शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Maharashtra Election 2019 ; नरेंद्र मोदी यांच्यामुळेच जगात देशाची ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 06:00 IST

गोपालदास अग्रवाल यांनी मागील पाच वर्षांत अनेक विकासात्मक कामे करुन या विधानसभा क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलला त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना गोंदिया विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याचे सांगितले. गोपालदास अग्रवाल यांनी विकासाच्या मुद्दावर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा घेतलेला निर्णय स्वागताहार्य आहे. आता त्यांच्या नेतृत्त्वात गोंदिया विधानसभा क्षेत्राचा अधिक गतीने विकास होणार असल्याचे अशोक इंगळे यांनी सांगितले.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल। शक्ती प्रदर्शनासह दाखल केले नामांकन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले कार्य आणि ध्येय धोरणातून संपूर्ण जगात भारताची वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रामाणिक नेतृत्त्व आणि कुशल प्रशासक म्हणून त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. त्यांच्याच नेतृत्त्वात देशाची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागील पाच वर्षांपासून राज्यात शासन चालवित आहेत. अंत्यत पारदर्शक कारभार असणाऱ्या अशा नेतृत्त्वाच्या पाठीशी सर्व जनतेनी पुन्हा एकदा उभे राहावे असे प्रतिपादन गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे भाजप-सेना युतीचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांनी केले.गोंदिया विधानसभा मतदारसंघातून त्यांनी शुक्रवारी युतीचे उमेदवार म्हणून नामाकंन दाखल केले. त्यापूर्वी सर्कस मैदानावर आयोजित सभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी आ.खोमेश रहांगडाले, भाजप महिला जिल्हाध्यक्ष भावना कदम, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी. जि.प.सदस्य नेतराम कटरे, माजी आ.रमेश कुथे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष पकंज रहांगडाले, भाजप शहरध्यक्ष सुनील केलनका, गोंदिया ग्रामीण तालुकाध्यक्ष छत्रपाल तुरकर, जि.प. अध्यक्षा सीमा मडावी, जि.प.उपाध्यक्ष अल्ताफ हमीद, माधुरी हरिणखेडे, रमेश अंबुले, घनश्याम पानतवने, शकील मन्सुरी, अशोक चौधरी, प्रकाश रहमतकर उपस्थित होते. अग्रवाल म्हणाले मागील पाच वर्षांत गोंदिया विधानसभा क्षेत्रात अनेक विकास कामे झाली आहे. महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प मार्गी लागल्याने शेतकऱ्यांची सिंचनाची समस्या दूर झाली असल्याचे सांगितले. हेमंत पटले म्हणाले, भाजप हा शिस्तप्रिय पक्ष असून पक्षाची शिस्त भंग करणाऱ्या पक्षात कुठलेच स्थान नाही. गोपालदास अग्रवाल यांनी मागील पाच वर्षांत अनेक विकासात्मक कामे करुन या विधानसभा क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलला त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना गोंदिया विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याचे सांगितले. गोपालदास अग्रवाल यांनी विकासाच्या मुद्दावर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा घेतलेला निर्णय स्वागताहार्य आहे. आता त्यांच्या नेतृत्त्वात गोंदिया विधानसभा क्षेत्राचा अधिक गतीने विकास होणार असल्याचे अशोक इंगळे यांनी सांगितले.या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले. संचालन भाजप जिल्हा उपाध्यक्ष दीपक कदम, अपूर्व अग्रवाल यांनी केले. सभेनंतर सकर्स मैदान येथून भव्य रॅली काढण्यात आली. यात भाजपचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यानंतर ही रॅली उपविभागीय कार्यालया जवळ पोहचली. यानंतर भाजप सेना युतीचे उमेदवार म्हणून गोपालदास अग्रवाल यांनी भाजप नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

टॅग्स :gondiya-acगोंडियाGopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल