शहरं
Join us  
Trending Stories
1
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
2
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
3
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
4
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
5
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
6
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
7
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
8
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
9
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
10
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
11
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
12
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
13
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
14
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
15
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
16
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
17
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
18
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
19
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन

आजपासून वाढणार प्रवाशांच्या खिशावर भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 20:59 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेने प्रवास करणे आता पूर्वीपेक्षा अधिक महाग होणार आहे. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी तिकीट दरामध्ये १८ टक्के वाढ केली आहे.

ठळक मुद्देतिकीट दरवाढीने प्रवासी संतापले : डिझेल व कर्मचारी वेतन वाढीचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेने प्रवास करणे आता पूर्वीपेक्षा अधिक महाग होणार आहे. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी तिकीट दरामध्ये १८ टक्के वाढ केली आहे. त्यामुळे आधीच वाढत्या महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिक व प्रवाशांना प्रवासासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार असल्याने त्यांच्या खिशावरील भार वाढणार आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जूनच्या रात्री १२ वाजतानंतर ही दरवाढ लागू होणार आहे. याचा अर्थ १६ जूनच्या सकाळपासून नवीन तिकीट दर आकारले जाणार आहे. मागील दोन तीन वर्षांत डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली. कर्मचाºयांच्या वेतनातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे तिकीट दरात वाढ करणे आवश्यक होते. असे कारण महामंडळाकडून दिले जात आहे. प्रवाशांनी या दरवाढीवर नाराजी व तीव्र संताप व्यक्त केला आहे.महामंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या तिकीट दरवाढीनुसार, ६ किमीसाठी पहिला ठप्पा राहील. पहिल्या ठप्प्यासाठी आधी ७ रूपये घेण्यात येत होते. आता त्यासाठी ९ रूपये आकारले जाईल. परंतु तिकीटच्या रूपात १० रूपये वसूल करण्यात येईल. १.५ ठप्प्यासाठी आधी १० रूपये घेण्यात येत होते. आता तिकीट दर १२ रूपये असेल. परंतु बसमध्ये प्रवाशांकडून तिकीटचे १० रूपये वसूल केले जाईल. दोन ठप्प्यासाठी आधी १४ रूपये घेतले जात होते. आता तिकीट दर १६ रूपये होत आहे. परंतु प्रवाशांकडून राऊंड फिगरमध्ये १५ रूपये वसूल करण्यात येईल. २.५ ठप्प्यासाठी आधी १७ रूपये भाडे घेण्यात येत होते. आता हे भाडे २० रूपये होत आहे.एवढेच तिकीट दर वसूल केले जाईल. तीन ठप्प्यासाठी आधी २० रूपये तिकीट दर घेण्यात येत होते. आता ते २३ रूपये होईल. परंतु प्रवाशांकडून २५ रूपये वसूल केले जाईल.सदर तिकीट दर केवळ साधारण बसकरीता लागू नसून रातराणी व एशियार्ड बससेवेवरसुद्धा लागू करण्यात आले आहे. रातराणीचा प्रथम ठप्प्याचे दर ८ रूपये होते, आता १० रूपये होईल. १.५ ठप्प्यासाठी आधी १२ रूपये दर होते, आता १४ रूपये होत आहे. परंतु प्रवाशांकडून १५ रूपये तिकिटाचे वसूल केले जाईल. दोन ठप्प्यासाठी आधी १६ रूपये होते, आता १९ रूपये होत आहे.परंतु प्रवाशांकडून २० रूपये तिकिटासाठी वसूल केले जाईल. २.५ ठप्प्यासाठी आधीचे भाडे २० रूपये होते, आता २३ रूपये होत आहे. परंतु प्रवाशांकडून २५ रूपये घेण्यात येईल. एशियार्ड बस सेवेचा पहिल्या ठप्प्याचे दर १० रूपये होते, आता ११ रूपये झाला आहे. परंतु प्रवाशांना १० रूपयांतच तिकीट देण्यात येईल. १.५ ठप्प्यासाठी आधी १४ रूपये घेण्यात येत होते, आता १६ रूपयांची तिकीट राहील.परंतु प्रवाशांना १५ रूपयांमध्येच तिकीट द्यावी लागेल. दोन ठप्प्यासाठी आधी १८ रूपये भाडे घेण्यात येत होते. आता २१ रूपये होत आहे. परंतु प्रवाशांकडून २० रूपयेच तिकिटाचे घेण्यात येईल. २.५ ठप्प्यासाठी आधी तिकीट दर २३ रूपये होते, आता २७ होईल. मात्र प्रत्यक्षात प्रवाशांकडून २५ रूपये वसूल केले जाईल. 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ