शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

परवाना दुकाने बंद; अवैध दारूचा महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2017 01:31 IST

गावातील अवैध दारूमुळे गावाचे वातावरण दूषित होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाने एक आदेश

तंटामुक्त गाव मोहीम थंडावली : मोहीम वृद्धिंगत करण्यासाठी शासन उदासीनलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गावातील अवैध दारूमुळे गावाचे वातावरण दूषित होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाने एक आदेश काढून गावागावांत चालणाऱ्या अवैध दारू विक्रेत्यांच्या भट्ट्या बंद पाडून त्यांना पर्यायी रोजगाराकडे वळवावे, असे सांगितले. त्यानुसार जिल्ह्यातील ५५१ तंटामुक्त गाव समित्यांनी जिल्ह्यातील हजारो अवैध दारू विक्रेत्यांची दुकाने बंद पाडली होती. परंतु परवानाप्राप्त देशी विदेशी दारूची दुकाने बंद झाल्याने आता गावागावात अवैध दारूचा महापूर वाहू लागला आहे. पोलीस यंत्रणा मोठ्या प्रमाणात कारवाई करीत असली तरी या कारवाईला न जुमानणारे वास्तव अवैध दारूविक्रीचे आहे.गावातील अवैध दारूमुळे वाढणारे तंटे सोडविणे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीला जड जात होते. हे पाहून महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने क्रमांक एम.आय.एस.१००७/सी.आर.२३८/पोल-८ दि.१९ जुलै २००७ व शासन निर्णय गृहविभाग एम.आय.एस.१००८/सी.आर.४३/२००८ पोल-८ दि.१४ आॅगस्ट २००८ व वी.स.आ.१००८/६६९/ प्र.क्र.८१/0८ पोल-मंत्रालय मुंबई अनुसार २४ नोव्हेंबर २००८ रोजी अवैध धंद्यांना प्रतिबंध घालणे व त्याचे निर्मूलन करण्यासाठी निर्णय काढला. या निर्णयामुळे गावागावांत अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर गदा आली होती. परंतु त्या विक्रेत्यांना पर्यायी रोजगाराकडे वळविण्याचे कामही महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी केले होते. परंतु आता शासनाने राज्य व राष्ट्रीय मार्गावरील व ५०० मीटरच्या आत असलेली सर्व देशी, विदेशी दारूची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतल्याने मोठ्या प्रमाणात दारू दुकाने बंद झाली. परंतु व्यसनाधिन लोकांचे व्यसन कमी झाले नाही. परवानाप्राप्त दुकाने बंद झाल्याने गावागावातील प्रत्येक मोहल्यात अवैध दारूचा महापूर वाहू लागला आहे.या अवैध दारूतून गावाचे वातावरण दूषित होऊन भांडणे होत आहेत. यामुळे आर्थिक नुकसानी बरोबर कुटुंबाची व समाजाची शांतता धोक्यात येत आहे. अवैध दारूवर आळा घालण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. परंतु आता महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अवैध दारूसंदर्भात पोलिसांना सहकार्य करताना दिसत नाही. शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेला वृध्दीगंत करण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या नाही. शासनाने तंटामुक्त गावाचे दर तीन वर्षाने पुनर्मुल्यांकन करून त्या गावांना प्रोत्साहनपर बक्षीस द्यायला पाहीजे होते. परंतु शासनाने तसे न केल्याने या समित्या एकदा पुरस्कार घेतल्यानंतर आता उदासीन झाल्या आहेत. प्रत्येक गावात मोहफुलांपासून दारू काढणाऱ्या भट्ट्या सुरू होत आहेत.अवैध दारूविक्रीवर हजारो कुटुंब चालत आहेत. अवैध दारूमुळे दररोज सायंकाळी तंटे होत आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या कार्यकर्त्यांच्या सक्रियेतेमुळे अनेक गावांतील अवैध दारूभट्ट्या बंद होऊ शकतात. काही गावांत पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध दारूविक्री जोमाने सुरू आहे. पोलिसांची दररोज कारवाई परवानाप्राप्त दारू दुकानांवर संक्रांत आल्याने आता अवैध दारूचा महापूर वाहात आहे. या अवैध दारूविक्रेत्यांना पकडण्यासाठी पोलिसांची दररोज गस्त असते. दररोज २५ ते ४० अवैध दारूविक्रेत्यांची दारू पकडली जाते. परंतु कारवाई होऊनही अवैध दारूविक्री बंद होत नाही. आता दारूच्या किंमत वाढल्याने अवैध विक्री जोमात आहे. दारूविकक्रेत्या पुरूषाला पकडून पोलिसांनी ठाण्यात नेले तर त्याची पत्नी घरी दारू विक्री करीत असते. तिरोडाच्या संत सजन वॉर्डात ही स्थिती कायम आहे. मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री जिल्ह्यात होत आहे. परप्रांतातील नकली दारू जिल्ह्यात येत आहे. कारवाई करूनही विक्री थांबत नाही.