शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : माघारीनंतर मतदारसंघातील लढतींचे चित्र स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 00:42 IST

शेवटच्या दिवसानंतर २४ उमेदवारांनी माघार घेतल्याने जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील अंतीम लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. गोंदिया, तिरोडा आणि आमगाव मतदारसंघात तिहेरी तर अर्जुनी मोरगाव मतदारसंघात दुहेरी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रमुख राजकीय पक्षाच्या बंडखोर उमेदवारांनी माघार न घेतल्याने मतांचे ध्रुवीकरण होऊन विजयाचे समीकरण बिघडण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देविधानसभा निवडणूक : अर्जुनी दुहेरी लढत : गोंदिया, आमगाव,तिरोड्यात तिहेरी लढत : बंडखोर फोडणार घाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर २४ उमेदवारांनी माघार घेतल्याने जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील अंतीम लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. गोंदिया, तिरोडा आणि आमगाव मतदारसंघात तिहेरी तर अर्जुनी मोरगाव मतदारसंघात दुहेरी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रमुख राजकीय पक्षाच्या बंडखोर उमेदवारांनी माघार न घेतल्याने मतांचे ध्रुवीकरण होऊन विजयाचे समीकरण बिघडण्याची शक्यता आहे.विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांची संख्या चारही मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे. आमदार होण्यासाठी या इच्छुकांनी मागील पाच वर्षांपासून मतदारसंघात तशी पेरणी करण्यास सुरूवात केली होती. तर काहींनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे उमेदवारी मिळविण्यासाठी फिल्डींग लावली होती. मात्र उमेदवारी जाहीर करताना पक्षश्रेष्ठींनी आपले पॅरामीटर लावल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोढ झाला आहे.त्यातच लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या दमदार यशानंतर या पक्षात आयारामांची संख्या वाढली. मेगा भरतीमुळे पक्षातील अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांची गोची झाली तर काहींचा उमेदवारी मिळण्याचा पत्ता ऐनवेळी कट झाला. त्यामुळे असंतुष्ठांची संख्या वाढली. पक्षाने आपल्याला ऐन निवडणुकीच्या तोंडावर डावलल्याच्या भावनेतून सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी बंडाचे निशाण उभारत उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत बंडखोरांचे मन वळविण्यात पक्षाच्या जेष्ठ नेत्यांना यश येईल अशी आशा अधिकृत उमेदवारांना होती. मात्र अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ वगळता तीन्ही मतदारसंघात बंडखोरांचे आव्हान कायम आहे. गोंदिया विधानसभा मतदारसंघात भाजपने काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले आ.गोपालदास अग्रवाल यांना उमेदवारी दिली. त्यामुळे मागील पाच वर्षांपासून या मतदारसंघात भाजपतर्फे तयारी करीत असलेले माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांचा पत्ता कट झाला. त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करुन निवडणूक लढविण्यावर ठाम राहण्याचा निर्धार केल्याने पक्षाची सुध्दा अडचण झाली आहे.तर काँग्रेसने अमर वºहाडे यांना उमेदवारी जाहीर केली. या दोन्ही उमेदवारांच्या तुलनेत वºहाडे यांना हा मतदारसंघ नवीन आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे.अर्जुनी मोरगाव मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ८ बंडखोर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे या मतदारसंघात भाजपचे उमेदवार राजकुमार बडोले विरुध्द राष्टÑवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापूरे असा सामना रंगणार आहे.तिरोडा मतदारसंघात राष्टÑवादी काँग्रेसचे माजी आ.दिलीप बन्सोड यांनी आपली बंडखोरीची भूमिका कायम ठेवल्याने या मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे. भाजपचे उमेदवार विजय रहांगडाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुड्डू बोपचे आणि अपक्ष उमेदवार दिलीप बन्सोड असा तिहेरी सामना या मतदारसंघात पाहयला मिळेल. आमगाव मतदारसंघात सुध्दा तिहेरी लढत होणार असल्याचे चित्र काँग्रेसचे माजी आ.रामरतन राऊत यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात भाजपचे उमेदवार संजय पुराम, काँग्रेसचे सहषराम कोरोटे आणि अपक्ष उमेदवार रामरतन राऊत यांच्यात तिहेरी लढत होणार आहे. पक्षातून बंडखोरी करणारे तीन्ही मतदारसंघातील उमेदवार हे दिग्गज असल्याने मत विभाजनाचा फटका पक्षांच्या अधिकृत उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिन्ही मतदारसंघातील विजयाच्या समीकरण सुध्दा बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :gondiya-acगोंदिया