शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

शासनाच्या भिक्षातुल्य अनुदानाने ग्रंथालये संकटात

By admin | Updated: November 10, 2014 22:46 IST

सुसंस्कृत व सुशिक्षित समाज घडवून आणण्यासाठी राज्यातील १२ हजार ग्रंथालयांवर सरकारने अतोनात अटी लादल्या. ग्रंथालये बंद पाडण्याच्या अपयशी भूमिकेमुळे ग्रंथालयासारख्या

सालेकसा : सुसंस्कृत व सुशिक्षित समाज घडवून आणण्यासाठी राज्यातील १२ हजार ग्रंथालयांवर सरकारने अतोनात अटी लादल्या. ग्रंथालये बंद पाडण्याच्या अपयशी भूमिकेमुळे ग्रंथालयासारख्या पवित्र कार्यालयांना खिळ बसलेली आहे. ग्रंथालय क्षेत्रात काम करणाऱ्या ३० हजार कार्यकर्त्यांवर कुठाराघात करून माणूस घडविणाऱ्या संस्कृतीचा विरोध झाला. त्यामुळे ग्रंथालय चळवळीच्या कार्यकर्त्यांमध्ये याबद्दल संताप असून अत्यल्प अनुदानामुळे गं्रथालयांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.राज्यातील १२ हजार ग्रंथालयांचा अनुदानाचा प्रश्न, नवीन शासन मान्यता, दर्जा बदलाच्या प्रस्तावांना शासनाने तिलांजली दिली. ग्रंथालयांच्या तपासण्या वारंवार करून त्रुटीतील ग्रंथालयांना निकषांची पूर्तता करूनसुध्दा न्यायसंगत निर्णय घेण्यात आला नाही. परिणामी ग्रंथालय संघटनेला न्यायालयात दाद मागून आपला विजय प्राप्त करण्यात संघाला यश प्राप्त झाला. ग्रंथालयांच्या महत्त्वाची जाण न ठेवणाऱ्या शासनाने त्रुटीतील ग्रंथालयांना अजूनही सन २०१२-१३ पासूनचे प्रलंबित अनुदान दिले नाही. तसेच ५० टक्के अनुदानवाढीचे अद्याप वाटप करण्यात आले नाही, ही शोकांतिका आहे. शासनाची ‘गाव तेथे ग्रंथालय’ ही योजना अयशस्वी ठरली आहे. सार्वजनिक ग्रंथालयांना वर्गवारीनुसार अ, ब, क, ड या चार श्रेणीत विभागणी करून दर सहा महिन्यातून सप्टेंबर व मार्चमध्ये अनुदानाचे दोन टप्यात वाटप करण्यात येते. त्याच अनुदानातून सेवकांचा पगार, ग्रंथ खरेदी, ईमारत भाडे, आॅडीट, लेखन सामुग्री, वृत्तपत्र व नियतकालीकांचा खर्च भागविण्यात येतो. महागाईच्या या काळात सर्व वस्तुंच्या किंमती आकाशाला भिडलेल्या आहेत. ग्रंथालयांना मिळणाऱ्या अत्यल्प अनुदानातून हा खर्च कसा भागविता येईल, याचा विचार शासन दरबारी करणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रंथालयांना भरपूर व पुरेसे प्रोत्साहन शासनाने दिल्यास ग्रंथालय चळवळ अधिक सक्रिय होण्यास वेळ लागणार नाही. मात्र त्यांच्यावर कुठाराघात केल्यास ग्रंथालयातून सुसंस्कृत व चांगला समाज घडून येण्यास अडथळा निर्माण होईल.प्रत्येक थोर पुरुष, अनेक मंत्री, थोर नेते, निष्ठावान बुध्दीजीवी लोकांना ग्रंथालयातूनच प्रेरणा मिळाल्या आहेत. प्रत्येक घरात, प्रत्येक गावात, प्रत्येक व्यक्तीच्या मनात ग्रंथालायाची जागा असावी. त्याचे सुंदर वटवृक्ष व्हावे. त्याला टिकवून ठेवून संस्कृती जोपासण्यासाठी शासनाने योग्य प्रमाणात खतपाणी घालणे तेवढेच गरजेचे आहे. सन २०१४-१५ च्या पहिल्या हप्त्याची शंभर टक्के पूर्ण रक्कम न देता भिक्षातुल्य अनुदानाचे तुकडे करून कालावधी लोटूनही फक्त ४२ टक्के अनुदान देवून दिवाळी अंधारात गेल्यानंतर देण्यात आले. दुसरा तुकडा ३२ टक्के व तिसरा भाकरीचा तुकडा २६ टक्के शासनाकडून मिळणे बाकी आहे.ड वर्गाच्या ग्रंथालयांना ३० हजार वार्षिक अनुदानातून खर्च कसा भागविता येईल. त्यांना पाच ते १० वर्षापासून वर्गवाढ न मिळाल्याने त्यांचेही हाल होत आहेत. त्यामुळे ग्रंथालय चळवळीला जिवंत ठेवण्यासाठी नव्या शासनाकडून मोठ्या प्रमाणात आशा पल्लवित झालेल्या आहेत. (प्रतिनिधी)