शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
2
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
3
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
4
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
5
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
6
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
7
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
8
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
9
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
10
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
11
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
12
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
13
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
14
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
15
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
16
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
17
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
18
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
19
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
20
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!

साहित्य संमेलनाने युवा पिढीला नवी उर्जा प्राप्त होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:39 IST

आजचा युवा समाजाचा आधारस्तंभ आहे. समाजाला दिशा देण्याची जबाबदारी युवकांची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दूरदृष्टीचे होते. त्यांचे विचार सर्व दूर पोहोचविण्यासाठी साहित्य संमेलन हे प्रभावी माध्यम आहे.

ठळक मुद्देरचना गहाणे : परिवर्तनशील साहित्य संमेलन उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : आजचा युवा समाजाचा आधारस्तंभ आहे. समाजाला दिशा देण्याची जबाबदारी युवकांची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दूरदृष्टीचे होते. त्यांचे विचार सर्व दूर पोहोचविण्यासाठी साहित्य संमेलन हे प्रभावी माध्यम आहे. भगवान बुद्धांची शांती आणि बाबासाहेबांची रक्तविरहीत क्रांती आणि त्यांच्या समग्र लेखणाला आत्मसात करणे हेच खरे साहित्य होय. अशाच साहित्य संमेलनाने युवा पिढीला नवी उर्जा प्राप्त होते, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष रचना गहाणे यांनी केले.युगपुरुष युवा मंच आयोजित सिध्दार्थ बुध्द विहार व सारीपुत्र बुध्द विहार यांचे संयुक्त विद्यमाने मातोश्री रमाई आंबेडकर यांचे जयंती दिनाचे औचित्य साधून नामदेव ढसाळ साहित्य नगरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय पिंपळगाव (खांबी) येथे आयोजित एक दिवसीय परिवर्तनशिल साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी बाजार समिती उपसभापती लायकराम भेंडाकर होते. सहउद्घाटक म्हणून पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर होते. याप्रसंगी जिल्हा परिषद माजी सभापती उमाकांत ढेंगे, सरपंच उर्मिला मेश्राम, नगर पंचायत उपाध्यक्ष विजय कापगते, बाजार समिती संचालक व्यंकट खोब्रागडे, खरेदी विक्रीचे संचालक लैलेश शिवणकर प्रामुख्याने उपस्थित होते.सर्वप्रथम भगवान बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मातोश्री रमाई यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिप प्रज्वलीत करुन साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. स्वागत समारंभानंतर गावातील समता सैनिक दलाच्या सैनिकांनी उत्कृष्ट पथसंचलन केले. यानंतर ‘आम्ही भिमाची लेकर’ हा नागपूर प्रस्तुत भिमबुद्ध गीतांचा बहारदार कार्यक्रम घेण्यात आला.दुसऱ्या सत्रात ‘बहुजन समाजाच्या महिलांच्या शोषनास वर्तमान शैक्षणिक धोरण जबाबदार का?’ या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. या परिसंवादात अनेक मान्यवरांनी भाग घेऊन आपले विचार प्रकट केले. रात्री ९ वाजता सप्त खंजेरीवादक सत्यपाल महाराज यांचा जाहिर किर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सत्यपाल महाराज यांनी आपल्या अनोख्या शैलीत कुप्रथा अंधश्रध्दा, वाईट व्यसन यावर प्रहार करुन युवा पिढीने देश समृद्ध करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करुन हजारो प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या एकदिवसीय साहित्य संमेलनात कवी, साहित्यीक व विशेष मान्यवरांनी हजेरी लावून हा संमेलन यशस्वीरित्या पार पाडण्यात सहकार्य केले. कार्यक्रमासाठी युवा मंच, सिध्दार्थ व सारीपुत्र बुद्ध विहार समितीच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.