शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

शासनाच्या भिक्षातुल्य अनुदानाने ग्रंथालये संकटात

By admin | Updated: November 10, 2014 22:46 IST

सुसंस्कृत व सुशिक्षित समाज घडवून आणण्यासाठी राज्यातील १२ हजार ग्रंथालयांवर सरकारने अतोनात अटी लादल्या. ग्रंथालये बंद पाडण्याच्या अपयशी भूमिकेमुळे ग्रंथालयासारख्या

सालेकसा : सुसंस्कृत व सुशिक्षित समाज घडवून आणण्यासाठी राज्यातील १२ हजार ग्रंथालयांवर सरकारने अतोनात अटी लादल्या. ग्रंथालये बंद पाडण्याच्या अपयशी भूमिकेमुळे ग्रंथालयासारख्या पवित्र कार्यालयांना खिळ बसलेली आहे. ग्रंथालय क्षेत्रात काम करणाऱ्या ३० हजार कार्यकर्त्यांवर कुठाराघात करून माणूस घडविणाऱ्या संस्कृतीचा विरोध झाला. त्यामुळे ग्रंथालय चळवळीच्या कार्यकर्त्यांमध्ये याबद्दल संताप असून अत्यल्प अनुदानामुळे गं्रथालयांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.राज्यातील १२ हजार ग्रंथालयांचा अनुदानाचा प्रश्न, नवीन शासन मान्यता, दर्जा बदलाच्या प्रस्तावांना शासनाने तिलांजली दिली. ग्रंथालयांच्या तपासण्या वारंवार करून त्रुटीतील ग्रंथालयांना निकषांची पूर्तता करूनसुध्दा न्यायसंगत निर्णय घेण्यात आला नाही. परिणामी ग्रंथालय संघटनेला न्यायालयात दाद मागून आपला विजय प्राप्त करण्यात संघाला यश प्राप्त झाला. ग्रंथालयांच्या महत्त्वाची जाण न ठेवणाऱ्या शासनाने त्रुटीतील ग्रंथालयांना अजूनही सन २०१२-१३ पासूनचे प्रलंबित अनुदान दिले नाही. तसेच ५० टक्के अनुदानवाढीचे अद्याप वाटप करण्यात आले नाही, ही शोकांतिका आहे. शासनाची ‘गाव तेथे ग्रंथालय’ ही योजना अयशस्वी ठरली आहे. सार्वजनिक ग्रंथालयांना वर्गवारीनुसार अ, ब, क, ड या चार श्रेणीत विभागणी करून दर सहा महिन्यातून सप्टेंबर व मार्चमध्ये अनुदानाचे दोन टप्यात वाटप करण्यात येते. त्याच अनुदानातून सेवकांचा पगार, ग्रंथ खरेदी, ईमारत भाडे, आॅडीट, लेखन सामुग्री, वृत्तपत्र व नियतकालीकांचा खर्च भागविण्यात येतो. महागाईच्या या काळात सर्व वस्तुंच्या किंमती आकाशाला भिडलेल्या आहेत. ग्रंथालयांना मिळणाऱ्या अत्यल्प अनुदानातून हा खर्च कसा भागविता येईल, याचा विचार शासन दरबारी करणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रंथालयांना भरपूर व पुरेसे प्रोत्साहन शासनाने दिल्यास ग्रंथालय चळवळ अधिक सक्रिय होण्यास वेळ लागणार नाही. मात्र त्यांच्यावर कुठाराघात केल्यास ग्रंथालयातून सुसंस्कृत व चांगला समाज घडून येण्यास अडथळा निर्माण होईल.प्रत्येक थोर पुरुष, अनेक मंत्री, थोर नेते, निष्ठावान बुध्दीजीवी लोकांना ग्रंथालयातूनच प्रेरणा मिळाल्या आहेत. प्रत्येक घरात, प्रत्येक गावात, प्रत्येक व्यक्तीच्या मनात ग्रंथालायाची जागा असावी. त्याचे सुंदर वटवृक्ष व्हावे. त्याला टिकवून ठेवून संस्कृती जोपासण्यासाठी शासनाने योग्य प्रमाणात खतपाणी घालणे तेवढेच गरजेचे आहे. सन २०१४-१५ च्या पहिल्या हप्त्याची शंभर टक्के पूर्ण रक्कम न देता भिक्षातुल्य अनुदानाचे तुकडे करून कालावधी लोटूनही फक्त ४२ टक्के अनुदान देवून दिवाळी अंधारात गेल्यानंतर देण्यात आले. दुसरा तुकडा ३२ टक्के व तिसरा भाकरीचा तुकडा २६ टक्के शासनाकडून मिळणे बाकी आहे.ड वर्गाच्या ग्रंथालयांना ३० हजार वार्षिक अनुदानातून खर्च कसा भागविता येईल. त्यांना पाच ते १० वर्षापासून वर्गवाढ न मिळाल्याने त्यांचेही हाल होत आहेत. त्यामुळे ग्रंथालय चळवळीला जिवंत ठेवण्यासाठी नव्या शासनाकडून मोठ्या प्रमाणात आशा पल्लवित झालेल्या आहेत. (प्रतिनिधी)