शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

खासगी डॉक्टरांकडून होतेय रुग्णांची लूट

By admin | Updated: July 24, 2015 01:19 IST

आरोग्य सेवा ही सर्वोत्तम सेवा आहे. मात्र या सेवेला खासगी डॉक्टरांनी लुटमार अभियानाच्या माध्यमातून कलंकित करणे सुरू केले आहे.

रावणवाडी : आरोग्य सेवा ही सर्वोत्तम सेवा आहे. मात्र या सेवेला खासगी डॉक्टरांनी लुटमार अभियानाच्या माध्यमातून कलंकित करणे सुरू केले आहे. हा प्रकार ग्रामीण भागात फोफावत आहे. येथील डॉक्टरांकडून तपासणीसाठी अधिकची फी आकारुन लिकिंगच्या माध्यमातून रुग्णांची लूट करण्याचे प्रकार सुरू आहेत. मात्र अशा डॉक्टरांवर आळा घालून नियमाप्रमाणे कारवाई का होत नाही, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.पावसाळा लागल्यामुळे आता आजारांमध्ये वाढ झाली आहे. याचा फायदा घेत ग्रामीण भागातील अनेक डॉक्टर व्यवसायीकच झालेले आहेत. वैद्यकीय शिक्षणासाठी जेवढा पैसा खर्च केला जातो, तो पैसा कमी वेळात व कमी श्रमात लवकर काढण्याच्या बेतात रुग्णांकडे लक्ष दिले जात नाही. पैसा कमविण्याकडे या डॉक्टरांचे अधिक लक्ष आहे. एखादा रुग्ण किरकोळ स्वरुपाच्या आजारावर औषधोपचारासाठी आला की त्या रुग्णाला ‘बळीचा बकरा’ कसा करता येईल व त्यापासून पैसा कसा काढता येईल याच विचारात हे डॉक्टर असतात. रुग्णांना असलेल्या आजारांबद्दल भीती निर्माण केली जाते. विविध कारणे समोर करुन पैसा उकलण्याच्या प्रयत्न केला जात आहे. ग्रामीण भागात डॉक्टरांची मानसिकता लुटारु झाल्याचे चित्र दिसून येत आहे.वाढलेली लोकसंख्या, दूषित जल-वायू व भेसळयुक्त खाद्यपदार्थ मानवी जीवनाला अपायकारक ठरत आहेत. पौष्टीक खाद्य पदार्थांचा अभाव व इतर कारणांमुळे रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांच्या संख्येतहीझपाट्याने वाढ होत आहे. काही डॉक्टरांनी गल्लोगल्लीत दुकानदाऱ्या सुरु केल्या आहेत. तर काही डॉक्टर घरपोच सेवेसाठी उपलब्ध आहेत. संपूर्ण आजारांवर उपचार करुन देवू असे म्हणून डॉक्टर रुग्णाला प्रयोगशाळा समजून किरकोळ स्वरुपाच्या आजारावरही महागडी व रंगीबेरंगी ब्रॅन्डेड कंपन्यांची औषधी लिहून देतात. ही औषधही ५०० रुपयांपेक्षा अधिक दराचीच असते. जवळील ठराविक औषध विक्रेत्यांची माहिती रुग्णांना देवून औषध विक्री व्यवसायाला सहकार्य करीत आपले कल्याण साधण्याचा बेधडक व्यवसाय हे खासगी डॉक्टर राजरोसपणे करीत आहेत. (वार्ताहर)रुग्णांवर काही दिवस उपचार केल्यानंतर रुग्णाच्या प्रकृतीत सुधार न झाल्यास त्यांना आपल्या संबंधित डॉक्टरांकडून उपचार करवून घेण्याचा सल्ला दिला जातो. तोपर्यंत रुग्णांचा वेळ व पैसा खर्च होवून तो आजारीच असतो. डॉक्टरांना रुग्णाला नेमका कोणता आजार जडला हेच लक्षात येत नाही. त्यामुळे रुग्णाला नाईलाजास्तव शहरी भागातील डॉक्टरांजवळ जावून उपचार करावा लागतो. तोपर्यंत आजारही गंभीर रुप घेवून वाढतच जातो. डॉक्टरांनी जेनेरिक औषधे सूचवावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सरकारी दवाखान्यांमध्ये उपचार होत असते. ती औषधे सर्वत्र मिळावी म्हणून शासन प्रयत्न करीत आहे. मात्र ग्रामीण भागातील औषध विक्रेते डॉक्टरांना हाच ब्रॅन्डेड माल खपवा, असा आग्रह करतात. त्यातून मिळणारे कमिशन विक्रेते आणि डॉक्टर परस्पर वाटून घेतात.