शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
3
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
4
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
5
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
6
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
7
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
8
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
9
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
10
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
11
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
12
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
13
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
14
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
15
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
16
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
17
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
18
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
19
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
20
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ‘लक्ष्या’शीच नाही तर तिथे पोहोचविणाऱ्या रस्त्यासोबतही प्रेम करा

By admin | Updated: July 21, 2014 00:15 IST

आपण केवळ दुसऱ्यांमधील चांगले गुण पाहून त्याची तारीफ करतो. पण त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न करीत नाही. जीवनात काहीतरी करायचे असेल तर स्वत:मध्ये बदल करायला शिकले पाहीजे.

गोंदिया : आपण केवळ दुसऱ्यांमधील चांगले गुण पाहून त्याची तारीफ करतो. पण त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न करीत नाही. जीवनात काहीतरी करायचे असेल तर स्वत:मध्ये बदल करायला शिकले पाहीजे. जीवनात जे ध्येय ठवले आहे त्यावरच केवळ प्रेम करू नका, तर ते ध्येय गाठण्यासाठी जो रस्ता तुम्ही निवडाल त्याच्याशीही प्रेम करा, म्हणजे ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रवास चांगला होईल, असा सल्ला ‘लाईफ चेंगिंग’ कार्यशाळेचे प्रशिक्षक नदीम काझी यांनी दिला.लोकमत युवा नेक्स्ट आणि बालविकास मंचच्या वतीने येथील धोटे बंधू महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित तीन दिवसीय कार्यशाळेसाठी आलेल्या काझी यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी जीवनात केवळ ‘विश्वासा’च्या जोरावर कोणतेही ध्येय कसे साध्य करता येते आणि त्यासाठी काय केले पाहीजे याचा पाट उलगडला.अवघ्या २६ वर्षाच्या नदीम काझी यांचे मूळ गाव लातूर जिल्ह्यातील असले तरी त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे घेतले. बीएससी आणि एमएससी (हॉर्टिकल्चर) मध्ये ते पुणे विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. पण महाविद्यालयाची पायरी चढण्याआधीच त्यांनी गिनीज रेकॉर्ड करणारे विश्वरूपराय चौधरी यांच्या मेमरी कार्यशाळेत भाग घेतला आणि त्यातून ते खूप प्रभावित झाले. यातच आपणही करिअर करायचे आणि नवीन पिढीला हे ज्ञान द्यायचे असे ठरवून त्यांनी आत्मविश्वास, इच्छाशक्तीतून कोणतीही गोष्ट कशी साध्य करायची, मानसशास्त्र, स्मरणशक्तीचा उपयोग अशा विविध गोष्टींचे ज्ञान विविध माध्यमातून आत्मसात केले. हे ज्ञान केवळ आपल्यापुरते मर्यादित न राहता ते पुढील पिढीला मिळाले पाहीजे आणि यातून अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून यावा यासाठी त्यांनी कार्यशाळाही घेणे सुरू केले.सध्या नदीम हे भारतीय सैन्यदलाच्या पुणे परिसरातील कॅम्पमध्ये जाऊन त्यांच्याही कार्यशाळेला मार्गदर्शन करतात. याशिवाय इतरही ठिकाणी त्यांच्या कार्यशाळा सुरू असतात. जीवनात साध्य करता येणार नाही असे काहीही नाही, केवळ स्वत:वर विश्वास असायला पाहीजे असे ते सांगतात. जीवनात पैशाने सर्वकाही मिळतेच असे नाही. जी गोष्ट पैशाने खरेदी केली जाऊ शकत नाही असे काहीतरी प्रत्येकाने कमावले पाहीजे. जीवनात वेगळे काही केल्याशिवाय नवीन काहीतरी साध्य होणारच नाही. माझा ईश्वरावर (अल्ला) विश्वास आहे. प्रार्थना करता आपल्या हातात काहीच नाही, सर्वकाही ईश्वरावर सोपवावे. पण प्रत्यक्ष काम करता सर्वकाही आपल्याच हातात आहे, आपण जे करू तसेच होणार, असा विश्वास ठेवून काम केल्यास निश्चितपणे यश लाभते, असे नदीम यांनी सांगितले.लहान मुले जास्त क्रियाशिल असतात. कारण त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट नवीन असते. त्याचप्रमाणे आपणही आपल्या कामात नाविन्यपूर्ण गोष्टींचा समावेश केल्यास आपणास अधिक क्रियाशिल होता येते. कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करताना किंवा ती साध्य करताना त्यात पूर्णपणे स्वत:ला गुंतवणे गरजेचे असते. एका अभ्यासानुसार केवळ ऐकल्याने ३५ टक्के लक्षात राहते, लिहून काढल्याने ५० टक्के तर प्रत्यक्ष ती गोष्ट करून पाहील्याने ९५ टक्के लक्षात राहते असे नदीम यांनी सांगितले. जीवनात आपले ‘गोल’ (साध्य) निश्चित करा आणि त्यानुसार वाटचाल करा, प्रवासाला निघताना आपल्याकडे जिकडे जायचे आहे त्याच गाडीत बसतो. त्याप्रमाणे जीवनाच्या प्रवासात कुठे जायचे आहे हे ठरवून नंतरच प्रवास सुरू करा, असा सल्ला यावेळी नदीम काझी यांनी दिला. (जिल्हा प्रतिनिधी)