शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Lok Sabha Election 2019; पोकळ आश्वासने देणारे हवे की काम करणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 22:58 IST

भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला अच्छे दिनची स्वप्न दाखवित महागाईवर नियंत्रण, शेतमालाला योग्य हमीभाव आणि दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात पाच वर्षात यापैकी एकही आश्वासन पूर्ण केले नाही.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : आमगाव तालुक्यात प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला अच्छे दिनची स्वप्न दाखवित महागाईवर नियंत्रण, शेतमालाला योग्य हमीभाव आणि दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात पाच वर्षात यापैकी एकही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे मोदी सरकारने दिलेली सर्व आश्वासने केवळ पोकळ ठरली आहेत.येत्या निवडणुकीत पोकळ आश्वासने देणारे की काम करणारे हवे हे जनतेनीच ठरवावे असे प्रतिपादन खा. प्रफुल्ल पटेल यांनी केले.काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस व महाआघाडीचे गडचिरोली-चिमूर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. नामेदव उसेंडी यांच्या निवडणूक प्रचारार्थ मंगळवारी (दि.९) आमगाव येथे आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. पटेल म्हणाले, भाजपने सत्तेवर येण्यापूर्वी जी आश्वासने दिली होती ती पूर्णपणे फोल ठरली असून प्रत्यक्षात नेमके याविरुध्द चित्र आहे. नोटबंदी, जीएसटीसारख्या निर्णयामुळे उद्योग डबघाईस आले असून बाजारपेठेत मंदीचे वातावरण आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरामुळे महागाई आकाशाला भिडली आहे.त्यामुळे सर्वसामान्याचे जगणे कठीण झाले आहे. नोटबंदीमुळे गोरगरीबांच्या जमा पुंजीवर सुध्दा भाजपने डल्ला मारला. सत्तेवर येण्यापूर्वी दरवर्षी २ कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन देणारे मोदी सरकार आता बेरोजगारांना पकोडे तळण्याचा व चौकीेदार बनण्याचा सल्ला देत आहे. तर उज्ज्वला योजनेतंर्गत गृहीणीेंना धूरमुक्त करुन त्यांचा सन्मान केल्याचे श्रेय भाजप सरकार लाटत आहे. मात्र प्रत्यक्षात ३५० रुपयांच्या गॅस सिलिंडरची किमत ८५० रुपये करुन महिलांचा सन्मान नव्हे त्यांना महागाईच्या खाईत लोटण्याचे काम केले आहे.त्यामुळे अशा विश्वासघाती आणि जनतेची दिशाभूल करणाऱ्या सरकारला धडा शिकविण्याची हिच योग्य वेळ आहे. येत्या ११ एप्रिलला सजग राहून मतदान करुन महाआघाडीचे उमेदवार डॉ.नामदेव उसेंडी यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन प्रफुल्ल पटेल यांनी केले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019