शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी रस्त्याअभावी जगताहेत हलाखीचे जीवन

By admin | Updated: September 21, 2014 23:53 IST

सडक/अर्जनी तालुक्यातील सलंगटोल्याचे आदिवासी स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही रस्त्याअभावी हलाकीचे जीवन जगत आहेत. त्यांना गावाबाहेर जाण्यासाठी हक्काचा मार्ग नसल्यामुळे आजही

वामन लांजेवार - शेंडा/कोयलारीसडक/अर्जनी तालुक्यातील सलंगटोल्याचे आदिवासी स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही रस्त्याअभावी हलाकीचे जीवन जगत आहेत. त्यांना गावाबाहेर जाण्यासाठी हक्काचा मार्ग नसल्यामुळे आजही ते विकासापासून कोसो दूर आहेत.सलंगटोला हे गाव दल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असून त्या गावात शंभर टक्के आदिवासी समाजाचे लोक पिढ्यानपिढ्यापासून वास्तव्यास आहेत. परंतु आजही त्या गावात जाण्याकरिता रस्ता नसल्याने तलावाच्या पाळीने किंवा शेतातील धुऱ्याने जावे लागते, हे वास्तव आहे. पावसाळ्यात तर घराबाहेर निघण्यासाठी त्यांना दहावेळा विचार करूनच निघावे लागते. सडक/अर्जुनी तालुक्यातील प्रत्येक गावाला व टोल्यांना डांबरीकरण मार्गाने जोडले आहे. त्यामध्ये सलंगटोला अपवाद आहे. यावर्षी तापाच्या साथीचे थैमान मांडले. या गावातील रूग्णांना औषधोपचारासाठी चारचाकी वाहनाने इतरत्र हलवायचे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते. रूग्णाला खाटेवर मांडून दल्ली किंवा लेंडीटोला या गावापर्यंत प्रथम आणावे लागते. त्यानंतरच इतरत्र हलवावे लागते.त्या गावातील लहान चिमुकल्यांना शेतातील धुऱ्याने दल्ली येथे प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी ने-आण करावी लागते. पावसाळ्यात गवताचे प्रमाण अधिक असल्याने साप, विंचू किंवा जमिनीवर इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका नाकारता येत नाही. माध्यमिक शिक्षण घेणारे विद्यार्थी उशिखेडा, शेंडा आणि डोंगरगाव (डेपो) येथे जातात. परंतु पावसाळ्यात रस्त्याअभावी बुटी मारतात. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होते. रेशनचे धान्य आणण्याकरिता दल्ली येथे जावे लागते. परंतु पावसाळ्यात सायकलने जाणे कठिण असल्यामुळे डोक्यावर ओझे वाहून आणावे लागते. अशातच धुऱ्यावरून पाय घसरला तर धान्य बांध्यात सांडण्याचीच भीती अधिक असते. सडक/अर्जुनी तालुक्याच्या नकाशातून सलंगटोला हे नाव काढण्यात आले असेल, असे उद्गार एका तरूणाने काढले. निवडणूक काळात आम्ही तुम्हाला जाण्या-येण्यासाठी हक्काचा रस्ता तयार करून देवू, असे सर्वच पक्षाचे उमेवार सांगतात. परंतु निवडणूक संपली की विजयी उमेदवार त्या गावाकडे फिरकतही नसल्याचे सांगण्यात आले. दल्ली ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत आम्ही प्रामुख्याने रस्त्याचा विषय मांडतो. परंतु आजपावेतो त्याची दखल घेण्यात आली नाही, असे अनेक युवकांनी लोकमतशी बोलताना सांगितले. सलंगटोला गावाच्या रस्त्याची समस्या अनेकदा उजेडात आली. परंतु प्रशासनाने दखल घेतली नाही. तसेच लोकप्रतिनिधींनीसुद्धा या समस्येवर तोडगा काढला नाही. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपैयी यांच्या काळात पंतप्रधान ग्राम सडक योजना राबविण्यात आली होती. ही योजना अत्यंत लाभदायक असल्यामुळे तत्कालिन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात अविरत सुरू राहिली. तरीही प्रशासनाच्या कामचुकार प्रवृत्तीमुळे सलंगटोल्याचे आदिवासी रस्त्याअभावी मरणयातना भोगत आहेत. आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी शासन दरवर्षी करोडो रूपये खर्च करते. परंतु प्रशासकीय अधिकारी आपल्या हट्टी प्रवृत्तीने त्याला तडा देण्याचा मार्ग अवलंबतात. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला आदेश देवून सलंगटोला या आदिवासी गावाच्या रस्त्याची समस्या दूर करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.