आहे. आपल्यासाठी या मतदारसंघातील जनतेचे प्रेम आणि विश्वास हीच मोठी शिदोरी असल्याचे प्रतिपादन अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप-सेना युतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांनी केले.निवडणूक प्रचारार्थ शुक्रवारी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गावांमध्ये आयोजित पदयात्रा आणि प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने रचना गहाणे, काशीम जमा कुरेशी, केवळराम पुस्तोडे, रघुनाथ लांजेवार, विजया कापगते, भोजू लोगडे, संजय खरवडे, नारायण हटवार, गुरुदेव चांदेवार, नमूदेव नागापुरे, सी.बी. टेंभुर्णे उपस्थित होते. बडोले म्हणाले, राज्यात १५ वर्षे आघाडीचे सरकार असताना त्यांनी कोणती विकास कामे केली आणि आता ते पाच वर्षांत भाजप सरकारला त्यांच्या कामाचा हिशोब मागत आहे.काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने पंधरा वर्षांत जर विकास कामे केली असती आणि शेतकऱ्यांसह सवसामान्य जनतेच्या समस्या मार्गी लावल्या असत्या तर जनतेने त्यांना नाकारले नसते.आघाडी सरकारचे बोलायचेआणि करायचे एक असेच धोरण असल्याने जनतेने या दिशाभूल करणाऱ्यांचा खरा चेहरा ओळखून त्यांना सत्तेबाहेर ठेवण्याचे काम केले. भाजप सरकारने जर केवळ आश्वासने दिली असती आणि विकास कामे केली नसती तर जनता आमच्या पाठीशी उभी राहिली नसती.केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारकडे विकासाचा रोडमॅप तयार असून त्याच मार्गावरुन सरकारची वाटचाल सुरू आहे. अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील सर्व समस्या मार्गी लागल्याचा दावा आपण कधी करणार नाही. मात्र मागील पाच वर्षांत अनेक विकास कामे प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला.पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना योग्य हमीभाव आणि धानाला ५०० रुपये बोनस देणे असो अथवा शेतकऱ्यांना कर्जमाफी, पेशंन देण्याचा मुद्दा असो या सर्व गोष्टी केवळ भाजप सरकारचा कार्यकाळात शक्य झाल्या हे कुणीही नाकारु शकणार नाही.अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील मतदार हे जागृक असून ते ज्याच्यावर प्रेम करतात त्याला मनापासून साथ देतात. मागील दहा वर्षांत त्यांनी आपल्या प्रेमातून दाखवून दिले आहे. जनतेला विश्वासाला तडा जाईल असे कार्य आपण कधीच केले नाही भविष्यात सुध्दा करणार नाही. जे शक्य आहे तेच करुन दाखविण्यावर आपला विश्वास आहे. त्यामुळे यापुढेही या मतदारसंघातील जनता आपल्यासोबत राहिल असा आपल्याला पूर्णपणे विश्वास आहे.

टॅग्स :arjuni-morgaon-acअर्जुनी मोरगावRajkumar Badoleराजकुमार बडोले