शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Maharashtra Election 2019 ; नरेंद्र मोदी यांच्यामुळेच जगात देशाची ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 06:00 IST

गोपालदास अग्रवाल यांनी मागील पाच वर्षांत अनेक विकासात्मक कामे करुन या विधानसभा क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलला त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना गोंदिया विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याचे सांगितले. गोपालदास अग्रवाल यांनी विकासाच्या मुद्दावर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा घेतलेला निर्णय स्वागताहार्य आहे. आता त्यांच्या नेतृत्त्वात गोंदिया विधानसभा क्षेत्राचा अधिक गतीने विकास होणार असल्याचे अशोक इंगळे यांनी सांगितले.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल। शक्ती प्रदर्शनासह दाखल केले नामांकन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले कार्य आणि ध्येय धोरणातून संपूर्ण जगात भारताची वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रामाणिक नेतृत्त्व आणि कुशल प्रशासक म्हणून त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. त्यांच्याच नेतृत्त्वात देशाची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागील पाच वर्षांपासून राज्यात शासन चालवित आहेत. अंत्यत पारदर्शक कारभार असणाऱ्या अशा नेतृत्त्वाच्या पाठीशी सर्व जनतेनी पुन्हा एकदा उभे राहावे असे प्रतिपादन गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे भाजप-सेना युतीचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांनी केले.गोंदिया विधानसभा मतदारसंघातून त्यांनी शुक्रवारी युतीचे उमेदवार म्हणून नामाकंन दाखल केले. त्यापूर्वी सर्कस मैदानावर आयोजित सभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी आ.खोमेश रहांगडाले, भाजप महिला जिल्हाध्यक्ष भावना कदम, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी. जि.प.सदस्य नेतराम कटरे, माजी आ.रमेश कुथे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष पकंज रहांगडाले, भाजप शहरध्यक्ष सुनील केलनका, गोंदिया ग्रामीण तालुकाध्यक्ष छत्रपाल तुरकर, जि.प. अध्यक्षा सीमा मडावी, जि.प.उपाध्यक्ष अल्ताफ हमीद, माधुरी हरिणखेडे, रमेश अंबुले, घनश्याम पानतवने, शकील मन्सुरी, अशोक चौधरी, प्रकाश रहमतकर उपस्थित होते. अग्रवाल म्हणाले मागील पाच वर्षांत गोंदिया विधानसभा क्षेत्रात अनेक विकास कामे झाली आहे. महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प मार्गी लागल्याने शेतकऱ्यांची सिंचनाची समस्या दूर झाली असल्याचे सांगितले. हेमंत पटले म्हणाले, भाजप हा शिस्तप्रिय पक्ष असून पक्षाची शिस्त भंग करणाऱ्या पक्षात कुठलेच स्थान नाही. गोपालदास अग्रवाल यांनी मागील पाच वर्षांत अनेक विकासात्मक कामे करुन या विधानसभा क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलला त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना गोंदिया विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याचे सांगितले. गोपालदास अग्रवाल यांनी विकासाच्या मुद्दावर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा घेतलेला निर्णय स्वागताहार्य आहे. आता त्यांच्या नेतृत्त्वात गोंदिया विधानसभा क्षेत्राचा अधिक गतीने विकास होणार असल्याचे अशोक इंगळे यांनी सांगितले.या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले. संचालन भाजप जिल्हा उपाध्यक्ष दीपक कदम, अपूर्व अग्रवाल यांनी केले. सभेनंतर सकर्स मैदान येथून भव्य रॅली काढण्यात आली. यात भाजपचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यानंतर ही रॅली उपविभागीय कार्यालया जवळ पोहचली. यानंतर भाजप सेना युतीचे उमेदवार म्हणून गोपालदास अग्रवाल यांनी भाजप नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

टॅग्स :gondiya-acगोंडियाGopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल