शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
2
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
3
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
4
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
5
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
6
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
8
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
9
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
10
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
11
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त
12
अ‍ॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर...
13
सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई
14
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
15
३ फ्लॅट, ५० लाखांचं सोनं... महिलेने १०० लोकांची केली ९ कोटींची फसवणूक, 'असा' घातला गंडा
16
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
17
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
18
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
19
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
20
कोळशावरील बेकऱ्यांना टाळेच! नोटिसा देण्यास सुरुवात; स्वच्छ इंधनच वापरावे लागणार

Maharashtra Election 2019 ; जनतेचे प्रेम आणि विश्वास हीच आपली शिदोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 06:00 IST

निवडणूक प्रचारार्थ शुक्रवारी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गावांमध्ये आयोजित पदयात्रा आणि प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने रचना गहाणे, काशीम जमा कुरेशी, केवळराम पुस्तोडे, रघुनाथ लांजेवार, विजया कापगते, भोजू लोगडे, संजय खरवडे, नारायण हटवार, गुरुदेव चांदेवार, नमूदेव नागापुरे, सी.बी. टेंभुर्णे उपस्थित होते.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : अर्जुनी मोरगाव मतदारसंघात पदयात्रा व प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : विरोधक मागील दहा वर्षांत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचा विकास खुंटल्याचा आरोप करीत आहे. हे जर सत्य असते तर जनतेने आपल्याला दुसऱ्यांदा संधी दिली नसती. मतदारांचा विश्वासघात करणाऱ्यांना ते कधीच जवळ करीत नाही. मात्र आपण या मतदारसंघाचा प्रामाणिकपणे विकास करण्याचा प्रयत्न केला ही बाब जनतेला सुध्दा माहिती आहे. त्यामुळे मतदारसंघात गेल्यानंतर त्यांच्याकडून स्वागत आणि प्रेम मिळत आहे हीच त्याची खरी पावती आहे. आपल्यासाठी या मतदारसंघातील जनतेचे प्रेम आणि विश्वास हीच मोठी शिदोरी असल्याचे प्रतिपादन अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप-सेना युतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांनी केले.निवडणूक प्रचारार्थ शुक्रवारी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गावांमध्ये आयोजित पदयात्रा आणि प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने रचना गहाणे, काशीम जमा कुरेशी, केवळराम पुस्तोडे, रघुनाथ लांजेवार, विजया कापगते, भोजू लोगडे, संजय खरवडे, नारायण हटवार, गुरुदेव चांदेवार, नमूदेव नागापुरे, सी.बी. टेंभुर्णे उपस्थित होते. बडोले म्हणाले, राज्यात १५ वर्षे आघाडीचे सरकार असताना त्यांनी कोणती विकास कामे केली आणि आता ते पाच वर्षांत भाजप सरकारला त्यांच्या कामाचा हिशोब मागत आहे.काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने पंधरा वर्षांत जर विकास कामे केली असती आणि शेतकऱ्यांसह सवसामान्य जनतेच्या समस्या मार्गी लावल्या असत्या तर जनतेने त्यांना नाकारले नसते.आघाडी सरकारचे बोलायचेआणि करायचे एक असेच धोरण असल्याने जनतेने या दिशाभूल करणाऱ्यांचा खरा चेहरा ओळखून त्यांना सत्तेबाहेर ठेवण्याचे काम केले. भाजप सरकारने जर केवळ आश्वासने दिली असती आणि विकास कामे केली नसती तर जनता आमच्या पाठीशी उभी राहिली नसती.केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारकडे विकासाचा रोडमॅप तयार असून त्याच मार्गावरुन सरकारची वाटचाल सुरू आहे. अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील सर्व समस्या मार्गी लागल्याचा दावा आपण कधी करणार नाही. मात्र मागील पाच वर्षांत अनेक विकास कामे प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला.पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना योग्य हमीभाव आणि धानाला ५०० रुपये बोनस देणे असो अथवा शेतकऱ्यांना कर्जमाफी, पेशंन देण्याचा मुद्दा असो या सर्व गोष्टी केवळ भाजप सरकारचा कार्यकाळात शक्य झाल्या हे कुणीही नाकारु शकणार नाही.अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील मतदार हे जागृक असून ते ज्याच्यावर प्रेम करतात त्याला मनापासून साथ देतात. मागील दहा वर्षांत त्यांनी आपल्या प्रेमातून दाखवून दिले आहे. जनतेला विश्वासाला तडा जाईल असे कार्य आपण कधीच केले नाही भविष्यात सुध्दा करणार नाही. जे शक्य आहे तेच करुन दाखविण्यावर आपला विश्वास आहे. त्यामुळे यापुढेही या मतदारसंघातील जनता आपल्यासोबत राहिल असा आपल्याला पूर्णपणे विश्वास आहे.

टॅग्स :arjuni-morgaon-acअर्जुनी मोरगावRajkumar Badoleराजकुमार बडोले