शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

पावसामुळे जनजीवन विस्कळीत

By admin | Updated: September 12, 2016 00:20 IST

जिल्ह्यात १० सप्टेंबरच्या सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे जनजीवन विष्कळीत झाले.

नदी-नाल्यांना पूर: अनेक घरात घुसले पाणी; जिल्ह्यातील १० रस्ते झाले बंदगोंदिया : जिल्ह्यात १० सप्टेंबरच्या सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे जनजीवन विष्कळीत झाले. सालेकसा तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा तालुका मुख्यालयापासून संपर्क तुटला. आमगाव तालुक्याच्या बोरकन्हार येथील घरात पाणी शिरल्याने घरवाल्यांना त्रास सहन करावा लागला.गोंदिया जिल्ह्यात १० सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून पावसाला सुरूवात झाली. पहाटेपासून पावसाने चांगलेच झोडपले. सतत १० वाजता पर्यंत पाऊस सुरूच होता. पावसामुळे गणपती पूजा आरतीला लोक जाऊ शकले नाही. अनेक गणेश मंडपात पाणी साचले.सालेकसा तालुका प्रतिनिधी व दरेकसा वार्ताहर यांनी दिलेल्या माहितीनुसार दरेकसा परिसरात सकाळी ५ ते ७ वाजता दरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. वाघनदी तुडूंब भरून वाहत होती. नाल्यांना पूर आला. परिणामी सकाळी ८.३० ते ९ वाजता दरम्यान या मार्गावरून जाणारी राजधानी एक्सप्रेस अडीच तास दरेकसा रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आली. पाणी कमी झाल्यावर त्या गाडीला रवाना करण्यात आले. रात्रीपासून पाऊस सुरूच होता. पावसामुळे धनेगाव नदी, चांदसूरज, हाजराफॉल धबधबा ओसंडून वाहत आहे. त्यामुळे दुपारी १ वाजता पर्यंत सालेकसा ते दरेकसा मार्ग बंद होता.अर्जुुनी मोरगावात १० सप्टेंबरच्या सायंकाळी ७.१५ वाजता दरम्यान पावसाला सुरूवात झाली. रात्रभर हळू पाऊस सुरू होता. रविवारच्या सकाळी ९ वाजता पर्यनत या परिसरात पाऊस सुरू होता. उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला. या पावसामुळे शेतकऱ्यांना समाधान झाले. आताही ढगाळ वातावरण आहे. आमगाव तालुक्याच्या बोरकन्हार येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने पंचायत समिती सदस्याने यासंदर्भात नायब तहसीलदार यांना याची माहिती दिली. (जिल्ह्यातील वार्ताहर व तालुका प्रतिनिधींकडून)सालेकसा-देवरीत अतिवृष्टीजिल्ह्यात मागील २४ तासात सरासरी २६ मी.मी. पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली. सालेकसा व देवरी तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. देवरीत 65 मी.मी. व सालेकसात 67 मी.मी. पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली. गोंदिया तालुक्यात ४.४, गोरेगाव ५.१, तिरोडा २२.२, अर्जुनी-मोरगाव ३९ मी.मी., आमगाव १४.२ व सडक-अर्जुनी तालुक्यात १७.७ मी.मी. सरासरी पाऊस पडला. जैन कुटुंब बालबाल बचावलेबोरी (नवाटोला) नाल्याच्या पूलावरून पाणी यात होते. या रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहन चालकाला पूलावर पाणी किती आहे याचा अंदाज नसल्याने त्याने पाण्यात वाहन टाकले. परिणामी पाण्यात कार अडकली. कार मध्ये २ महिला, २ पुरूष व एक बालक बसलेला होता. मध्यप्रदेशच्या बालाघाट येथील जैन कुटुंब आपल्या कुळदेवतेच्या दर्शनसाठी बैरागड येथे जात होते. जैन कुटुंब सुरक्षीत आहेत.