शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Maharashtra Election 2019 ; डांर्गोली सिंचन प्रकल्पामुळे शेतकरी समृद्ध होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 06:00 IST

भाजपमुळे गोंदिया विधानसभा क्षेत्राला विकासाचे नवीन इंजीन मिळाले असून मतदारांनी कुणाचाही भूलथापाना बळी न पडता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील सरकारला पुन्हा एकदा विकासाची संधी द्यावी असे सांगितले. अशोक इंगळे म्हणाले गोपालदास अग्रवाल हे विकासाचे व्हिजन असणारे दमदार नेतृत्त्व आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : जब्बारटोला, पांढराबोडी येथे प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. सिंचनाच्या अपुऱ्या साधनामुळे धानाला पर्याय पीक शेतकऱ्यांना घेता येत नव्हते. त्यामुळे बाघ नदीवर डांर्गोली जवळ बंधारा तयार करण्यात येणार आहे. यामुळे हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे.या प्रकल्पामुळे शेतकºयांना उसाची लागवड करणे शक्य होणार आहे.त्यामुळे उसावर प्रक्रिया करणारा साखर कारखाना सुध्दा लवकर सुरू यामुळे गोंदिया विधानसभा क्षेत्रातील शेतकरी समृध्द होईल, असे प्रतिपादन गोंदिया विधानसभा क्षेत्राचे भाजप-सेना युतीचे अधिकृत उमेदवार गोपालदास अग्रवाल यांनी केले.निवडणूक प्रचारार्थ गोंदिया विधानसभा क्षेत्रातील बाजपेयी चौक, गौतम नगर, माताटोली, कुंभारेनगर, बारहखोली, शंकर चौक येथे पदयात्रा व नवेगाव, जब्बारटोला, पांढराबोडी,लहीटोला, कन्हारटोला, लोहारा, गिरोला, पिपरटोला येथे आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, प्रदीपसिंह परिहार,जिल्हा महामंत्री दीपक कदम, अमित अवस्थी, सुनील केलनका, प्रकाश रहमतकर, अशोक चौधरी, चमनलाल बिसेन, रमेश अंबुले, प्रिया मेश्राम यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. गोपालदास अग्रवाल म्हणाले, गोंदिया विधानसभा क्षेत्रात आपल्या माध्यमातून मागील पाच वर्षांत अनेक विकास कामे झाली. शिवाय नागरिकांची पायपीट कमी करण्यासाठी गोंदिया प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करुन विविध ३२ शासकीय कार्यालये एकत्र आणली. यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यास मदत झाली.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि गोंदिया तालुक्याचा केंद्र शासनाच्या हेल्थ वेलनेस योजनेत समावेश झाल्याने गोंदिया विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यास मदत झाली आहे. भाजपमुळे गोंदिया विधानसभा क्षेत्राला विकासाचे नवीन इंजीन मिळाले असून मतदारांनी कुणाचाही भूलथापाना बळी न पडता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील सरकारला पुन्हा एकदा विकासाची संधी द्यावी असे सांगितले. अशोक इंगळे म्हणाले गोपालदास अग्रवाल हे विकासाचे व्हिजन असणारे दमदार नेतृत्त्व आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने सुध्दा त्यांच्या विकास कामांची दखल घेतली आहे. शहरातील भूमिगत गटार योजनेसह अनेक विकास कामे त्यांच्याच पाठपुराव्यामुळे झाले.

टॅग्स :gondiya-acगोंदियाGopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल