शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
2
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
3
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
4
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
5
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
6
'नमस्कार फ्रॉम स्पेस; तुम्हीही या प्रवासाचा आनंद घ्या', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video
7
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
8
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
9
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
10
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
11
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
12
Video: धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
13
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!
14
"कॉम्प्रोमाइज कर तुला रोल देतो", टीव्ही अभिनेत्याला दिग्दर्शकाने दिलेली ऑफर, केला धक्कादायक खुलासा
15
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
16
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
17
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
18
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
19
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
20
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा

लोधी समाजाला केंद्राच्या ओबीसी यादीत समाविष्ट केले जाणार

By admin | Updated: February 7, 2016 02:32 IST

ओबीसी समाजासाठी असलेल्या सवलतींपासून वंचित असलेल्या लोधी समाजाला केंद्राच्या ओबीसी यादीत समाविष्ट करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी दिले.

उमा भारती : बिरसी विमानतळावर भाजपातर्फे स्वागतगोंदिया : ओबीसी समाजासाठी असलेल्या सवलतींपासून वंचित असलेल्या लोधी समाजाला केंद्राच्या ओबीसी यादीत समाविष्ट करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी दिले. रायपूरवरून छिंदवाडा येथे जाण्यासाठी बिरसी विमानतळावर शुक्रवारी त्या आल्या होत्या. यावेळी भाजप व लोधी समाज शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी आ. भेरसिंग नागपुरे, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जि. प. सभापती छाया दसरे, न.प. गटनेता दिनेश दादरीवाल, शहर अध्यक्ष भरत क्षत्रीय, दीपक कदम, जि.प. सदस्य कमलेश्वरी लिल्हारे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. निवेदनात प्रामुख्याने, महाराष्ट्रातील लोधी समाजाला केंद्राच्या ओबीसी यादीत समाविष्ट करण्यात यावे, ज्यामुळे महाराष्ट्रातील लोधी समाजातील सुशिक्षित तरूणांना केंद्रीय नोकरभरतीत आरक्षणाचा लाभ होईल. लोधी समाज हा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मागासलेला असल्याने महाराष्ट्र शासनाने २००४ मध्ये या समाजाला इतर मागास प्रवर्गात समाविष्ट केले आहे. राज्यात ज्याप्रमाणे या आरक्षणाच्या सुविधा प्राप्त आहेत, तशा केंद्रातील यादीत लोधी समाजाचे नाव नसल्याने ओबीसी आरक्षणापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या माध्यमातून लोधी समाजाचा केंद्राच्या ओबीसी यादीत समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी केली. पूर्व विदर्भातील मामा तलावांसाठी केंद्राचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा, ज्यामुळे मामा तलावांची दुरूस्ती, खोलीकरण होऊन स्ंिंचनाच्या सुविधा निर्माण होतील. त्याचप्रमाणे मध्य प्रदेश व महाराष्ट्र सीमेदरम्यान वाहणाऱ्या वाघ नदीवर इस्टर्न वाघ प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. या प्रकल्पामुळे दोन्ही राज्यांना शेती सिंंचनाकरिता लाभ होणार असल्याने या प्रकल्पाकरिता निधी उपलब्ध करून देण्यात यावा, आदी मागण्यांचा समावेश होता.यावेळी उमा भारती यांनी, लोधी समाजाला केंद्राच्या ओबीसी यादीत समाविष्ठ करण्याचे आश्वासन दिले. तसेच बाघ नदीवरील प्रकल्पाकरिता दिल्ली येथील अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश देवून प्रकल्पाला गती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री सिंंचन योजनेकरिता २० हजार कोटीचे बजेट असून या माध्यमातून राज्य सरकारला निधी दिला जाणार आहे. प्रकल्पाचे बळकटीकरण व पाण्याच्या लहान स्रोतांच्या विकासाकरिता सरकार कटिबध्द असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री सिंचन योजनेंतर्गत आपल्या क्षेत्रात भरीव कामे केली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपस्थित गोंदिया पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र ढोरे, निखारे, अग्रवाल यांच्याशी चर्चा करून जलसंधारणाची माहिती घेऊन त्यांना उपाययोजनांबाबत निर्देश दिले. यावेळी जयंत शुक्ला, भाऊराव उके, प्रदीपसिंंग ठाकूर, लक्ष्मण चुटे, राजीव ठकरेले, संजय मुरकुटे, अमित झा, सुनील केलनका, पंकज सोनवाने, अहमद मनियार, आत्माराम दसरे, रोहीत दादरीवाल, अजित मेश्राम, रामू लिल्हारे, संजय नागपुरे, उमेश बंबारे, कमलकिशोर लिल्हारे, सुरेश लिल्हारे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे, या अर्धा तासाच्या दौऱ्यादरम्यान भारती यांनी भाजपा, लोधी समाज संघटना व जलसंधारण अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. (प्रतिनिधी)