शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

गोंदिया जिल्ह्यातील १५१ जनावरांना विषाणूजन्य आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 14:00 IST

जनावरे एकमेकाच्या संपर्कात आले की त्यांना लंपी स्कीन डिसीज होतो. जनावरांच्या शरीरावर गाठी येतात आणि त्या गाठीतून पस तयार होऊन त्याची इतर जनावरांना लागण होण्याचा धोका असतो. हा आजार गोंदिया जिल्ह्यात पहिल्यांदाच आढळून आला आहे.

ठळक मुद्दे धानोली येथील जनावरांना लागण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जनावरे एकमेकाच्या संपर्कात आले की त्यांना लंपी स्कीन डिसीज होतो. जनावरांच्या शरीरावर गाठी येतात आणि त्या गाठीतून पस तयार होऊन त्याची इतर जनावरांना लागण होण्याचा धोका असतो. हा आजार गोंदिया जिल्ह्यात पहिल्यांदाच आढळून आला आहे. सालेकसा तालुक्याच्या धानोली येथील तब्बल १५१ जनावरांना या आजाराची लागण झाली असल्याचे पुढे आले आहे. त्या जनावरांवर पशूसंवर्धन विभागाने उपचारही केले आहे.एका जनावराच्या संपर्कात आलेल्या जनावरांना होणारा संसर्गजन्य आजार म्हणजे लंपी स्कीन आजार आहे. सालेकसा तालुक्यातील धानोली येथील जनावरांना हा आजार असल्याचे पुढे आल्याने कावराबांध येथील पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांना माहिती दिली. जि.प.मुख्य कार्यकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या मागदर्शनात एक चमू गठित करून त्या चमूला धानोली येथे पाठविण्यात आले. त्या चमूमध्ये जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेश वासनिक, जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्त डॉ.गायगवळी, सहाय्यक आयुक्त डॉ. गेडाम होते. १६ तारखेला धानोली येथे पोहचलेल्या चमूने दुपारपासून रात्रीपर्यंत जनावरांची तपासणी मोहीम राबविली. गावातील संपूर्ण ४०० जनावरांची पाहणी केली. त्यात १५१ जनावरांना हा आजार असल्याचे लक्षात आले. एका जनावरापासून दुसऱ्या जनावरांपर्यंत पोहचणारा हा पहिल्यांदाच आजार आपल्या जिल्ह्यात आढळला आहे. या आजाराच्या बचावासाठी दर आठ दिवसाने गोचीड, गोमासे यांचा विनाश करणारे सायफर मेथरीनची फवारणी, ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.जनावरे एकामेकाला स्पर्श करतील अशा स्थितीत त्या जनावरांना बांधायचे नाही, एकाच कुंडावर पाणी पिण्यासाठी त्या जनावरांना बांधू नये अश्या सूचना देण्यात आल्या. हा आजार संसर्गजन्य (संपर्कात आल्याने होणारा रोग) असल्याने जनावरांचेही शारीरीक अंतर ठेवणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जनावरांना गाठी येणे, त्या गाठीतून पस तयार होणे, ते पस बाहेर येते पुन्हा त्या पसमधून निघालेले विषाणू पसरतात आणि इतर जनावरांना याची लागन होते. ताप येत नाही किंवा जनावरांचा मृत्यू होत नाही. यासाठी पशूपालकांनी जनावरांकडे लक्ष देण्याची गरज आहे.जिल्ह्यात अलर्टलंपी स्कीन डिसीज जिल्ह्यात पसरू नये यासाठी पशूसंवर्धन विभागाने आपल्या यंत्रणेला सूचना दिल्या. आजार झाल्यास वेळीच उपचार करायचा, त्या जनावरांचा उपचार कसा करायचा ही प्रणाली सांगितली आहे. पशूपालकांनी याकडे लक्ष द्यावे, वेळीच पशूसंवर्धन विभागाला माहिती द्यावी.एका जनावपासून दुसºया जनावरांना होणारा हा संसर्गजन्य आजार असल्याने जनावरांना खुंटावर जवळ-जवळ बांधू नये, एकाच ठिकाणी चारा देऊ नये, तळ्यात जनावरांना सामूहिक पाणी पाजू नये.दर आठवड्याला गोठ्यात फवारणी करावी.-डॉ. राजेश वासनिक, जिल्हा पशू संवर्धन अधिकारी जि.प. गोंदिया

टॅग्स :Healthआरोग्य