शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

लक्ष असू द्या ला; तूर्तास लागला विराम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 05:00 IST

जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत व ग्रामपंचायतच्या निवडणुका या ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे; पण या निर्णयाला सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केला असून, ओबीसी जागा वगळून या निवडणुका न घेता सर्वच निवडणुका स्थगित करून यावर निर्णय होईपर्यंत निवडणुका न घेण्याची मागणी केली आहे, तर ओबीसी आरक्षणावर १३ डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर १३ डिसेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, तर ओबीसी आरक्षणावर सर्वोच्य न्यायालयात १३ डिसेंबरलाच सुनावणी होणार आहे. या सुनावणीवरच या निवडणुकांचे भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे निवडणुका रद्द होतात, की ओबीसी जागा वगळून होतात हे महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी तोपर्यंत वेट ॲण्ड वॉचची भूमिका घेतली असून, उमेदवारांनासुद्धा सबुरीचा सल्ला देत मतदारांच्या संपर्कात राहण्यास सांगितले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २७ टक्के ओबीसी आरक्षणाला सर्वोच्य न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत व ग्रामपंचायतच्या निवडणुका या ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे; पण या निर्णयाला सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केला असून, ओबीसी जागा वगळून या निवडणुका न घेता सर्वच निवडणुका स्थगित करून यावर निर्णय होईपर्यंत निवडणुका न घेण्याची मागणी केली आहे, तर ओबीसी आरक्षणावर १३ डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालय काय निकाल देते यावरच या निवडणुकांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल झाले असले तरी उमेदवारांनी प्रचाराला अद्यापही सुरुवात केली नाही. निवडणुकांचा माहोल पूर्णपणे थंडावला असून, लक्ष असू द्यालासुद्धा तूर्तास विराम दिला आहे. उमेदवारदेखील आपल्या कार्यकर्त्यांना तूर्तास सबुरीचा सल्ला देत असून, १३ डिसेंबरनंतर पाहू भाऊ, असे सांगत आहेत. 

नेते म्हणतात मतदारांच्या संपर्कात राहा- ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून निवडणुका घेण्यास सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केला आहे, तर ओबीसी आरक्षण नाही तर निवडणूृक नाही अशीच भूमिका घेतली आहे, तर १३ डिसेंबरला सर्वोच्य न्यायालय काय निकाल देते यानंतर या निवडणुकीच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. त्यामुळे उमेदवार आणि त्यांचे समर्थकदेखील शांत आहेत. मात्र, शांत न राहता मतदारसंघातील मतदारांच्या संपर्कात राहण्याचा सल्ला सर्वच पक्षांच्या नेत्यांनी उमेदवारांना दिल्याची माहिती आहे. खानावळीवरील गर्दी झाली कमी - ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे उमेदवारांनीसुद्धा आता सावध पवित्रा घेतला आहे. आठ दिवसांपूर्वी आपल्या समर्थक व कार्यकर्त्यांना दररोज खानावळीत पार्ट्या दिल्या जात होत्या. त्यामुळे खानावळीतील गर्दीसुद्धा वाढली होती; पण मागील तीन- चार दिवसांपासून ही गर्दीदेखील कमी झाल्याचे चित्र आहे. 

उमेदवारांसह मतदारांच्या नजरा निर्णयाकडेच - ओबीसी आरक्षणासंदर्भात १३ डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालय नेमका काय निर्णय देते. ओबीसी जागा वगळून निवडणुका घ्या म्हणते, की सर्वच निवडणुका स्थगित करून एकत्रित घेण्याचे निर्देश देते, याकडेच सध्या सर्व पक्षांचे उमेदवार आणि मतदारांच्यासुद्धा नजरा लागल्या आहेत.सर्वच म्हणतात आम्ही ओबीसी हितैशी - ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून निवडणुका घेऊ नये असाच सूर सर्वच राजकीय पक्षांनी आवळला आहे. काही राजकीय पक्षांना ते पटत जरी नसले तरी त्यांना निवडणुकीतील समीकरणाचा विचार करून तसे म्हणावे लागत आहे. त्यामुळे सर्वांनीच आता ओबीसी हितैशी असल्याचा सूर आवळला आहे. 

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद