शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

‘लोकमत रक्ताचं नातं’ रक्तदान मोहीम २ जुलैपासून होणार सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 05:00 IST

लोकमत वृत्तपत्र समुहाच्यावतीने लोकमत रक्ताचं नातं हा उपक्रम जिल्हाभरात राबविला जाणार आहे. सध्या कोरोनाचा काळ आहे. या बिकट स्थितीत रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासत आहे. अशा कठीण समयी ‘लोकमत’ने हाती घेतलेला ‘लोकमत रक्ताचं नातं‘ हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे. आपण केलेल्या रक्तदानामुळे कुणाचा तरी जीव वाचविणे निश्चितच शक्य होणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलैपासून ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तदान मोहिमेला प्रारंभ होत आहे. या कालावधीत संपूर्ण राज्यभरात रक्तदानाचा महायज्ञ होत आहे. कोरोनाकाळात रक्तदान शिबिरावरही परिणाम झाला. त्यामुळे रक्तदानाची कमतरता जाणवायला लागली. आता ती कमतरता भरून काढण्यासाठी ही रक्तदान मोहीम आयोजित करण्यात आली आहे.  ‘लोकमत’च्या या उपक्रमात सर्वांनी हेच महान कार्य ही भूमिका घेऊन रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले. रक्त हे कोणत्याही कृत्रिम पदार्थापासून तयार करता येत नाही. त्यामुळे रक्तसंकलनाशिवाय पर्याय नाही. गोंदिया शहरासह तालुक्यातही रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या रक्तदान शिबिराला विविध सामाजिक आणि राजकीय सहकार्य करण्याकरिता युवा वर्ग तसेच सखी मंच सदस्य व वाचक वर्ग यांनी पुढे येऊन महान रक्तदान शिबिराला  यशस्वी करण्याचे आवाहन लोकमत गोंदिया जिल्हा कार्यालय प्रमुख मिलिंद वाढई, लोकमत जिल्हा प्रतिनिधी अंकुश गुंडावार, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी मुकेश शर्मा यांनी केले आहे. रक्तदान शिबिराच्या अधिक माहितीसाठी लोकमत इव्हेंटचे श्रीकांत पिल्लेवार (९८२३१८२३६७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे. 

लोकमत वृत्तपत्र समुहाच्यावतीने लोकमत रक्ताचं नातं हा उपक्रम जिल्हाभरात राबविला जाणार आहे. सध्या कोरोनाचा काळ आहे. या बिकट स्थितीत रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासत आहे. अशा कठीण समयी ‘लोकमत’ने हाती घेतलेला ‘लोकमत रक्ताचं नातं‘ हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे. आपण केलेल्या रक्तदानामुळे कुणाचा तरी जीव वाचविणे निश्चितच शक्य होणार आहे. - नवाब मलिक, अल्पसंख्याक मंत्री तथा पालकमंत्री गोंदिया जिल्हा 

सध्या महाराष्ट्राला रक्ताची गरज आहे. तसेच जिल्ह्यातही दररोज ३० बाॅटल रक्ताची गरज कुणाला तरी वाचविण्यासाठी भासत आहे. रक्ताची मागणी वाढत आहे. मात्र रक्ताचा अपेक्षित पुरवठा होण्यास अडचण होत आहे. रक्तदानातूनच ही गरज पूर्ण करता येणे शक्य आहे. ‘लोकमत’ने हाती घेतलेला ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अमूल्य अश्या उपक्रमात जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, ही काळाची गरज आहे. यासाठी सर्वांनी पुढे येत महान दान रक्तदान करण्याची गरज आहे. - राजेश खवले, जिल्हाधिकारी गोंदिया

 

टॅग्स :LokmatलोकमतBlood Bankरक्तपेढी