शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
3
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
4
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
5
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
6
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
7
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
8
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
9
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
10
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
12
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
13
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
14
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
15
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
16
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
17
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
18
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
19
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
20
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले

Maharashtra Election 2019 ; डांर्गोली सिंचन प्रकल्पामुळे शेतकरी समृद्ध होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 06:00 IST

भाजपमुळे गोंदिया विधानसभा क्षेत्राला विकासाचे नवीन इंजीन मिळाले असून मतदारांनी कुणाचाही भूलथापाना बळी न पडता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील सरकारला पुन्हा एकदा विकासाची संधी द्यावी असे सांगितले. अशोक इंगळे म्हणाले गोपालदास अग्रवाल हे विकासाचे व्हिजन असणारे दमदार नेतृत्त्व आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : जब्बारटोला, पांढराबोडी येथे प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. सिंचनाच्या अपुऱ्या साधनामुळे धानाला पर्याय पीक शेतकऱ्यांना घेता येत नव्हते. त्यामुळे बाघ नदीवर डांर्गोली जवळ बंधारा तयार करण्यात येणार आहे. यामुळे हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे.या प्रकल्पामुळे शेतकºयांना उसाची लागवड करणे शक्य होणार आहे.त्यामुळे उसावर प्रक्रिया करणारा साखर कारखाना सुध्दा लवकर सुरू यामुळे गोंदिया विधानसभा क्षेत्रातील शेतकरी समृध्द होईल, असे प्रतिपादन गोंदिया विधानसभा क्षेत्राचे भाजप-सेना युतीचे अधिकृत उमेदवार गोपालदास अग्रवाल यांनी केले.निवडणूक प्रचारार्थ गोंदिया विधानसभा क्षेत्रातील बाजपेयी चौक, गौतम नगर, माताटोली, कुंभारेनगर, बारहखोली, शंकर चौक येथे पदयात्रा व नवेगाव, जब्बारटोला, पांढराबोडी,लहीटोला, कन्हारटोला, लोहारा, गिरोला, पिपरटोला येथे आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, प्रदीपसिंह परिहार,जिल्हा महामंत्री दीपक कदम, अमित अवस्थी, सुनील केलनका, प्रकाश रहमतकर, अशोक चौधरी, चमनलाल बिसेन, रमेश अंबुले, प्रिया मेश्राम यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. गोपालदास अग्रवाल म्हणाले, गोंदिया विधानसभा क्षेत्रात आपल्या माध्यमातून मागील पाच वर्षांत अनेक विकास कामे झाली. शिवाय नागरिकांची पायपीट कमी करण्यासाठी गोंदिया प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करुन विविध ३२ शासकीय कार्यालये एकत्र आणली. यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यास मदत झाली.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि गोंदिया तालुक्याचा केंद्र शासनाच्या हेल्थ वेलनेस योजनेत समावेश झाल्याने गोंदिया विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यास मदत झाली आहे. भाजपमुळे गोंदिया विधानसभा क्षेत्राला विकासाचे नवीन इंजीन मिळाले असून मतदारांनी कुणाचाही भूलथापाना बळी न पडता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील सरकारला पुन्हा एकदा विकासाची संधी द्यावी असे सांगितले. अशोक इंगळे म्हणाले गोपालदास अग्रवाल हे विकासाचे व्हिजन असणारे दमदार नेतृत्त्व आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने सुध्दा त्यांच्या विकास कामांची दखल घेतली आहे. शहरातील भूमिगत गटार योजनेसह अनेक विकास कामे त्यांच्याच पाठपुराव्यामुळे झाले.

टॅग्स :gondiya-acगोंदियाGopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल