शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : प्रचारात स्थानिक मुद्यांचा पडतोय विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 05:00 IST

निवडणूक ही कुठलीही असो त्यात आश्वासनांचा पाऊस पडल्याशिवाय राहत नाही. मात्र आपल्या क्षेत्राचा विकास व्हावा, बेरोजगारांच्या हाताला काम, शेतकºयाच्या शेतमालाला योग्य दाम, चांगले रस्ते, सिंचनाच्या सुविधा, दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हाव्यात याच रास्त अपेक्षा जिल्ह्यातील मतदारांच्या आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषीवर आधारित आहे.

ठळक मुद्देसत्ताधाऱ्यांचा विकासावर भर : विरोधकांचे टिकेवर लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला अवघे सहा दिवस शिल्लक असताना प्रचार आता चांगलाच रंगात आला आहे. चारही मतदारसंघातील उमेदवार सभा, पदयात्रा,नुक्कड सभा घेऊन अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र या निवडणुकीत भाजपकडून विकासाचे दाखले दिले जात आहे तर विरोधक भाजपने केवळ पाच वर्ष घोषणांचा पाऊस पाडण्यापलिकडेच काहीच केले नसल्याची टिका केली जात आहे. एकंदरीत जिल्ह्यातील स्थानिक प्रश्नांचा सर्वांनाच विसर पडतो आहे.निवडणूक ही कुठलीही असो त्यात आश्वासनांचा पाऊस पडल्याशिवाय राहत नाही. मात्र आपल्या क्षेत्राचा विकास व्हावा, बेरोजगारांच्या हाताला काम, शेतकºयाच्या शेतमालाला योग्य दाम, चांगले रस्ते, सिंचनाच्या सुविधा, दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हाव्यात याच रास्त अपेक्षा जिल्ह्यातील मतदारांच्या आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषीवर आधारित आहे. धान हे भागातील प्रमुख पीक आहे. त्यामुळेच राईस सिटी आणि राईस मिल हब अशी या जिल्ह्याची ओळख होती. मात्र आता राईस मिल उद्योग डबघाईस आला असून ५०० वर राईस मिल बंद पडल्याने या उद्योगावर अवकळा आल्याने रोजगार देखील हिरावला गेला आहे. मागील दहा वर्षांत धानाच्या प्रती क्विंटल दरात केवळ ४५० रुपये वाढ झाली. तर खते, बियाणे, मजुरी आणि मशागतीच्या खर्चांत दुप्पट वाढ झाल्याने शेती म्हणजे शेतकऱ्यांसाठी तोट्याचा सौदा ठरत आहे. लगत च्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यात धानाल २५०० रुपये प्रती क्विंटल हमीभाव मिळत आहे. मात्र महाराष्ट्रात आता केवळ तेवढा भाव देण्याचे आश्वासन दिले जात आहे. लागवड खर्चाच्या तुलनेत शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी कर्जाच्या डोंगराखाली येत असून वर्षभराचा खर्च भागविण्यासाठी त्याला पुन्हा सावकार आणि बँकाच्या दारात उभे राहावे लागत आहे. त्यामुळे निवडणुकीत स्थानिक उमेदवारांनी हे मुद्दे लावून धरण्याची अथवा त्यांचा आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात समावेश करण्याची गरज होती. मात्र दुदैवाने याच गोष्टीचा अभाव आहे. आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्यात अदानी विद्युत प्रकल्पासारखा मोठा उद्योग आला. तर मागील पाच वर्षांत एकही मोठा उद्योग आला नाही त्यामुळे रोजगाराचा प्रश्न कायम आहे. मात्र या मुद्दाकडे सुध्दा कुणाचेच लक्ष नसल्याचे चित्र आहे. एकंदरीत या निवडणुकीत सर्वच पक्षाच्या उमेदवारांना स्थानिक प्रश्नांचा विसर पडत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदिया