शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनचा बारदाना निर्मिती उद्योगाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 15:38 IST

देशभरात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने मागील तीन महिन्यापासून सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी आहे. परिणामी उद्योगधंदे ठप्प पडले आहेत. याचाच फटका कलकत्ता येथील बारदाना निर्मिती करणाऱ्या जूट महामंडळाला बसला आहे.

ठळक मुद्देविदर्भात बारदान्याचा तुटवडा शासकीय धान खरेदी संकटात

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देशभरात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने मागील तीन महिन्यापासून सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी आहे. परिणामी उद्योगधंदे ठप्प पडले आहेत. याचाच फटका कलकत्ता येथील बारदाना निर्मिती करणाऱ्या जूट महामंडळाला बसला आहे. बारदाना तयार करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने मागील तीन महिन्यापासून महाराष्ट्रासह इतर राज्यांना बारदाना मिळणे कठीण झाले आहे. याचा फटका विदर्भात सुरू असलेल्या शासकीय धान खरेदी केंद्राना बसला असून बारदान्याअभावी धान खरेदी आणि धानाची भरडाई करुन तयार केलेला तांदूळ ठेवण्याची समस्या निर्माण झाली आहे.पूर्व विदर्भात सध्या जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत हमीभावानुसार शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जात आहे. मात्र अनेक केंद्रांना बारदान्याचा पुरवठा झाला नसल्याने धान खरेदीची अडचण निर्माण झाली आहे.विदर्भात सध्या धान आणि इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी १ कोटी बारदान्याची आवश्यकता आहे. मात्र बारदान्याचा शासनाकडून पुरवठा होत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांना कलकत्ता येथील जूट महामंडळाच्या माध्यमातून बारदान्याचा पुरवठा केला जातो. पण कोरोनामुळे मागील तीन महिन्यापासून देशभरात सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे याचाच फटका कलकत्ता येथील बारदान्याचा पुरवठा करणाºया कलकत्ता येथील जूट महामंडळाला बसला आहे. सध्या महाराष्ट्रासह इतर राज्यांकडून बारदान्याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पण मजुरांअभावी बारदाना तयार करणे बंद असल्याने पुरवठा होत नसल्याची माहिती आहे. पूर्व विदर्भात रब्बी हंगामात शासकीय धान खरेदी केली जाते. मात्र सध्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची धानाची विक्री करण्यासाठी गर्दी वाढली असताना बारदाना नसल्याने धान खरेदी करण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांसाठी ४० लाख तर उर्वरित जिल्ह्यांसाठी ६० लाख अशा एकूण कोटी बारदान्याची गरज आहे.पण पुरवठ्याअभावी तुटवडा निर्माण झाला असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.पावसाळ्याला सुरूवात झाली असून ३० जूनपर्यंत रब्बीतील धान खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे लवकर बारदाना उपलब्ध न झाल्यास बारदान्याअभावी शेतकरी आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनची कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे.

जुन्या बारदान्यासाठी निविदाकलकत्ता येथील जूट महामंडळाकडून बारदान्याचा पुरवठा होत नसल्याने शासनाने यावर तोडगा काढण्यासाठी एकदा वापरलेला बारदान्यासाठी निविदा मागविल्या आहे. यामाध्यामातून जूना बारदाना उपलब्ध झाल्यास धानाची खरेदीची अडचण मार्गी लागू शकते. यासाठी शासनाने निविदा मागविल्या असल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनच्या सूत्रांनी दिली.

भरडाई केलेला तांदूळ परत करण्याची समस्याशासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेला धानाची राईस मिलर्सशी करार करुन भरडाई केली जाते. यासाठी शासनाकडून बारदाना उपलब्ध करुन दिला जातो. मात्र आता राईस मिलर्सनी भरडाई केलेला तांदूळ शासनाकडे जमा करण्यासाठी बारदान्याची अडचण निर्माण झाली आहे. यासाठी त्यांना जुन्या बारदाना घेवून त्यात तांदूळ परत करण्याचे निर्देश दिले आहे. पण हा जूना बारदाना आणायचा कुठून असा प्रश्न राईस मिलर्ससमोर निर्माण झाला आहे.

स्वस्त धान्य दुकानांची मदतराईस मिलर्स धानाची भरडाई करुन शासनाकडे सीएमआर तांदूळ जमा करतात. त्यानंतर हा तांदूळ जिल्हा पुरवठा विभागाच्या माध्यमातून स्वस्त धान्य दुकानांना पुरवठा केला जातो. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांकडे पुरवठा केलेल्या तांदळाचा बारदाना असून आता तो त्यांच्याकडून खरेदी करुन बारदाना टंचाईवर मार्ग काढला जात आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस