शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

Maharashtra Election 2019 ; ७६ उमेदवार निवडणूक रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 06:00 IST

राज्यात विधानसभा निवडणूक आता रंगात आली असून २७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या टप्प्याला सुरूवात झाली. त्यानुसार, गुरूवारपर्यंत (दि.३) जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांसाठी २७ उमेदवारांनी ३३ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातच शुक्रवार (दि.४) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने बम्पर भर्ती दिसून आली.

ठळक मुद्देअंतिम दिनी ११२ अर्ज दाखल : सोमवारी होणार चित्र स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (दि.४) जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण ७६ उमेदवारांनी ११२ अर्ज दाखल केले. त्यामुळे सध्यातरी निवडणुकीच्या रिंगणात ७६ उमेदवार आहेत. मात्र सोमवारपर्यंत (दि.७) उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असल्याने सोमवारीच निवडणुकीच्या रिंगणातील लढवय्यांचा खरा आकडा स्पष्ट होणार आहे.राज्यात विधानसभा निवडणूक आता रंगात आली असून २७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या टप्प्याला सुरूवात झाली. त्यानुसार, गुरूवारपर्यंत (दि.३) जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांसाठी २७ उमेदवारांनी ३३ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातच शुक्रवार (दि.४) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने बम्पर भर्ती दिसून आली. शुक्रवारी जिह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांसाठी ७६ उमेदवारांनी ११२ अर्ज दाखल केले.विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी बघितल्यास, (६३) अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघातून २१ उमेदवारांनी ३२ उमेदवारी अर्ज, (६४) तिरोडा विधानसभा मतदारसंघातून १८ उमेदवारांनी २२ उमेदवारी अर्ज, (६५) गोंदिया विधानसभा मतदारसंघातून २७ उमेदवारांनी ४३ उमेदवारी अर्ज तर (६६) आमगाव विधानसभा मतदारसंघातून १० उमेदवारांनी १५ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.विशेष म्हणजे, जिल्ह्यातील राजकारणाचा गड असलेल्या गोंदिया विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक २७ उमेदवारांनी ४३ अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढण्याची आपली इच्छा जाहीर करणाऱ्यांचा हा आकडा आहे. मात्र आता सोमवारी (दि.७) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने किती उमेदवार आपले अर्ज मागे घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असून त्यानंतर रिंगणात लढविणार खरा आकडा पुढे येणार.बंडखोरांनी वाढविले टेंशनपक्षांकडून तिकीट नाकारण्यात आल्याने काहींनी अपक्ष म्हणून तर काहींनी अन्य पक्षांचा हात धरून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे दिसून येत आहे. यामुळे अशा बंडखोरांची संख्या वाढली असून राजकीय पक्षाच्या तिकीटवर लढत असलेल्या उमेदवारांचे टेंशन वाढविले आहे. हे बंडखोर रिंगणात राहिल्यास मत कापून फटका बसविणार असल्याने आता त्यांची मनधरणी करण्याचे प्रकार घडणार आहेत.यासाठी त्यांना प्रलोभन देऊन त्यांचे मन वळविण्यात येणार यात शंका नाही.

टॅग्स :gondiya-acगोंडिया