शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रानभाज्या उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:34 IST

गोंदिया : रोजच्या सकस आहारात मानवाची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रानभाज्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रानभाज्या उपयुक्त असून, आहारात समावेश ...

गोंदिया : रोजच्या सकस आहारात मानवाची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रानभाज्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रानभाज्या उपयुक्त असून, आहारात समावेश केल्याने

आरोग्य संपन्न राहता येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री नवाब मलिक यांनी केले.

तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्तच्या वतीने नवीन

प्रशासकीय इमारत येथे रविवारी (दि.१५) आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार विनोद अग्रवाल, जिल्हाधिकारी नयना गुंडे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना मलिक यांनी, रानभाज्यांमध्ये पोषक तत्व असल्यामुळे त्यांचे आहारशास्त्रीय महत्त्व आहे. रानभाज्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. बचतगटामार्फत उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. रानभाजी महोत्सवातून शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून परंपरागत उगवणाऱ्या रानभाज्यांची शहर व ग्रामीण भागातील लोकांना माहिती व्हावी हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. रानभाज्यांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण झाले आहे. त्यामुळे रानभाज्यांची उत्पादन क्षमता वाढविणे गरजेचे आहे, असे सांगितले.

प्रास्ताविकातून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी घोरपडे यांनी जिल्ह्यात ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत सर्वच तालुक्यांमध्ये रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. कार्यक्रमास तहसीलदार आदेश डफळ, अप्पर तहसीलदार अनिल खडतकर, कृषी उपसंचालक प्रणाली चव्हाण,

उपविभागीय कृषी अधिकारी भीमाशंकर पाटील, देवरी उपविभागीय कृषी अधिकारी मंगेश वावधने, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड, तंत्र अधिकारी कावेरी साळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सुनील खडसे व सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक शैलेश बिसेन यांनी केले. संचालन तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी केले. आभार उपविभागीय कृषी अधिकारी भीमाशंकर पाटील यांनी मानले.

---------------------------------

रानभाज्यांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

यावेळी रानभाज्यांच्या माहिती पुस्तिकेचे पालकमंत्री मलिक यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच ज्या शेतकरी व महिला बचतगटांनी रानभाजी महोत्सवात सहभाग घेतला त्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात कृषी विभागामार्फत शेतकरी, उमेद व महिला आर्थिक विकास महामंडळांचे रानभाज्या विक्रीचे एकूण ६५ स्टॉल लावण्यात आले होते. यामध्ये केना भाजी, आघाडा,

बारमाही लसून, कोचईचे पाने, बरमाराक्षसची पाने, सेवगा, सिल्लारी भाजी, आंबाडी भाजी, तरोटा भाजी, पातूर भाजी, खापरखुटीची भाजी, उंदीरकानाची भाजी, हरदफरीची भाजी, कुंदरु, भूईआवळा, पदीना, कुड्याचे फुल व

कुड्याच्या शेंगा, केवकांदा, काटवल, करवंद, मटारू, कारले, घुया, सुरण, भूईलिंब, पानफुटी, गुळवेल, तेलपांढरा, मशुरुम, भोंबोडी व इतर रानभाज्यांची विक्री करण्यात आली. महिला बचत गटामार्फत रानभाज्यापासून बनविलेल्या खाद्यपदार्थांचे स्टॉलही लावण्यात आले होते.