शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रुग्णालयाच्या प्रतिष्ठेसाठी आज ‘ताला ठोको’ आंदोलन

By admin | Updated: May 25, 2016 02:00 IST

स्थानिक ग्रामीण रुग्णालयात एकूण २७ पदांपैकी ११ पदे रिक्त आहेत. यासाठी अनेक वेळा मागणी करूनही फरक पडत नसल्यामुळे ...

नवेगावबांध : स्थानिक ग्रामीण रुग्णालयात एकूण २७ पदांपैकी ११ पदे रिक्त आहेत. यासाठी अनेक वेळा मागणी करूनही फरक पडत नसल्यामुळे स्थानिक नागरिकांनी बुधवारी (दि.२५) या रुग्णालयाला कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.यापूर्वी अशाच पद्धतीने नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. त्यावर आरोग्य उपसंचालकांचे प्रतिनिधी डॉ. विनोद वाघमारे यांनी ९ मे रोजी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून मागण्या मंजूर करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र सुमारे दोन आठवड्यांचा कालावधी लोटला तरी आश्वासनांची पुर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे बुधवारी ग्रामीण रुग्णालयात तालाठोको आंदोलन करण्याचे आंदोलकांनी ठरविले आहे. गोंदिया जिल्ह्यातील एक प्रतिष्ठित रुग्णालय म्हणून नवेगावबांधच्या ग्रामीण रुग्णालयाची ख्याती होती. परंतु प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे रुग्णालयाची प्रतिष्ठा खालावत चालली आहे. मान्य २७ पदांपैकी ११ पदे सध्या रिक्त आहेत. त्यामध्ये डॉक्टर ३, परिचारिका २, नेत्र तंत्रज्ञ १, क्ष-किरण तंत्रज्ञ १, सफाई कामगार १, चतुर्थ श्रेणी कर्मचारी ३ ही पदे रिक्त आहेत. मागील दोन महिन्यांपासून चार डॉक्टर्सचे काम एकाच डॉक्टरच्या खांद्यावर आले आहे. रुग्णांवर उपचार व कार्यालयीन कामाचा ताण वाढत असल्याने त्यांची मानसिकता ढासळत आहे. रिक्त पदांच्या कामाचा अतिरीक्त ताण कार्यरत कर्मचाऱ्यांवर पडत आहे. याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम रुग्णांच्या सेवांवर होत आहे. नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यास शासन कटिबध्द आहे. परंतु प्रशासकीय अनास्थेपोटी शासकीय धोरणाला हरताळ फासला जात आहे. यामध्ये मात्र गरीब जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दवाखान्याचेच आरोग्य बिघडलेले असताना रुग्णांवर उपचाराची अपेक्षा कशी करावी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर)अनास्थेमुळे आंदोलनाची वेळनवेगावबांधचे ग्रामीण रुग्णालय आपल्या सेवेसाठी जिल्ह्यात परिचीत होते. परिसरातील सामान्य व गरीब जनतेच्या आशेचा किरण होते. परंतु लोकप्रतिनिधींची अनास्था, प्रशासकीय अधिकाऱ्यांची कामचलाऊ प्रवृत्ती तसेच स्थानिक कर्मचाऱ्यांचा अंतर्गत विरोध व हेवेदावे यामुळे सदर रुग्णालयाच बिमार झाल्यासारखे वाटत आहे. सदर रुग्णालयाची रुग्णसेवा पूर्वीसारखीच सुरळीत व्हावी व पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त व्हावी यासाठी नागरिक आंदोलनाचा पवित्रा घेत आहे, असे विजय डोये, नवलकिशोर चांडक, विलास कापगते, दिनेश खोब्रागडे, रितेश जायसवाल, रामदास बोरकर, जितेंद्र कापगते, होमराज पुस्तोडे, योगराज पुस्तोडे, नामदेव कापगते, धनराज डोंगरवार, प्रविण गजापुरे, चंद्रभान टेंभुर्णे, संजय खरवडे, होमराज काशिवार, पितांबर काशिवार यांनी संयुक्त स्वाक्षरीनिशी प्रशासनाला कळविले आहे. प्रशासन आता कोणती कार्यवाही करते याकडे परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.