शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; पंतप्रधान मोदींनीही केलं खासदाराचं कौतुक!
4
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
5
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
7
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
8
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
9
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
10
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
11
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
12
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!
13
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
14
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
15
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
16
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
17
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
18
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
19
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
20
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...

लक्ष असू द्या ला; तूर्तास लागला विराम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 05:00 IST

जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत व ग्रामपंचायतच्या निवडणुका या ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे; पण या निर्णयाला सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केला असून, ओबीसी जागा वगळून या निवडणुका न घेता सर्वच निवडणुका स्थगित करून यावर निर्णय होईपर्यंत निवडणुका न घेण्याची मागणी केली आहे, तर ओबीसी आरक्षणावर १३ डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर १३ डिसेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, तर ओबीसी आरक्षणावर सर्वोच्य न्यायालयात १३ डिसेंबरलाच सुनावणी होणार आहे. या सुनावणीवरच या निवडणुकांचे भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे निवडणुका रद्द होतात, की ओबीसी जागा वगळून होतात हे महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी तोपर्यंत वेट ॲण्ड वॉचची भूमिका घेतली असून, उमेदवारांनासुद्धा सबुरीचा सल्ला देत मतदारांच्या संपर्कात राहण्यास सांगितले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २७ टक्के ओबीसी आरक्षणाला सर्वोच्य न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत व ग्रामपंचायतच्या निवडणुका या ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे; पण या निर्णयाला सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केला असून, ओबीसी जागा वगळून या निवडणुका न घेता सर्वच निवडणुका स्थगित करून यावर निर्णय होईपर्यंत निवडणुका न घेण्याची मागणी केली आहे, तर ओबीसी आरक्षणावर १३ डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालय काय निकाल देते यावरच या निवडणुकांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल झाले असले तरी उमेदवारांनी प्रचाराला अद्यापही सुरुवात केली नाही. निवडणुकांचा माहोल पूर्णपणे थंडावला असून, लक्ष असू द्यालासुद्धा तूर्तास विराम दिला आहे. उमेदवारदेखील आपल्या कार्यकर्त्यांना तूर्तास सबुरीचा सल्ला देत असून, १३ डिसेंबरनंतर पाहू भाऊ, असे सांगत आहेत. 

नेते म्हणतात मतदारांच्या संपर्कात राहा- ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून निवडणुका घेण्यास सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केला आहे, तर ओबीसी आरक्षण नाही तर निवडणूृक नाही अशीच भूमिका घेतली आहे, तर १३ डिसेंबरला सर्वोच्य न्यायालय काय निकाल देते यानंतर या निवडणुकीच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. त्यामुळे उमेदवार आणि त्यांचे समर्थकदेखील शांत आहेत. मात्र, शांत न राहता मतदारसंघातील मतदारांच्या संपर्कात राहण्याचा सल्ला सर्वच पक्षांच्या नेत्यांनी उमेदवारांना दिल्याची माहिती आहे. खानावळीवरील गर्दी झाली कमी - ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे उमेदवारांनीसुद्धा आता सावध पवित्रा घेतला आहे. आठ दिवसांपूर्वी आपल्या समर्थक व कार्यकर्त्यांना दररोज खानावळीत पार्ट्या दिल्या जात होत्या. त्यामुळे खानावळीतील गर्दीसुद्धा वाढली होती; पण मागील तीन- चार दिवसांपासून ही गर्दीदेखील कमी झाल्याचे चित्र आहे. 

उमेदवारांसह मतदारांच्या नजरा निर्णयाकडेच - ओबीसी आरक्षणासंदर्भात १३ डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालय नेमका काय निर्णय देते. ओबीसी जागा वगळून निवडणुका घ्या म्हणते, की सर्वच निवडणुका स्थगित करून एकत्रित घेण्याचे निर्देश देते, याकडेच सध्या सर्व पक्षांचे उमेदवार आणि मतदारांच्यासुद्धा नजरा लागल्या आहेत.सर्वच म्हणतात आम्ही ओबीसी हितैशी - ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून निवडणुका घेऊ नये असाच सूर सर्वच राजकीय पक्षांनी आवळला आहे. काही राजकीय पक्षांना ते पटत जरी नसले तरी त्यांना निवडणुकीतील समीकरणाचा विचार करून तसे म्हणावे लागत आहे. त्यामुळे सर्वांनीच आता ओबीसी हितैशी असल्याचा सूर आवळला आहे. 

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद