शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
5
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
6
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
7
Operation Sindoor : जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
8
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
9
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
10
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
11
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
12
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
13
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
14
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
15
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
16
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
17
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
18
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
19
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
20
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रानभाज्या उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:34 IST

गोंदिया : रोजच्या सकस आहारात मानवाची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रानभाज्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रानभाज्या उपयुक्त असून, आहारात समावेश ...

गोंदिया : रोजच्या सकस आहारात मानवाची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रानभाज्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रानभाज्या उपयुक्त असून, आहारात समावेश केल्याने

आरोग्य संपन्न राहता येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री नवाब मलिक यांनी केले.

तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्तच्या वतीने नवीन

प्रशासकीय इमारत येथे रविवारी (दि.१५) आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार विनोद अग्रवाल, जिल्हाधिकारी नयना गुंडे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना मलिक यांनी, रानभाज्यांमध्ये पोषक तत्व असल्यामुळे त्यांचे आहारशास्त्रीय महत्त्व आहे. रानभाज्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. बचतगटामार्फत उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. रानभाजी महोत्सवातून शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून परंपरागत उगवणाऱ्या रानभाज्यांची शहर व ग्रामीण भागातील लोकांना माहिती व्हावी हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. रानभाज्यांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण झाले आहे. त्यामुळे रानभाज्यांची उत्पादन क्षमता वाढविणे गरजेचे आहे, असे सांगितले.

प्रास्ताविकातून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी घोरपडे यांनी जिल्ह्यात ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत सर्वच तालुक्यांमध्ये रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. कार्यक्रमास तहसीलदार आदेश डफळ, अप्पर तहसीलदार अनिल खडतकर, कृषी उपसंचालक प्रणाली चव्हाण,

उपविभागीय कृषी अधिकारी भीमाशंकर पाटील, देवरी उपविभागीय कृषी अधिकारी मंगेश वावधने, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड, तंत्र अधिकारी कावेरी साळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सुनील खडसे व सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक शैलेश बिसेन यांनी केले. संचालन तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी केले. आभार उपविभागीय कृषी अधिकारी भीमाशंकर पाटील यांनी मानले.

---------------------------------

रानभाज्यांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

यावेळी रानभाज्यांच्या माहिती पुस्तिकेचे पालकमंत्री मलिक यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच ज्या शेतकरी व महिला बचतगटांनी रानभाजी महोत्सवात सहभाग घेतला त्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात कृषी विभागामार्फत शेतकरी, उमेद व महिला आर्थिक विकास महामंडळांचे रानभाज्या विक्रीचे एकूण ६५ स्टॉल लावण्यात आले होते. यामध्ये केना भाजी, आघाडा,

बारमाही लसून, कोचईचे पाने, बरमाराक्षसची पाने, सेवगा, सिल्लारी भाजी, आंबाडी भाजी, तरोटा भाजी, पातूर भाजी, खापरखुटीची भाजी, उंदीरकानाची भाजी, हरदफरीची भाजी, कुंदरु, भूईआवळा, पदीना, कुड्याचे फुल व

कुड्याच्या शेंगा, केवकांदा, काटवल, करवंद, मटारू, कारले, घुया, सुरण, भूईलिंब, पानफुटी, गुळवेल, तेलपांढरा, मशुरुम, भोंबोडी व इतर रानभाज्यांची विक्री करण्यात आली. महिला बचत गटामार्फत रानभाज्यापासून बनविलेल्या खाद्यपदार्थांचे स्टॉलही लावण्यात आले होते.