शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

Maharashtra Election 2019 : माघारीनंतर मतदारसंघातील लढतींचे चित्र स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 00:42 IST

शेवटच्या दिवसानंतर २४ उमेदवारांनी माघार घेतल्याने जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील अंतीम लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. गोंदिया, तिरोडा आणि आमगाव मतदारसंघात तिहेरी तर अर्जुनी मोरगाव मतदारसंघात दुहेरी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रमुख राजकीय पक्षाच्या बंडखोर उमेदवारांनी माघार न घेतल्याने मतांचे ध्रुवीकरण होऊन विजयाचे समीकरण बिघडण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देविधानसभा निवडणूक : अर्जुनी दुहेरी लढत : गोंदिया, आमगाव,तिरोड्यात तिहेरी लढत : बंडखोर फोडणार घाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर २४ उमेदवारांनी माघार घेतल्याने जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील अंतीम लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. गोंदिया, तिरोडा आणि आमगाव मतदारसंघात तिहेरी तर अर्जुनी मोरगाव मतदारसंघात दुहेरी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रमुख राजकीय पक्षाच्या बंडखोर उमेदवारांनी माघार न घेतल्याने मतांचे ध्रुवीकरण होऊन विजयाचे समीकरण बिघडण्याची शक्यता आहे.विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांची संख्या चारही मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे. आमदार होण्यासाठी या इच्छुकांनी मागील पाच वर्षांपासून मतदारसंघात तशी पेरणी करण्यास सुरूवात केली होती. तर काहींनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे उमेदवारी मिळविण्यासाठी फिल्डींग लावली होती. मात्र उमेदवारी जाहीर करताना पक्षश्रेष्ठींनी आपले पॅरामीटर लावल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोढ झाला आहे.त्यातच लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या दमदार यशानंतर या पक्षात आयारामांची संख्या वाढली. मेगा भरतीमुळे पक्षातील अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांची गोची झाली तर काहींचा उमेदवारी मिळण्याचा पत्ता ऐनवेळी कट झाला. त्यामुळे असंतुष्ठांची संख्या वाढली. पक्षाने आपल्याला ऐन निवडणुकीच्या तोंडावर डावलल्याच्या भावनेतून सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी बंडाचे निशाण उभारत उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत बंडखोरांचे मन वळविण्यात पक्षाच्या जेष्ठ नेत्यांना यश येईल अशी आशा अधिकृत उमेदवारांना होती. मात्र अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ वगळता तीन्ही मतदारसंघात बंडखोरांचे आव्हान कायम आहे. गोंदिया विधानसभा मतदारसंघात भाजपने काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले आ.गोपालदास अग्रवाल यांना उमेदवारी दिली. त्यामुळे मागील पाच वर्षांपासून या मतदारसंघात भाजपतर्फे तयारी करीत असलेले माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांचा पत्ता कट झाला. त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करुन निवडणूक लढविण्यावर ठाम राहण्याचा निर्धार केल्याने पक्षाची सुध्दा अडचण झाली आहे.तर काँग्रेसने अमर वºहाडे यांना उमेदवारी जाहीर केली. या दोन्ही उमेदवारांच्या तुलनेत वºहाडे यांना हा मतदारसंघ नवीन आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे.अर्जुनी मोरगाव मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ८ बंडखोर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे या मतदारसंघात भाजपचे उमेदवार राजकुमार बडोले विरुध्द राष्टÑवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापूरे असा सामना रंगणार आहे.तिरोडा मतदारसंघात राष्टÑवादी काँग्रेसचे माजी आ.दिलीप बन्सोड यांनी आपली बंडखोरीची भूमिका कायम ठेवल्याने या मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे. भाजपचे उमेदवार विजय रहांगडाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुड्डू बोपचे आणि अपक्ष उमेदवार दिलीप बन्सोड असा तिहेरी सामना या मतदारसंघात पाहयला मिळेल. आमगाव मतदारसंघात सुध्दा तिहेरी लढत होणार असल्याचे चित्र काँग्रेसचे माजी आ.रामरतन राऊत यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात भाजपचे उमेदवार संजय पुराम, काँग्रेसचे सहषराम कोरोटे आणि अपक्ष उमेदवार रामरतन राऊत यांच्यात तिहेरी लढत होणार आहे. पक्षातून बंडखोरी करणारे तीन्ही मतदारसंघातील उमेदवार हे दिग्गज असल्याने मत विभाजनाचा फटका पक्षांच्या अधिकृत उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिन्ही मतदारसंघातील विजयाच्या समीकरण सुध्दा बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :gondiya-acगोंदिया